Showing posts with label आगामी लेख. Show all posts
Showing posts with label आगामी लेख. Show all posts

3/16/10

आगामी लेखांच्या निमित्ताने

सध्या दोन आघाड्यांवर लेखन चालू आहे. एका नविन दीर्घ कथेच्या बांधणीत बरीच कष्ट लागता आहेत. अर्थात, हे अपेक्षितच होत. पण मी आत्ता पर्यंत ज्या पध्दतीने लिहित असे त्या ऐवजी नविन मार्गाने लिहिण्याची खटपट चालली आहे. आत्तापर्यंत साधारणा गोष्टीची रुपरेखा मनात असली म्हणजे मी कथाभाग प्रकाशित करायला लागत असे. त्याचा फायदा असा की वाचकां समोर काहीतरी ठेवता येत असे आणि भागांमधे प्रकाशित करण्यात कथा उत्कंठा वर्धक करण्याची संधी मिळे. पण तोटा असा की कथा पूर्ण झाल्यावर मला मनात वाटे की हे अजुन लिहायला हवे होते किंवा या पात्राला असा रंग देता आला असता. खर सांगायच तर अस नेहमीच वाटणार. यावर उपाय नाही. त्यातुन कथा कशी लिहावी हे मला शिकायची संधी कधी मिळाली नाहीया. त्यामुळे अंधारात चाचपडाव तस मी नविन प्रयोग करत असतो. त्यातच अजुन एक म्हणुन यंदा ठरवल की पूर्ण कथा लिहिल्या शिवाय एकही भाग प्रकाशित करायचा नाही. बघु या काय होत ते. ही कथा आत्तपर्यंत लिहिलेल्या पैकी सगळ्यात कठीण आहे हे खर. पूर्ण होईलच असही नाही.

शिवराज्याभिषेक लिहितांना "भारताच्या शोधात" ही लेख-मालिका लिहिण्याचा विचार डोक्यात आला. शिवाजी महाराजांचा इथे राष्ट्रबांधणीचा खटाटोप चालू असतांना ज्ञात जगात काय काय घडत होत, त्याचे परिणाम आणि पडसाद भारतावर कसे उमटले या बद्दल ही लेख मालिका असणार आहे. अर्ध्या जगाचा शोध भारताच्या शोधात लागला आहे अस म्हणायला हरकत नाही. आणि सन ९०० ते १८०० पर्यंतच्या काळात जगात घडलेल्या युध्दांमागील कारणांमधे भारतावर सत्ता हे अग्रगण्य कारण होत अस म्हणायलाही हरकत नाही. शोकांतिका अशी की या उलाढालींमधे आपण आपले जवळपास अर्धे बांधवजन परधर्माला आणि अर्धी भुमी परधर्मी झालेल्या बांधवजनांनाच हरवुन बसलो. आणि या काळात भारतात घडलेल्या नरसंहाराची तुलना जगात इतरत्र घडलेल्या फार कमी घटनांशी होईल.

पण झालेल्या आक्रमणांचा मुद्दा थोडा वेगळा. या लेखमालिकेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारताचा शोध घेणे आहे. (भारत एक शोध नाही, भारताचा शोध!) त्या काळात जगाचा व्यापारात भारताचा हिस्सा २० ट्क्क्याहुन अधिक होता. धर्मप्रचारा व्यतिरिक्त सोन (आणि बायका) लुटायच्या उद्देशाने मुसलमानी आक्रमक भारतात ९ व्या शतका नंतर येउ लागलेत. १५ व्या शतकानंतर युरोपिय सत्ता भारतावर घिरट्या घालु लागल्यात. या उठाठेवीत जगाचा नकाशा नेहमीसाठी बदलुन गेला. दोन नविन खंडाचे शोध लागलेत. आणि अफ्रिके सारख्या महाकाय खंडाचे अंतरंग पहिल्यांदाच कळले. ज्या सत्तांनी भारताकडे लक्ष दिले नाही त्या लौकरच नाममात्र सत्ता राहिल्यात किंवा नाहीश्याच झाल्यात. त्यापैकी तूर्की साम्राज्य आणि लपांटोच्या युध्दाचे परीक्षण मी या लेख मालिकेच्या पहिल्या सदरात करण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे शैक्षणिक पेपर प्रसिध्द करण्याचा मानस नाही पण या ऐतिहासिक घटनांचे चित्र रंगविण्याचा प्रयास आहे.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक लहानसे बेट आहे. या बेटाला जिंकण्यासाठी तुर्कीच्या सुल्ताना ने प्रचंड मोठे नौदल पाठवले. त्याला टक्कर द्यायला युरोपातील प्रस्थापित सत्ता एक झाल्यात. यांच्यातील घनघोर युध्दात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी झाली पण शेवटी युरोपिय सत्ता वरचढ ठरल्यात.

हे थोडक्यात झाल.

प्रसंग बांधणी व भारताच या युध्दाशी नात पुढल्या भागात.

॥जय शिवाजी॥

11/2/09

आगामी लेख

बर्‍याच दिवसात काही लिहिल नाही याच निमित्त धरुन लिहितोय. आगामी लेख या शीर्षका खाली लिहितोय खर पण आगामी लेखात प्रकाशित झालेले लेख या सदरा अंतर्गतच बरेच दिवस तिठत उभे आहेत. पण सध्या काही इलाज नाही. खुप काम आहेत त्यातुन पर्यटन बरच झाल त्यामुळे अजुनच कमी वेळ मिळाला. मधे आमचे आई-वडिल इथे आले होते त्यात व्यस्त होतो. बर्‍याच घटनांवर लिहायचा मानस होता पण तो मानसच राहिला. यावरुन लक्षात आल की सध्य परिस्थितीवर मी गेल्या बरेच दिवसात एकही लेख लिहिलेला नाही. कोणाच काही अडल नाही पण माझ इंग्रजी ब्लॉग फक्त सध्य-परिस्थितीवरच असतो आणि मराठी ब्लॉग त्याच विषयांवर पण मराठीत अश्या विचारानी सुरु केला होता. सुरुवातीला बरेच लेख लिहिलेही पण जसा जसा वेळ कमी मिळतोय तस फक्त कथाच लिहिल्या जाता आहेत.

कथा कधी लिहिन अस वाटल नव्हत. अचानकच लिहायला सुरुवात केली आणि लिहितच गेलो पण नेहमी एक प्रश्नचिन्ह समोर असत, एक भिती मनात असते की जे लिहितो आहे ते वाचण्याजोग आहे का? जे मांडतो आहे, रंगवतो आहे किंवा निदान तसा प्रयत्न करतोय ते मनोरंजक आहे का? लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे कळण्याचे मार्ग ठळक नाही. मोजकी लोक प्रतिक्रिया टाकतात आणि ब्लॉगवर भेट दिलेल्यांची संख्या वाढतांना दिसते पण तेवढच. घरी आमचे वडिल बंधु आणि मातोश्री प्रत्येक लेखास प्रतिक्रिया नेमाने देतात. दोन मित्र नित्य-नेमाने लिहिलेल वाचतात. या त्यांनी दिलेलं प्रोत्साहनची शिदोरी खुप वेळ पुरते हे मात्र खर. बरेच लोक म्हणतील कि लोकांच्या प्रतिक्रियांच काय लोणच घालायच आहे. आपल्याला आवडेल ते आणि मनाला रुचेल तस लिहित रहा. काही नाहीतर स्वतःच्या आनंदासाठी लिहि. विचार वाईट नाही पण स्वानंदासाठीच लिहायच तर दररोज डायरी लिहीली तरी पुरे आहे त्यासाठी एवढा ब्लॉग लिहायचा खटाटोप करून निरर्थक शब्दांच ओझ लोकांवर टाकण्यात काय अर्थ? काहीच नाही. खरच काही नाही. त्यापेक्षा न लिहिलेल बर किंवा न बोललेल बर. आमचे आजोबा त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगत की त्यांच्या काकांना जेवणाच्या पानावर भ्र काढलेलाही चालत नसेल. बोलायचच झाल तर "श्रीहरी श्रीहरी" एवढच म्हणायच. अजुन हव असेल तर स्वत: घ्याव. नियम फार कडक पाळल्या जात असे. पण मला कढी आवडली हे श्रीहरीच्या नादात सांगण थोड गंमतीदारच असणार.

भिती अशी वाटते की ब्लॉग लिहिण्याच्या भानगडीत वायफळ बडबड होत असेल तर ते कळणारच नाही आणि त्या नादात देवाचही नाव घेतल्या जाणार नाही.

6/20/09

आगामी लेख

भारत - एक शोध (लेख मालिका)

शिव-राज्यारोहण भाग ३

रेखांकित भाग २

जय महाराष्ट्र भाग २


लेख बरेच आहेत लिहायला आणि माझ गप्पा मारण काही थांबत नाही. त्यातुन या महिन्याच्या शेवटी परदेशी जायचा योग आला आहे त्यामुळे लेखन संपूर्णतः बंद असणार आहे. तेंव्हा हे लेख नेमके कधी प्रकाशित होणार मलाच माहिती नाही. काम थोडी शिस्तीत करायला शिकायला हव. परदेशात काही सुचल तर ते नक्कीच प्रकाशिक करीन. प्रवास वर्णन लिहिणार अस तर वाटत नाही पण प्रवासाच्या योगाने काही सुचल तर बघु.

जय महाराष्ट्र याचा दुसरा भाग लिहिण्याचा मी बरेच दिवस प्रयत्न करतोय पण प्रत्येक वेळेस एखादा उतारा लिहिला की आधी लिहिलेला उतारा खोडावा लागतो.बहुधा विषयच असा आहे कि सगळ्यांचीच द्विधा मनस्थिती होत असावी.

असो. प्रकाशित लेखनावर वाचकांनी प्रतिक्रिया द्यावी ही विनंती.

आपला,

चिन्मय 'भारद्वाज'.

4/20/09

आगामी लेख

आगामी लेख -:

शिव-राज्यारोहण भाग २

रेखांकित (दिर्घकथा)

श्री गणेश वंदना भाग ४