1/16/10

भ्रमाच्या शोधात

नुकतेच न्यु-यॉर्क टाईम्स मध्ये तीन लेख प्रकाशित झालेत. विज्ञाना विषयीच्या हे लेख विभिन्न घटानांची आणि शोधांची माहिती देत असले तरी त्यांच्यात विलक्षण साम्य आहे. ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रात रस असलेल्या एका व्यक्तीला अवकाशात डोळे रोखले असतांना त्याला गुरु ग्रहावर एक नविन डाग दिसला. बाराकाईने निरिक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की तो डाग म्हणजे गुरु ग्रहावर पडलेला खड्डा आहे. त्या खड्ड्याचा आकार पृथ्वी एवढा आहे. कश्यानी तो खड्डा पडला याची कल्पना अजुन खगोलशास्त्रज्ञ्यांना नाही. पण पृथ्वी एवढा खड्डा पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी शक्ति या जगात उपस्थित आहे हे बघुन मन विस्मित होत. दुसरा लेख, सुर्यावरच्या काळ्या डागांबद्दल होता. या डागांची निर्मिती कशी होते आणि एका विशिष्ट कालामाना नंतर त्यांची संख्या कशी वाढते किंवा कमी होते याबद्दलची चर्चा त्या लेखात केलेली होती. हे डाग पृथ्वीच्या आकारमानाचे असतात. आणि या डागांमुळे सूर्याची उर्जा केवळ ०.१ टक्क्याने कमी होते. पण तरी पृथ्वीच्या वातावरणात त्यामुळे प्रचंड बदल घडतात. काही भागात दुष्काळ तर काही भागात वादळ अचानक पणे उत्पन्न होतात. हे सगळे शोध गेल्या तीस-चाळीस वर्षात लागले आहेत. त्या आधी देवीचा प्रकोप म्हणुन बकरा बळी देण्या पलिकडे आपल्य हातात काहीच नव्हत. अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंबद्दल तर सोडाच पण डोळ्यांना न दिसणार्‍या सुक्ष्म जंतुबद्दल सुध्दाही आपण काही करु शकत नाही.

तिसरा लेखात आपल्या आतड्यात असलेल्या जंतु जगतावर होता. पोटातील सगळेच जंतु हानिकारक नसतात. खरतर फारच कमी जंतु हानि पोचवतात. बहुतांश मंडळी पोटात नेमक काय करतात याचा संशोधकांना आताशा कुठे कळु लागल आहे. पचना व्यतिरिक्त हे जंतु आपल्या तब्येतीच्या आणि स्वभावाच्या विशिष्ट प्रणालीस कारणीभूत असतात असा वैज्ञानिकांचा कयास आहे. पुढल्या काही वर्षात या विषयावर अजुन प्रकाश पडेल.

थोडक्यात, आपल्या हातात किती गोष्टी आहेत आणि अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंपासुन ते पोटातल्या सुक्ष्म जंतु पर्यंत अनाकलनिय घटना आपल आयुष्य, आपल्या व्यक्तिमत्वास कसा आकार देतात या बद्दलही आपल्याला पूर्ण कल्पना नाही बघुन आपल्या अज्ञानाची आणि क्षुद्रतेची जाणीव प्रखरतेने होते.

पण गंमत अशी की हे माहिती कळुन सुध्दा आपण ढीग काय करू शकतो? सुर्यावरचे डाग काढु शकतो? कि गुरुवर ज्या अवकाशातल्या उल्केने गुरु ग्रहावर महाकाय गर्त निर्माण केला ती उल्का उद्या पृथ्वीवर येत असेल तर थांबवु शकतो? आपल्या आयुष्याची, जगण्याची क्षुल्लुकता बघुन मन भ्रमित होत. पृथ्वीला जग मानुन आपण त्यावर राज्य करू पहातो. विध्वंस घालतो, जगाचा वाली म्हणवुन घेतो पण आपल्यात आणि मुंगीत काहीच अंतर नाही. दोघांचेही अस्तित्व सारखेच, क्षणभंगुर.

यालाच शंकराचार्य मिथ्या म्हणत असावेत. स्वत्वाची कल्पना आपल्याला असते, कर्त्याची जी भावना आपण उराशी घेउन वावरतो ती कल्पनाच मूळ भ्रम आहे.

जवळपास १ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर डायानोसोरस वावरत होते. त्यांचा आता नामशेषही उरला नाहीया. विविध आकारमानाचे, विविध जातींचे हे जीव झटक्यात नाहीसे झालेत. उरली फक्त धुळ आणि त्याचे दगडात उमटलेले अवशेष. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य प्राणी पृथ्वीतलावर वावरु लागलेत. वैज्ञानिकांच्या मते विश्व निर्मिती जवळपास १३ बिलियन म्हणजे १३ अब्ज वर्षापूर्वी झाली.म्हणजे पुढची १२ अब्ज, ९९ करोड, ९८ लाख वर्ष विश्वाचा कारभार आपल्या उत्पत्तीची वाट बघत ताटकळला नव्हता. सगळ जस व्हायच तसच झाल. आणि या चित्रातुन मनुष्याला काढुन टाकल तरी जे व्हायच तेच होईल. तरी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल किती माज असतो बघा.

कुसुमाग्रजांची मातीची दर्पोक्ती या कवितेतील कडवी आठवतात,

अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

पण खर बघता याला दर्पोक्ती म्हणणे चूक आहे. काय खोट बोलतेय माती इथे? पण आपल्या अहंकाराला ठेच पोचते म्हणुन या विचारांना दर्पोक्ती ठरवणार. जर का अब्जो वर्ष आपल्याविना अडल नाही आणि पुढली अब्जोवादी वर्ष अडणार नाही तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय आहे? याच उत्तर सोप आहे. काहीच नाही. पण मग अस म्हटल तर गोंधळ होईल म्हणुन आपण तत्त्वज्ञानाचा पदर धरतो. पाण्याच्या आरश्यात आपल्या क्षणभंगुर प्रतिमेला खर ठरवण्याचा विफल प्रयत्न करतो.पाणी वाहुन गेल्यावर प्रतिबिंब नाहीस होत. काळाच्या ओघात, तसच, आपणही नाहीसे होईल. जगातील अव्यक्त, निराकार, निर्गुण शक्ति माझ माहेर आहे आणि त्यात विलिन होण माझ लक्ष्य आहे हे सगळं थोतांड वाटत. असली अव्यक्त शक्ति वास करत नसेल अस नाही. पण विश्वाच्या पसार्‍यात तिला आपली काळजी आहे अस वाटण खुळेपणा आहे. आणि का असावी? काय बाजी मारली आहे आपण, कुठले चांद-तारे लावले आहेत आपण?

गुरु त्याच्या कक्षेतून थोडा जरी हलला तरी आपण नाहीसे होऊ. किंवा गुरु त्याच्या कक्षे ऐवजी दुसर्‍या कक्षेत असता तर पृथ्वीवर जीवच उपस्थित झाले नसते. दर वर्षी एकदा तरी बातम्या येतात की पृथ्वीवर लौकरच उल्का लौकरच आपटणार आहे. आता खरच अस होणार आहे की नाही देवच जाणे. पण अस व्हायच असेल तर ती उल्का फार मोठी असण्याचीही गरज नाही. दहा-पंधरा मैल लांबी-रुंदीची उल्का जरी पृथ्वीवर आपटली तरी आपण क्षणार्धात नाहीसे होऊ.

पावसात घरी दिव्यापाशी घोळका करणार्‍या किड्यांची आपण कीव करतो. कारण एका रात्रीपुरतेच त्यांना पंख फुटतात आणि उजाडेस्तोवर ती सगळी मरुन जातात. आपल्या जीवनात एका रात्रीला महत्त्व आहे त्याहुन कमी महत्त्व विश्वाच्या कालमानात आपल्या अस्तित्वाला आहे. सध्या पंख फुटले आहेत म्हणुन आपण गुटुर-गुटुर करतोय. उद्या पंख झडलेल्या अस्तित्वाला काळाची केरसुणी झाडुन टाकणार एवढ नक्की.

ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

12/29/09

रेखांकित - अंतिम भाग

मेघनाने घाबरत फोन उचलला आणि तिला परत घाम फुटायला लागला. तिने घाबरून आईकडे बघितल.

"काय झाल?"

"अनिकेतचा अपघात झालाय"

"अग बाई, कुठे झाला? कुठे दाखल केलय?"

मेघनाने गाडीची किल्ली उचलली आणि ती धावत बाहेर पडली.

"मेघना, कुठे जातेयस? कुठल्या दवाखान्यात आहे तो? थांब, मी पण येते. अशी एकटी नको जाऊस. "

तो पर्यंत मेघना गाडी पर्यंत पोचली होती. तिने गाडी चालू केली आणि क्षणभर ती विचार करु लागली. तो पर्यंत आई मागुन अक्षरशः धावत येत होती.

"मी दवाखान्यात जात नाही या आई. काळजी करु नकोस "

"काळजी काय नको करूस. हे बघ शांत हो. मी चालवते गाडी"

मेघनाने ते न ऐकता भरकन गाडी वळवली आणि फाटका बाहेर पडली.

"मेघना...." आई मागुन हाका देत राहिली.

मेघना टेकडीच्या पायथ्याशी पोचली. बाबा एकटाच पुस्तक वाचत बसला होता. त्याने दुरुन मेघनाला येतांना बघितल. पुस्तक बाजुला ठेउन तो उठला.

"आओ बेटी।" त्याने न हसता मेघनाच स्वागत केल.

मेघना काहीच बोलली नाही. नुसतीच जमिनीकडे बघत उभी राहिली.

बाबालाही काय बोलाव सुचेना. मेघना इथे परत आलीय म्हणजे नको ते घडलय असा त्याने कयास लावला. पण मेघना परत इथे येइल हेच बहुधा त्याला अपेक्षित नसाव.

"बैठो"

"मी इथे कधी आलीच नसती तरी हे सगळ असच घडल असत का?" तिने बाबाच बोलण कापत एकदम विचारल.

"बेटी, तुम्हारा यहां आना या न आना कोई मायने नही रखता। मैने तो केवल संदेसा देने का काम किया था। लिखने वाला तो कोई और है।"


"पण इतक्या लौकर कस सगळ घडल? अजुन एक-दोन महिने मिलाले असते तर काही तरी करता आलं असत."

"बच्चे, होनी को तो स्वयं भगवान नही टाल सकते। तुम कुछ कर पाती थी ये तुम्हारा भ्रम है।"

"मी दुसर लग्न केल असत तर..?"

"तो?"

"मै किसी और की परिणिता हुई होती। और अनिकेत की जान खतरे मे ना होती।"

"तुमने शायद परिणीता का अर्थ गलत समझा। जिसकी मृत्यु होनी थी उसिकी मृत्यु हुई है। विधिलिखित उसे ही कहते है। तुम तन-मन से जिसकी हो चुकी थी उसकी मृत्यु अटल थी। शादी होना याने परिणिता होना आवश्यक नही है। किसी और मे विलिन हो जाना याने परिणीता होना है।"

मेघना ने आ वासला. तिला रडण आवरेना. ती रडत खाली बसली.

"रो मत ऐसा भी नही कहे सकता।" बाबाचाही चेहरा केविलवाणा झाला होता.

"म्हणजे माझंच नशिब नाट होत." ती रडत म्हणाली. "मी त्याला भेटली नसती तर तो जिवंत असता"

"पण मग त्याच्या ऐवजी अजुन कोणी मेलं असत." तिल अजुन भडभडुन आलं.

"बच्चे इसमे तुम्हार कोई दोष नही है। अब मै तुम्हे कैसे समझाऊ?"

"एक कहानी सुनो। एक चिडिया पंछीयों के राजा गरूड के पास आती है और कहती है - 'महाराज, मैने कल बहोत बुरा सपना देखा।"

'क्यों क्या हुआ?'

'मेरे सपने मे यमराज आऐ थे। और उन्होने कहा की आज मेरी मृत्यु अटल है। अब आप ही मुझे अभय दे सकतें है।'

इस पर पक्षीराज ने कहा ' तुम चिंता मत करो। तुम्हारा रक्षण करना मेरा कर्तव्य है।'

ऐसा कहे की वे उस चिडिया को पीठ पर डाले दुनिया के दुसरी और उड पडे। वहां एक आसमान को छुंती हुई सिधी चट्टान थी। उसके मध्य मे एक छोटी सी गुफां थी। वहां पर उन्होने वो चिडिया को रखा और कहां - 'इतनी दूर और इतने उंचे मेरे अतिरिक्त किसी की उडान नहीं है। यहां और कोई नही आ सकता। और गुंफा के द्वार पर मै पहेरा देता रहुंगा। तुम यहां निश्चिंत रहो।"

ऐसा कहे के वे दरवाजे की और मुडते न मुडते इतने मे पलक झपकते ही गुफां मे छिपे एक साप ने उस चिडिया को निगल लिया।

अब गरूड राज अचंबित हो गये। ये तो बडा अन्याय हुआं। वे सिधा यमराज के पास गये।

'क्या मै पक्षीराज होना कोई मायने नही रखता? उन्होने यमराज को क्रोधित स्वरों मे प्रश्न पुछां। 'वो चिडिया मेरे अभय मे थी और फिर भी उसका अंत ऐसा हुआ?'

'महाराज स्वयं आप के मृत्यु पे आप के हातों मे नही है तो उस चिडिया की मृत्यु कैसे रोक पाते?"

गरुड राज ने पुछां 'फिर ऐसा ही होना तो आप ने उस चिडिया के सपने मे आकर मेरे से खिलवाड क्यों किया?"


"उस चिडिया की मृत्यु दुनिया के दुसरी और एक आसमान को छुंती चट्टान पर लिखि थी। अब उस नन्ही जान मे इतनी शक्ति ना थी। समझ लो आप ने मेरा काम सरल कर दिया।"

गरुडराज संतुष्ट न हुए। उन्होने फिर पुंछा "जन्म का कारण पता नही और मृत्यु कब और क्यों होगी ये भी पता नहीं। और जीवन भी पूर्व संचित कर्मों की छाया बितता है। चिडिया की मृत्यु अटल थी और मै कर्ता होने का तो केवल भ्रम है। ऐसे जीवन का क्या अर्थ है?'

"राजन्, पूर्व संचित कर्म मानो घट है। पर घट भरना यही जीवन है। और प्रात्प परिस्थिती मे अच्छे कर्मोंसे घट भरना यही मुक्ति का मार्ग है।'

"ना आप का जन्म पे अधिकार है ना मृत्यु पर। तो उस सोच मे समय बिताना व्यर्थ है।' बाबा ने गोष्ट संपवली.

"बेटी पुंछ के जनम नही होता और मृत्यु अनुमती की राह नही देखती। उसकी मृत्यु अटल थी, तुम केवल कारण थी। इसमे तुम्हारा दोष नही है।"

मेघना काहीच बोलली नाही.

"पर जीवन तुम्हारे हातों मे है। उसे संभाल के रखो।"

मेघना ला रडण आवरत नव्हत. तिला बाबाचे शब्द नीटसे ऐकुही येत नव्हते. तिला अनिकेत सगळीकडे दिसायला लागला. तो गेलाय याची तिने नीट खात्री सुध्दा केली नव्हती. मोठ्ठा अपघात झालाय आणि त्याच्या मित्राचा आवाज ऐकुनच तिने काय नेमक झाल असेल हे ताडल होत आणि धावत बाबा कडे आली.

बिचारा एकटा पडला असेल तिथे, माझी वाट बघत असला वेडा विचार तिच्या मनाला रुतत होता.

"पण अनिकेतने काय केल होत की त्याचा अंत असा व्हावा. इतका चांगला होता तो. कधी कोणाचं वाईट केल नसेल त्याने. माझा जीव होता तो. आता कशी जगु मी. काय केल होत अस की माझ्या नशिबी हा भोग आहे"

बाबा काहीच बोलला नाही. त्याचेही डोळे पाणावलेले होते. तिची पाठ थोपटत तो दूर कुठे तरी शुन्यात बघत होता.

(समाप्त)

12/4/09

रेखांकित भाग ४

"कसली आयडिया आहे?" अनिकेत ने बाईक ला किक मारत थंडपणे विचारल.
"वर चल, सांगते?" त्याचा थंडपणा बघुन तिच्या कपाळावर आठ्यांनी घर मांडल.
"पिक्चर वाटतोय का तुला? कि आपण अस करु आणि तस करु. थोडी झाडा भोवती गाणी गाऊ या आणि मग विलन ची एंट्री" तो बारीक डोळे करुन शुन्यात बघु लागला.
"पण इथे विलन कोण आहे याचा विचार करावा लागेल. तुझ्या कपाळावरच्या रेषा कि माझ्या तळव्यात नाहिश्या होणार्‍या रेखा"
मेघनाच्या डोळ्यातुन परत गंगा-जमुना वहायला लागल्यात. दोघेही पावसात चिंब भिजले होते.
पहिल्या मजल्यावरच्या जोशी काकु खिडकी उघडुन भोचक पणे काय चाललय बघु लागल्यात.
"काय काकु, काय म्हणता ?" अनिकेतने कुचक्या आवाजात विचारल.
"काही नाही रे" त्या थोड्या वरमल्या मग चाचपडत म्हणाल्या "आत जा रे दोघे. सर्दी व्हायची. मेघना, नुकतीच तापातुन उठतेयस ना"
"हो खर सांगायच तर मलाही हिच्यासारख सर्दी -ताप हवाय. तुम्ही खिडकी बंद करुन घ्या, तुम्हालाही व्हायची सर्दी. नाहीतर इथे आमच्या जवळ येउन उभ्या रहा. काय बोलतोय ते ऐकु येईल नीट"
जोशी काकुंनी लगबगीने खिडकी लोटली.
"मेघना काय तमाशा लावलायस. जा बर आत. आधीच तब्येत बरी नाही या तुझी"
"लाज नाही वाटत का तमाशा म्हणायला?" मेघना फणकारली.
"तुला आत्ता जिथे जायचय तिथे जा पण मी तुझा पिच्छा असा सोडणार नाही या. मी तुला कधीच सोडणार नाहीया. जिथे जाशिल तिथे मी तुझ्या मागे-मागे येइन. मग तु कुठेही जा"
क्षणभर अनिकेत ला काय बोलाव सुचेना. त्याने गाडी बंद केली आणि स्टँड लाउन तो जिन्याच्या दिशेनी चालायला लागला. मेघना तशीच उभी होती.
"आत्ताच तर मारे सांगत होतीस की जिथे जाशिल तिथे मागे-मागे येइन म्हणुन, मग?"
वरची खिडकी पुन्हा किलकिली उघडली.
"काकु, आल घालुन चहा करा लौकर आणि सोबत भजी पण चालतील"
खिडकी घट्ट बंद झाली.
मेघनाला खुदकन हसु आल.

घरात आल्याबरोब्बर मेघनाने अनिकेतला घट्ट मिठी मारली. अनिकेतने काहीच हालचाल केली नाही.
"अस काय करतोस?"
तिला दूर सारत तो परत खिडकी जवळ गेला. "सांगतेस का काय ते?"
"फोटो काढायला हवा खिडकी जवळ. अनिकेत खिडकीवाले"
"सांग"
"मी दुसर्‍या कोणाशी लग्न करीन" अस म्हणुन ती क्षणभर अनिकेतची प्रतिक्रिया बघायला थांबली
त्याच्या चेहर्‍यावरची माशी सुध्दा हलली नाही.
"मला बोलवु नकोस म्हणजे झाल. अर्थात तो पर्यंत मी असलो तर"
"ऐक तर. बाबा ने सांगितल कि मी ज्याची परीणिता होणार त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि आपण धरुन बसलोय की मी तुझीच परीणिता होणार. मी जर का दुसर्‍याशी लग्न केल तर प्रश्नच मिटला"
अनिकेत मेघना कडे रोखुन बघत होता.
"अरे म्हणजे तात्पुरत...."
"कळल मला" तो तीक्ष्ण स्वरात तिला कापत म्हणाला. " म्हणजे माझ्या ऐवजी दुसरा कोणी तरी मरणार"
"काय करायच मग तुच सांग. मला काय हौस आहे कोणाला मारायची. माझ्या नशिबी कोणी मरणार तर त्याला मी काय करणार? पण तुला मी काही होउ देणार नाही एवढ नक्की" अस म्हणुन ती परत रडायला लागली.
"किती रडशील? काही झाल की नळ चालु" अनि त्रागाने म्हणाला. "शांत बस बर थोडी. मला विचार करु दे"
"हो, बोल मला अजुन. मीच ऐकुन घेते म्हणुन"
अनिच्या डोक्यात विचारांच अचानक वादळ उठल. त्याने सगळी आशाच सोडली होती पण मेघनाची युक्ती ऐकुन त्याला काही तरी होउ शकत या विचाराने हुरहुरी आली होती. पण अजुन कोणी मरणार या विचाराने त्याच मन कच खात होत.
तो नुसताच येर-झार्‍या मारु लागला.
"बोल ना, अस काय करतोस?"
"काय बोलु, काय अपेक्षा आहे तुझी?"
"हो म्हण फक्त म्हणजे झाल"
"अरे, गंमत वाटतेय का तुला? हो काय राख म्हणु" अनिकेत ओरडला.
"सॉरी, मला ओरडायच नव्हत.
थोडा वेळ अनिकेत काहीच बोलला नाही.
"अस कस अजुन कोणाला मरू देउ मी माझ्या ऐवजी?"
"अनि, तू कोणाला मारत नाहीयास. तू उगाचच मनाला घोर लाउन घेतोयस. आपण इथे कोणाच्या खुनाचा प्लॅन करत नाहीया. अस बघ की माझ्या नशिबी त्या दिवशी जसलीन सोबत त्या बाबा कडे जाण होत. मी नाही म्हणत असतांना त्या बाबा कडुन हे सगळ ऐकल, उगाचच का अस सगळ घडुन आल? यातुन मार्ग काढता यावा, यातुनही मार्ग निघु शकतो याची चिन्ह आहेत ही सगळी. काहीच माहिती नसत तर काय केल असत? आता सगळ माहिती असुन काहीच न करण हेच चुकीच ठरेल."
मेघनाचा युक्तीवाद वर्मी लागला.
"बरं ठीक आहे. तु म्हणतेयस तस करु"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.
"आई येतेय परत"
अनि ने मोठ्ठा उश्वास सोडला.
"आई येतेय तर मी काय करु?"
"नाही ग, तस काही म्हणत नाही या. निघतो मी. मगासचे ओले उभो आहोत. तु तर नुकतीच तापातुन उठलीयस. आराम कर आता. मला ही खुप थकल्या सारख वाटतय"
"हस ना एकदा"
"रात्री फोन कर."
"हो करीन पण तू हस ना एकदा.
"काय करतेयस लहान पोरी सारख"
"प्लीज..."
"मेघना..." अनिकेतला हसु आल. तो दारा बाहेर पडला.
"नाही सोडणार अशी. माझ्याशी गाठ आहे." डोळे बारीक करत तिने हसत दरवाजा लावला.

---
अनिकेतने गाडीला किक मारली. वर बघितल तर मेघना खिडकीतुन बघत होती. त्याने गाडी वळवली आणि अंगणातुन बाहेर पडला. पाऊस अजुनही पडत होता. त्याला घरी जावस वाटत नव्हत. हळु-हळु गाडी चालवत तो मुख्य रस्त्यावर आला. कुठल्या मित्राकडे चक्कर मारावी याचा विचार तो करत होता. पण त्याच मन सारख मेघनाने सुचवलेल्या गोष्टी भोवती वळसे घालत होत. खरच का मेघना ने दुसर्‍याशी लग्न केल तर आपला जीव वाचु शकतो? पण नशिब अश्यानी बदलत असत तर त्याला नशिब म्हणलच नसत. मेघना दुसर्‍या कोणाशी लग्न करणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात समोरुन कोणीतरी अनि अशी आरोळी देत वेगाने निघुन गेल. कोण होत ते अनिच्य लक्षात नाही आल. त्याने उगाचच पाठमोर्‍या आकृतीला हात दाखवला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन तो पुढे काय करायच याचा विचार करु लागला.

इकडे मेघनाला हलक वाटत होत. असल्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढला या वर तिचा अजुनही विश्वास होत नव्हता. नविन मार्ग कठीण होता खरा पण असल्या अभद्र खेळाला असलीच शहनिशा देण आवश्यक होत. तिने भिजलेले कपडे बदलले. आणि अंथरुणावर अंग टाकल. तिच्या डोक्यात गेले दोन तास घडलेल सगळ घिरट्या मारत होते. अनिकेतचे बाणासारखे टोचणारे शब्द, त्याच असहाय रडण, आपल्या डोक्यातली भन्नाट कल्पना सगळ सगळ चित्रपटासारख डोळ्यासमोर फिरत होत. जोशी काकुंचा भोचकपणा आठवुन तिला हसु आल. त्या आईला नक्कीच काहीतरी बोलणार मग आईला काय सांगायच याचा विचार ती करु लागली. आईने मागेच आडुन-आडुन अनिकेत बद्दल विचारल होत. आता अचानक माझ्यासाठी स्थळं बघा हे कस सांगायच. आणि अमेरिकेला जायच काय करायच? आणि लग्न करण म्हणजे काय गंमत थोडीच आहे. दुसरा पुरुष आपल्याला स्पर्श करणार या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. तिने पांघरुण घट्ट छातीशी घेतल. एका उत्तराने प्रश्नांच नविन जाळ विणल होत. तिला डुलकी लागली.

अनिकेतने गाडीला परत किक मारली. अक्षरशः वाट फुटेल तिथे तो जात होता. आत्ता खर तर मेघना सोबत पावसात भिजत फिरायला मजा आली असती. रस्त्यावरचे खड्डे चुकवत तो एक हात सोडुन संथपणे गाडी चालवत होता. पाऊस परत सपाट्याने पडायला लागला होता. पावसाचे थेंब छोट्या-छोट्या सुया टोचाव्यात तसे तोंडावर टोचत होते. 'च्यक्' असा आवाज काढत त्याने गाडी परत रस्त्याच्या कडे लावली आणि एका मोठ्ठ्या डेरेदार झाडाच्या आडोश्याला जाउन उभा राहिला. आजु-बाजुला बरीच लोक उभी होती. कोणीच कोणाशी फारस बोलत नव्हत. सगळे नुसताच पाऊस बघत होते. बाजुच्या ठेल्यावरचा चहावाल्याने नविन आधण चढवलेल होत. त्या वासाने सगळीच लोक चहा घेत होती. अनिही चहाचे भुरके मारायला लागला. त्याच्या डोक्यात विचार परत घोळका मांडायला लागलेत. 'लग्न करण म्हणजे गंमत थोडीच होती. मागेच मेघना सांगत होती की तिची आई विचारत होती आपल्या बद्दल ते. आता मेघना त्यांना काय सांगणार त्यांना? स्थळं बघा म्हणुन? च्यायला थोडं बर वाटत होत तर हे सगळे प्रश्न समोर बोहारल्या सारखे उभे. कसल्या जाळ्यात फसतोय, निघण्याचा जितका तडफडात करतोय तितकाच अजुन अडकतोय. तेवढ्यात झाडा समोर उभी असलेल्या लाल गाडीचा दरवाजा एका माणसाने उघडला. त्याला भरगच्च मिश्या होत्या आणि अंगाने तो चांगलाच बलदंड होता. हा माणुस इतक्या वेळ आपल्याच बाजुला उभा होता हे त्याच्या लक्षात आल. या माणसाला कुठे तरी आधी बघितल होत. गाडीत बसतांना तो अनिकेत कडे बघुन उगाच हसला. अनिकेतला कळेना तो माणुस का हसला ते कळेना. तो डोळे बारीक करुन त्या माणसाला बघायला लागला. ती लाल गाडी निघुन गेली. अनिकेतला परत तंद्री लागली. 'अमेरिकेला जायच काय करायच? मी पुढे जायच का, की पुढल्या वर्षी पर्यंत वाट बघायची. बरं, अमेरिकेला नाही गेलो तर आई-बाबा विचारणार, तर त्यांना काय उत्तर द्यायच? मेघनाच लग्न झाल्यावर तिला भेटण पूर्ण बंद होइल. किती दिवसां साठी? शी..आपणही निर्लज्जा सारख कोणाच्या तरी मरण्याची वाट बघत बसायच, गिधाडा सारख.
"साहेब, पैसे" पोर्‍याने अनिचा हात धरुन हलवल.
अनिने त्याला पैसे दिले. त्या पोर्‍याच्या कपाळावरच धगधगीत लाल गंध मजेशिर दिसत होत.
'आपण टेकडीवरच्या मंदिरात चक्कर मारायला हरकत नाही'
पाउसही कमी झाला होता पण अजुन थांबला नव्हता.
त्याने गाडीला किक मारली. पण गाडी रस्त्याच्या कडेवरुन अचानक घसरली आणि किक त्याच्या पोटरीवर सपकन बसली.
अनिकेतने शिवी हासडली.
"संभाल के भाऊ" झाडाखालुन कोणी तरी ओरडल. "रूक जाओ अभी. और एक चाय मार के जाओ"
अनि ने लक्ष दिल नाही. तो मंदिराच्या रस्त्याला लागला.
'बाबावर आपण एवढा विश्वास का टाकतोय याचा तो विचार करु लागला.
'त्याच चुकल असेल तर कोणी मरायच नाहीच आणि मेघना दुसर्‍याशी लग्न करुन बसायची. म्हणजे मी घर का ना घाट का असा अधांतरी लटकत राहीन.'
त्याला हे सगळे विचार नकोसे झाले होते. मंदिरात जाउन बर वाटेल अस त्याला वाटत होत.
समोरचा गाडीवाला इतकी हळु चालवत होता. ते बघुन अनिकेतला राग आला. त्याने दोन-तीनदा हॉर्न वाजवला पण ती गाडी ढिम्म हलेना. शेवटी त्याने गती वाढवली आणि उजवीकडुन गाडी घातली. ती गाडी कोण चालवतय बघितल तर झाडाखाली उभा असलेला मुच्छड गाडी मंदपणे गाडी चालवत होता. त्याला बघण्याच्या भानगडीत अनिच्या समोरच्या दिव्याच्या खांबाकडे गेल नाही. रस्ता रुंदीकरण्याच्या भानगडीत आधी रस्त्याच्या कडेला असलेले दिवे आता जवळपास रस्त्याच्या मधे आले होते. शेवटच्या क्षणाला अनिने त्या खांबाकडे बघितल पण तो पर्यंत उशीर झाला होता.
'म्हणजे एवढ सगळ करुनही तो मीच होतो' असा काहीसा विचार त्याच्या मनात वीजेसारखा चमकला आणि क्षणार्धात, पाखरु खिडकीच्या काचेवर आपटाव तसा तो खांबावर फाटकन आदळला.


"मेघना, उठ बाळा ५ वाजायला आलेत. कधीची झोपलीयस. "
मेघनाने डोळे खाडकन उघडलेत. तिच ह्र्दय धड-धड करत होत.
"आई, परिणिता म्हणजे नक्की काय?" तिने घाबरत आईला विचारल.
"म्हणजे?"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजायला लागला.

(क्रमशः)

हा भाग लिहायला बराच उशीर झाला त्या साठी क्षमा असावी. पुढल्या भाग या गोष्टीचा शेवटचा असणार आहे. श्री अंबरीश यांनी प्रत्येक भागाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

11/2/09

आगामी लेख

बर्‍याच दिवसात काही लिहिल नाही याच निमित्त धरुन लिहितोय. आगामी लेख या शीर्षका खाली लिहितोय खर पण आगामी लेखात प्रकाशित झालेले लेख या सदरा अंतर्गतच बरेच दिवस तिठत उभे आहेत. पण सध्या काही इलाज नाही. खुप काम आहेत त्यातुन पर्यटन बरच झाल त्यामुळे अजुनच कमी वेळ मिळाला. मधे आमचे आई-वडिल इथे आले होते त्यात व्यस्त होतो. बर्‍याच घटनांवर लिहायचा मानस होता पण तो मानसच राहिला. यावरुन लक्षात आल की सध्य परिस्थितीवर मी गेल्या बरेच दिवसात एकही लेख लिहिलेला नाही. कोणाच काही अडल नाही पण माझ इंग्रजी ब्लॉग फक्त सध्य-परिस्थितीवरच असतो आणि मराठी ब्लॉग त्याच विषयांवर पण मराठीत अश्या विचारानी सुरु केला होता. सुरुवातीला बरेच लेख लिहिलेही पण जसा जसा वेळ कमी मिळतोय तस फक्त कथाच लिहिल्या जाता आहेत.

कथा कधी लिहिन अस वाटल नव्हत. अचानकच लिहायला सुरुवात केली आणि लिहितच गेलो पण नेहमी एक प्रश्नचिन्ह समोर असत, एक भिती मनात असते की जे लिहितो आहे ते वाचण्याजोग आहे का? जे मांडतो आहे, रंगवतो आहे किंवा निदान तसा प्रयत्न करतोय ते मनोरंजक आहे का? लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे कळण्याचे मार्ग ठळक नाही. मोजकी लोक प्रतिक्रिया टाकतात आणि ब्लॉगवर भेट दिलेल्यांची संख्या वाढतांना दिसते पण तेवढच. घरी आमचे वडिल बंधु आणि मातोश्री प्रत्येक लेखास प्रतिक्रिया नेमाने देतात. दोन मित्र नित्य-नेमाने लिहिलेल वाचतात. या त्यांनी दिलेलं प्रोत्साहनची शिदोरी खुप वेळ पुरते हे मात्र खर. बरेच लोक म्हणतील कि लोकांच्या प्रतिक्रियांच काय लोणच घालायच आहे. आपल्याला आवडेल ते आणि मनाला रुचेल तस लिहित रहा. काही नाहीतर स्वतःच्या आनंदासाठी लिहि. विचार वाईट नाही पण स्वानंदासाठीच लिहायच तर दररोज डायरी लिहीली तरी पुरे आहे त्यासाठी एवढा ब्लॉग लिहायचा खटाटोप करून निरर्थक शब्दांच ओझ लोकांवर टाकण्यात काय अर्थ? काहीच नाही. खरच काही नाही. त्यापेक्षा न लिहिलेल बर किंवा न बोललेल बर. आमचे आजोबा त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगत की त्यांच्या काकांना जेवणाच्या पानावर भ्र काढलेलाही चालत नसेल. बोलायचच झाल तर "श्रीहरी श्रीहरी" एवढच म्हणायच. अजुन हव असेल तर स्वत: घ्याव. नियम फार कडक पाळल्या जात असे. पण मला कढी आवडली हे श्रीहरीच्या नादात सांगण थोड गंमतीदारच असणार.

भिती अशी वाटते की ब्लॉग लिहिण्याच्या भानगडीत वायफळ बडबड होत असेल तर ते कळणारच नाही आणि त्या नादात देवाचही नाव घेतल्या जाणार नाही.

9/23/09

जगाच्या पाठीवर

लोकांकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा माझ मन एक वेगळाच खेळ खेळत असत. हा जो मनुष्य माझ्या समोर उभा आहे तो या स्थितीत कसा पोचला. समोर भिकारी असेल तर तो भिकारी कसा झाला? त्याचे आई-बाबा पण भिकारीच होते का? त्याच लहान पण कस गेल असेल? भिक मागण्यातच का? तो लहान असतांना समाज स्थिती कशी होती? समोर चांगल्या पोषाखात कोणी उभा असेल तर त्याने तरूणपणात कुठले निर्णय घेतले असतील? की तो श्रीमंत घरात जन्मला होता आणि आयुष्यभर एक काडी इकडची तिकडे न करता तो ऐष करत जगला? अर्थात मी प्रत्येकाला जाऊन "तुम यहां पर कैसे पोहोचे?" अस विचारत नाही. तसं करण थोड विनोदीच ठरेल पण अश्या दृष्टीने बघायला लागल की जग वेगळ्याच रंगात दिसायला लागत. माझ्या आजोबांच बालपण १९१० च्या दशकात गेल. तेंव्हा वीज नव्हती, विमान नव्हती आणि इंटरनेटही नव्हत. पण त्यांच्या मृत्युच्या आधी त्यांनी सगळं बघितल. त्यांच्या लहानपणी लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व करत होते तर ते जायच्या वेळी कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याची वैयक्तीक मालमत्ता झालेल होत. त्यांच्या लहानपणी जात-पात मानल्या जात असे तर त्यांच्या हयातीत दलित व्यक्ती भारताचा राष्ट्रपती झालेला होता. वैयक्तीक तसच सामजिक पटलावर एवढा प्रचंड बदल घडलेला होता की जर का त्या पिढीला बोलत केल तर इतिहासाच एक आगळ-वेगळ दालन उघडेल.

सामाजिक बदलांना आपण सध्या बाजुला ठेउया. तो वेगळा विषय ठरेल. वैयक्तिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ति स्वतःतच एक कथा असते. काही कथा रोमांचक असतात तर काही भीषण असतात. काही अगदीच सपक असतात तर काही स्फुर्तीदायक असतात. पण या कथाच जगाला रंग देतात. जगात करोडो लोक निवास करतात. मला नेहमी वाटत की कृष्णाने विश्वरूप म्हणजे नेमक हेच दाखवल आणि अर्जुनासारखा पुरुष ते बघुन घाबरला. आपण सामान्य जन हे भीषण रूप बघण्याच्या लायकीचे नसतो आणि अनभिज्ञपणे आपल आयुष्य कंठत असतो. जगाच सोडा, आपल्या आजु-बाजुला, ओळखीचे आणि नुसते तोंड देखले ओळख असलेल्यां पैकी किती लोकांबद्दल आपल्याला माहिती असते. काही यशस्वी असतात आणि अपयशी. पण कुठलाच व्यक्ती अपयशाची अपेक्षा ठेवत नाही. आणि प्रत्येकातच यशस्वी होण्याची कुवत नसते. म्हणुनच व्यक्तीमत्वे प्राप्त आकार घेतात. प्राप्त परिस्थितीत आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांच्या चौकडीत प्रत्येक मनुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. मूळ स्वभाव बदलत नाही हे जरी मान्य तरी मनुष्य स्वभावाच्या ज्या विविध छटा दिसतात त्यात सोबतीच्या लोकांचे पडसाद आणि आजुबाजुच्या जगाची छायेतच वावरतो.मनुष्य घडविण्यात इतक्या सार्‍या घटना सामिल असतात की त्या व्यक्तिला सुध्दा बर्‍याचश्या गोष्टींची कल्पना नसते. पण लोकांना बोलत केल तर त्यांच्या आयुष्याचीच नव्हे तर त्यांच्या आजु-बाजुच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत.

आपण आपल्यातच इतके गुंग असतो की जगाला आपण एका विशिष्ट चौकडीत बांधुन टाकतो. ज्या आकलनी पडतात त्यांना आपण स्वतःला मध्यबिंदु ठरवुन विभाजित करतो. हा व्यक्ती माझ्या पेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याच यशस्वी होण सहाजिकच आहे. तो जर का अपयशी ठरला तर आपण हसतो. या व्यक्ती पेक्षा आपण हुशारच होतो त्यामुळे आपल यशस्वी ठरण सहाजिकच आहे आणि जर का तो यशस्वी ठरला तर नशिब साल्याच! ज्या गोष्टी आकलनाच्या पलिकडे असतात त्याचा आपण विचारच करत नाहीयात यशापयाशाच्या व्याख्या सुध्दा स्वतःला माप-दंड ठरवुन आपण आखतो. या सगळ्या खेळात मी महत्त्वाचा. शिवा-शिविच्या खेळात मीच दाम देणार आणि मीच पळणार. गमतीदारच प्रकार आहे थोडा पण सगळेच खेळत असतात म्हणुन कोणी कोणाला विचारत नाही.

आपण समाजात राहुन, स्वतःला सामाजिक प्राणी म्हणवतो आणि आयुष्यभर समाज विन्मुख जगतो.

यावर उपाय काय मलाही माहिती नाही. जागतिकीकरणाच्या अर्थशास्त्रानुसार आज जग एकामेकांवर अधिकाधिक अवलंबुन रहाणार आहोत. थोडक्यात आपल्याला एकामेकांच्या आयुष्यात डोकावुन बघावच लागणार. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरितच आहे. बारकाईने बघितलत तर आपण एकामेकांपेक्षा अजुन दूर जातो आहोत हेच ध्यानात येत. खरतर आजच्या काळात प्रसारण माध्यमांचा इतका सुळसुळाट झाला आहे की जगाच्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक लहान्-मोठ्या घटनेला जगभर प्रक्षेपित केल्या जात. जग लहान होण्याचे परिणाम मात्र विपरीतच होतो आहे. पराकोटीला गेलेली प्रत्येक वस्तु धुळीसच मिळते त्या प्रमाणे अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्याचे परिणाम, माहिती मुळीच उपलब्ध नसण्यासारखेच आहे. जगात असलेल्या पीडांचा, ज्यांच्यावर गुजरत नसते त्यांना मुळीसुध्दा फरक पडत नाही, किंवा ती लोक मुळीच फरक पडुन घेत नाहीत. यात प्रसार माध्यमांची सुध्दा बरीच चूक आहे. उपलब्ध बातम्यांतुन जणु ही माणुसकीच गाळुन टाकतात आणि रहाते फक्त बातमी. इतके-इतके मेलेत, मग ते वाहुन गेलेत काय किंवा बंदुकीनी कोणी मारलेत काय किंवा सगळ्यांनी आत्महत्या केली काय, एकच आहे.सगळ्यांनी उठुन बाबा आमटे बनाव अस माझ म्हणण मुळीच नाही पण जगाकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातुन थोडं मायेने बघितलआणि संवाद साधला तरी पुरेसे आहे.

9/14/09

रेखांकित भाग ३

ताप उतरल्यावर लगेच मेघनाला घरी आणल. ताप सोडला तर बाकी सगळ ठीक होत पण तिने ताप चांगलाच अंगावर काढला होता. तिल घरी येऊन एक आठवडा व्हायला आला होता तरी तिचा थकवा काही जायच नाव घेत नव्हता. घरच्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तिला अचानक एवढा फणफणुन ताप यायला झाल काय? डॉक्टरांनाही काहीच कळेना. शहरात कुठली साथ वगैरे सुध्दा सुरु नव्हती. अजुन काही कमी असेल तर घरी आणल्यापासुन मेघना पहिल्यासारखी वागत नव्हती. नुसती शांत बसुन असायची. तशी ती फार बोलकी होती अस नाही पण तिने आता एकदम अबोला धरला. तिच तापातल असंबंध बोलण बघुन डॉक्टरांनी काही मानसिक तर दुखण नाही ना याची चौकशी केली होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांची काळजी अजुन वाढली
जसलीनच जाण-येण वाढल होत. एकदा मेघनाच्या आईने तिला विचारल की काय चाललय म्हणुन पण तिच्याकडुनही फारस काही बाहेर आल नाही.

"अनिकेत कुठे असतो आजकाल?" मेघनाने विचारल.

"माहिती नाही मला पण तुम्ही दोघेही अमेरिकेला जायची तयारी करताय ना? त्यातच गुंग असेल तो." जसलीन उत्तरली.

जणु काही घडलच नाहीया अस त्या दोघी बोलत होत्या.

"का ग तुझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही या का? कि मी देउ तो?" उगाच खौटपणे ती पुढे बोलली.

थोडा वेळ कोणीच काही बोलल नाही. मेघना नख खात होती आणि जसलीन पुस्तक चाळायला लागली. "खुप उकडतय. पाऊसही पडत नाहीया. पावसाची चाहुल लागताच वीज जाते. पंखे बंद" जसलीन गरमीने त्रस्त झाली होती. आकाशात ढगांनी गर्दी केंव्हाची केलेली होते. मुहुर्ताची वाट बघत त्यांनी वार्‍याचा व्यवहार थांबवला होता.

"फोनवरही तो इतका तुटक-तुटक बोलतो की काही न बोलल्यासारखच असत. जे विचारल तेवढ उत्तर देतो. 'कसा आहेस?' तर उत्तर येत. 'छान' आणि मग शांतता. 'मी कशी आहे विचारणार नाहीस का?' तर उत्तर येत की 'कशी आहेस?'

आता काय करू सांग" मेघना म्हणाली.

"त्याच्या डोक्यात काय चाललय मला नाही माहिती पण विचार कर तुला कोणी सांगितल की तुझा मृत्यु अटळ आहे वगैरे तर काय बितेल तुझ्यावर? मला तर कल्पना करणही अशक्य आहे" जसलीन म्हणाली.

" आणि माझ्यावर काय बितते आहे हे तुल दिसत नाही हे बरय. माझ्य नशिबि तो मरणार आहे. माझ नशिब फत्थर आहे. मी नाट आहे. मी नसती तर तो सुखात असता. मी नसती त्याच्या आयुष्यात तर त्याला..." मेघना एकदम शांत झाली.

"...तर त्याला आयुष्य होत" अस म्हणत ती रडायला लागली. "पण तो भेटत का नाहीया? मला आता राग येतोय त्याचा"

"किती वेळा सांगितल की तोच-तोच विचार मनात घोळवु नकोस. म्हणुनच तू बरी होत नाहीयास. तुझा थकवा जात नाहीया. आणि वा, तुला त्याचा राग येतोय! छान! " मग काही क्षण थांबुन जसलीन पुढे म्हणाली.

"मला माहिती नाही की मी हे तुला सांगायला हव की त्यानीच तुझ्याशी बोललेल बर पण तु हॉस्पिटल मधे असतांना मी त्याला बाबा बद्दल सांगितल. त्या नंतर तो बाबा ला स्वतः भेटायला गेला होता. बाबाने त्याला काय सांगितल मला नाही माहिती पण तो त्यांनंतर अजुन काही भविष्य सांगणार्‍यांकडेही गेला होता."

"मग?"

"मला त्याने फारस सांगितल नाही. पण तो एवढच म्हणाला.." जसलीन बोलायच थांबुन गेली

मेघना डोळे विस्फारुन करुन तिच्या बोलण्याची वाट बघत होती.

"तोच सांगेल तुल पुढच"

"आत्ता पर्यंत का लपवलस? सांग काय म्हणाला तो"

"मेघना" अस म्हणत जसलीननी मोठ्ठा श्वास सोडला.

"तो एवढच म्हणाला की कोणीच त्याला भविष्य सांगायला तयार नाही. सगळ्यांनी त्याला परतावुन लावल."

तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.

"अनि येतोय"

"बर, त्याला सांगु नकोस की मी तुला काही सांगितल म्हणुन"

"हो"

"मी निघते. काळजी घे. काकु विचारत होत्या सारख की मेघनाच काय चाललय म्हणुन"

"तु काय सांगितलस?"

"मी काय सांगणार. पण तू त्यांना अनिकेत बद्दल सांगुन टाक लौकर. अजुन उशीर करून काय होणार."

"काय सांगणार, दगड" मेघना पुटपुटली.

"बघ, झाली सुरुवात परत. इतक्या दिवसांनी भेटतोय तर थोडा प्रसन्न चेहर्‍याने स्वागत कर त्याच. तो चांगल्या मुड मधे नसणार॑"

"जसलीन, तू अजुन काही तरी लपवतेयस माझ्यापासुन" मेघना भुवया वर करत म्हणाली.

"काही गोष्टी मी न सांगितलेल्या बर. आणि काही गोष्टी त्यानेच तुला सांगितलेल्या बर्‍या, मी मधे पडण बरोबर नाही"

मेघना काहीच बोलली नाही. अनिकेत आल्यावर काय बोलाणर होणार या विचारात तिच मन धाव-पळ करत होत.

जसलीन गेल्यावर दहा मिनिटातच दाराची घंटी वाजली.

"घरी कोणी नाहीया का?" अनिकेतने घरात पाऊल ठेवताच विचारल.

"नाही"

तो खिडकीजवळ जाऊन बाहेर बघु लागला. त्याने नेहमीप्रमाणे खिशात हात घातले होते. "कुठे गेलेत सगळे?"

"घरातल्यांना भेटायच असेल तर नंतर ये. आत्ता फक्त मीच भेटु शकते" ती त्रस्तपणे उत्तरली.

अनिकेतने घरात जणु डाव्या पायाने आला होता. आल्यापासुन अनिकेतच तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हत हे बघुन मेघना आतल्या आत धुमसायला लागली होती.

"मी काही खाणार नाहीया तुला" ती फणकारली.

"किती गोड स्वागत करतेयस माझ. मला एकदम छान वाटतय बघुन" अनिकेत तुटक्या आवाजात मागे वळुन म्हणाला.

"इतक्या दिवसांनी भेटलास, विचारल तरी का की मी कशी आहे ते"

"किती वेळ झाला मला घरात पाऊल ठेवुन?" अनिकेत मनगटावरच घड्याळ तिच्या समोर नाचवत म्हणाला. तोही पेटला होता. " जेमतेम चार मिनट झाली असतील. आणि तुझा सुंदर मुखडा बघुन कुठुन इथे आलो अस झालय मला"

"मग आलाच कशाला? फोनवरच तुझ बोलण पुरत मला"

"मेघना, डोक चरायला गेलय तुझ" अनिकेत दात-ओठ खात म्हणाला.

"अस बोलायच असेल तर जा तू इथुन"

अनिकेत ने काहीच उत्तर दिल नाही. तो खिडकीतुन परत बाहेर बघायला लागला. काही क्षण असेच गेलेत.

"नको ना भांडुस असा" मेघना काकुळतेने म्हणाली.

दोघांनांही असली भेट अपेक्षित नसावी. कसल्यातरी विचारात दोघेही मग्न झालेत. कोणीच काहीच बोलेना. इतक्या दिवसांची भेट अस रूप घेइल अस तिला वाटल नव्हत. तिला अनिकेतला घट्ट मिठी माराविशी वाटत होती. त्यानी आपल्याला कुशीत घ्याव आणि लाड करावे अशी तिची अपेक्षा होती. पण तस काहीच घडल नाही. अवघडल्यासारखे दोघे भेटलेत आणि एकामेकांवर निखारे बरसवत होते.

मगापासुन मुहुर्ताला खोळंबलेला पाऊस शेवटी पडायला लागला. इतका वेळ दाटुन आल होत पण पाऊस जोरात पडत नव्हता. थेंबांची एकच रीघ संथपणे पडत होती.

मेघनाकडे न बघताच त्याने विचारले, "राणी तू कधी आरश्यात स्वतःला बघितल आहेस का?"

मेघनाला कळेना तो थट्टा करतोय कि खरच विचारतोय.

"म्हणजे?" तिने चाचपडत विचारल.

"वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि तुझ लग्न शुभ मंगल सावधान" तो हसत म्हणाला.

"काय बोलतोयस अनि?" मेघनाला तो काय बोलतोय अजुनही कळेना. त्याच ते हसण विक्षिप्त होत.

"तुला मातीचा वास येतोय का?" अनिकेत तंद्रि लागल्यासारखा बोलत होता. "पाऊस पडायला लागला की लोक वेगळेच वागयला लागतात. एकदम ताजे-तवाने दिसायला लागतात. त्यांच्या नकळत. आणि पावसा नंतर सगळीकडे चिखल आणि घाण होत असली तरी पाऊस निदान आधीची घाण वाहुन घेऊन जातो. नाहितर नविन घाणीला जागा कशी मिळणार? हे चक्र सदैव चालू असत. कधीही न संपणारा शिवा-शिविचा खेळ. निसर्गाच्या प्रत्येक चालीत हा खेळ दिसतो."

काही क्षण तसेच गेलेत. मेघनाच्या मनात शुन्य होत तर अनिकेतच्या मनात विचारांची धांदल उडाली होती.

"तुला मातीचा वास आवडतो का सांगितल नाहीस?" तो अजुनही मेघनाकडे बघायला तयार नव्हता.

"हो"

"मला खुप-खुप आवडतो. नव-निर्मितीचा वास असतो तो" त्याने पहिल्यांदा मेघनाकडे वळुन बघितल. "बाकी माझी बडबड सोड, पण मी हा वास खुप मिस करणार आहे"

मेघनाला त्याच्या अगम्य बोलण्याचे चटके जाणवायला लागले होते. अनिकेतला तत्त्वज्ञान वाचण्याची आवड होती आणि तो बर्‍याचदा आपल्याच धुंदित बोलत असे. पण असल आत्यंतिक आणि अधांतरी तो कधी बोलला नव्हता. तो हळु-ह्ळु निखारे शिलगवत होता.

"अस काय बघतेस?, भूत बघितल्या सारख."

"मला घाबरवु नकोस अनि"

त्याच्या बोलण ऐकुन आपण गेले आठवडाभर मी-मी चा घोष लावलाय आणि आपल्या नशिबिचा खरा भोग अनिकेतला आहे या जाणिवेचा साप तिला पहिल्यांचा डसला. परिस्थिती अजुन बिकट होत होती.

"तुला माझी भीती वाटायला लागली. मी अजुन भूत झालो नाहिया राणी!" अस म्हणुन तो जोरात हसायला लागला. "पण लौकरच"

तो परत उठुन खिडकी जवळ गेला. त्याच्या अंगात कसल तरी भूत संचारल होत.

"सुर्यास्त बघायला तुला आवडतो का? मी पण मगापासुन हे आवडत का ते आवडत का, अस बावळटासारख विचारतोय. सगळ्यांनाच सुर्यास्त बघायला आवडतो. पण का आवडतो माहितीय? कारण, सगळ्यांना माहिती असत की दुसर्‍या दिवशी सुर्योदय होणार आहे. अस समज की सुर्योदय होणारच नाहीया आणि आत्ताचा समोरचा सुर्यास्त शेवटला आहे, मग कस वाटेल? डोळे भरून सुर्यास्त बघशील की डोळे भरून रडशील?"

"अनि, अस विचित्र नको बोलुस. मला भीती वाटतेय. अस काहीही होणार नाहीया. आपण यातुन मार्ग काढणार आहोत ना? अस काय करतोस? तूच तर म्हणाला होतास ना हॉस्पिटल मधे की काही तरी करू म्हणुन मग आता अस का बोलतोयस?"

अनिकेत नी पहिल्यांदा तिच्या कडे वळुन बघितल. "तू जसलीनशी बोललीस ना मगाशी. परत सांगु का काय झाल ते?"

"नको. माहितीय मला. मला नाही इच्छा ऐकायची."

"तुझ्या लक्षात येतय का मेघना की तू अशी वागतेयस की त्रास फक्त तुलाच होतोय"

"नाही अनि, अस नको म्हणुस, प्लीज" ती रडवेल्या सूरात म्हणाली. "तुझ्यावर का बितते आहे याची मला कल्पना.."

"मेघना, मला मीच आरश्यात दिसत नाही." मेघनाच वाक्य कापत तो तिच्या जवळ आला. त्याचे डोळे भरून आले होते. ते बघुन मेघनाला भडभडुन आल. तिने केविलवाणा असह्य हुंदका दिला.

" मला माझ प्रतिबिंब दिसत पण त्यात बिंब नसत. जणु शरीराची प्रतिमा आहे पण त्यात जीव नाही. मी कितीही आरडा-ओरडा केला तरी ते तसच निश्चल आणि निर्जिव उभ रहात. माझ बिंब शेवटल मावळतांना बघण्याची अगतिकतका माझ्या नशिबी आलीय" अस म्हणुन तो उठला.

" नको जाऊस कुठे आत्ता" तिने त्याचा हात घट्ट धरला.

"मला खुप भीती वाटतेय मेघना. पण यातुन काही मार्ग नाही. मला एकट सोड आणि तू तूझ्या मार्गाने जा. तुझ्या समोर मार्ग आहेत. माझे संपलेत."

"अनि, तु हॉस्पिटल मधे खोट बोललास माझ्याशी"

"मेघना, काय खर आणि काय खोट? बोललो मी खोट, काय करणार आहेस? कोणी माझ काही बिघडवु शकत नाही"

"पण तू म्हणालास की काही तरी मार्ग काढु" मेघना खुळ्यासारखा तो पदर काही सोडत नव्हती.

"तुला परिस्थिती कळतेय का मेघना? काय मार्ग-मार्ग लाउन बसलीयस. तो शब्दसुध्दा थोडा कॉमेडीच वाटतोय. कुठल्या जगात वावरतेयस राणी? जागी हो. बघ माझ्याकडे एकदा. नंतर दिसणारसुध्दा नाही.

मार्ग, डोबंल मार्ग, त्याची तर..." अस म्हणत त्याने शिवी हासडली.

बघ, माझे हात? बघ..." अनिने हाताचे पंजे तिच्यासमोर नाचवले. "पांढरे फटक आहेत. काहीच रेखाटलेल नाहीया. रस्त कड्यावरून कोसळुन नाहीसा व्हावा तसा मी माझ्या हातावरच्या रेषांच्या गर्तात नाहीसा होणार."

त्याने मान टाकली. "मला मरायच नाहीया मेघना. अजुन काहीच केल नाही, काहीच बघितल नाही. असा कसा चालला जाउ. आई-बाबांना, मित्रांना, तुला टाकुन कसा जाऊ. हा कसला घाणेरडा खेळ चाललाय.." त्याच्या तोंडुन शब्द फुटेनासे झालेत.

विसर मला..." अस तो कस तरी म्हणत धावत निघुन गेला.

मेघना उशीत डोक घालुन एकटीच असह्य रडत बसुन राहिली. पण तिच्या डोक्यात अचानक काही तरी पेटल. ती दार उघडुन धावत खाली अनिकेत ला थांबवायला गेली.

"अनि"

"मेघना, काय करतेयस, लोक बघतायत" तिचा अवतार अणि आवेश बघुन अनिकेत म्हणाला.

"तु चल वर परत"

अनि काही बोलायच्या आधीच ती म्हणाली "माझ्याकडे एक आयडिया आहे"

(क्रमशः)
श्री अंबरीश यांनी हा भाग लिहिण्यास मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

8/20/09

झांशीवाली रानी

सिंहासन् हिल उठे, राजवंशो भुकटी तानी थी।
बुढे भारत मे भी आई, फ़ीर से नई जवानी थी।

घुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहेचानी थी।
दुर फिरंगी यो करनी की, सबने मन मे ठानी थी।

चमक उठी सन् सत्तावन मे वह तलावार पुरानी थी।
बुन्देल हरबोलोन् के मुह, हमने सुनी कहानी थी।
खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी।

रानी गयी सीधार चिता अब उसकी दीव्य सवारी थी।
मिला तेज से तेज, तेज की वही सच्ची अधिकारी थी।

अभी उम्र कुल तेईस की थी, मनुज नही अवतारी थी।
हम को जीवित करने आयी बन स्वंतत्रता नारी थी।

दिखा गयी पथ, सिखा गयी हमको जो सीख सिखानी थी।
बुन्देल हरबोलोन् के मुह, हमने सुनी कहानी थी।
खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी।


--- सुभद्राकुमारी चौहान