Showing posts with label दीर्घकथा. Show all posts
Showing posts with label दीर्घकथा. Show all posts

10/14/23

मनोहर - भाग २

**या कथेचा पहिला भाग मी २०११ ला लिहिला होता. तेंव्हापासून या गोष्टीचा शेवट डोक्यात आहे पण लिहिण्याचा योग जुळला नाहीं. आता बारा वर्षांनी पुढला भाग पूर्ण केला आहे. आशा करतो वाचकांना भाग २ आवडेल. हा भाग वाचायच्या आधी कृपया पहिला भाग - https://marathimauli.blogspot.com/2011/09/blog-post.html  आधी अवश्य वाचावा हि विनंती.  

----

मनोहरच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याने डोळे बारीक केलेत. अंगावर त्याच्या साधा पट्ट्या-पट्ट्या ची जर्सी होती पण पोलीसाची खाकी पँट आणि पट्टा होता. पायात जोडे पण पोलीस चे होते. आधी त्याने त्याच्या वाहिनीकडे बघितले. ती ठोकळ्या सारखी जागेवरच थिजली होती. इंस्पेक्टर च्या बंदुकीतून अजूनही बारीक धूर येत होता. सगळं अगदी क्षणार्धात झालं. तेवढ्यात अंगणाच्या पलीकडे पोलीसची एक जीप ढर-ढर आवाज करीत थांबली. एव्हाना भिंतीला टेकलेला माणूस जमिनीवर कलंडला होता आणि रक्ताचं थारोळं साचायला लागला होत.जीप मधून एखाद-दोघे उतरल्याची चाहूल लागली. 

मनोहरने मागे वळून जीप कडे बघितले. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी घश्यातुन आवाज काढण्याचा प्रयत्न करीत म्हणाला "अरे पकड रे मनोहर ला"

ठयाक-ठयाक आवाज करीत मनोहरची रिव्हॉल्वर कडाडली. तो अधिकारी आणि हवालदार दोघेहि गव्हाच्या पोत्यासारखे जमिनीवर ढासळले. गोळीच्या आवाजाने जीप मधून उतरणारे लोकही दचकलेत. त्यांना तो आवाज ओळखीचा होता. त्यातल्या दोघांनीं तातडीने पिस्तूरिव्हॉल्वर काढली आणि उरलेल्या दोन हवालदारांनी त्यांच्या ब्रिटिश कालीन थ्री-नॉट-थ्री खांद्यांच्या 'म्यानातून' बाहेर काढल्यात. पण त्यांना कळेना कि आवाज नेमका कुठून आला आहे ते. त्यांना रेडिओ वरून या स्थळावर बोलावले होते पण या घरात जायचा हुकूम नव्हता. आणि कुठलं घर हे पण नीटस माहिती नव्हतं. एक अधिकारी आणि एक हवालदार या गल्लीत आहेत आणि त्यांना गाडीत घालून कोणाच्यातरी शोधावर निघायचे एवढेच ठरले होते. जीप मधल्या अधिकाऱ्याने इशाऱ्याने मनोहरच्या घराकडे बाकीच्यांचे लक्ष वेधले. ते एकच दार अर्धवट उघडे होते आणि आत कोणी तरी उभं असाव अशी चाहूल वाटत होती. जीप मधले चौघे एक हि अक्षर न बोलता पांगलीत. दोघे अगदी दबक्या पावलांनी दाराच्या दिशांनी जाऊ लागलीत. दुसरे दोघे घराच्या बाजूला अंगणाच्या कुंपणाच्या आणि घराच्या भिंतीत एक बोळ होती आणि तिथे खिडकी होती त्या दिशेने सरसावले. घराची पूर्ण कल्पना नसल्याने दिसणारा एक दरवाजा आणि एक खिडकी असे त्यांनी 'नाकाबंदी' केली.

'वाहिनी, वाहिनी....इथे बघ. यांना मारणं जरुरी होत. यांनी मला सोडलं नसता आणि तुला हि"

ती बाई फारशी हलली नाहीं. 

मनोहर हळूच चालत त्या अधिकाऱ्याच्या प्रेताजवळ गेला. त्याने त्याच्या पोटाखाली हात घालून रेडिओ काढला. गोल बटणांना मागे पुढे फिरवत अगम्य खुसपूस त्याने लक्ष देऊन ऐकली. 

मग उठून मनोहर त्या बाईचं बकोट धरून आतल्या छोट्या स्वयंपाक घरात नेले. 

"वाहिनी.....वाहिनी.....ऐकू येतंय का मी काय बोलतोय ते?" मनोहर खुसपुसला 

"अजून पोलीस येतच असतील. मी रेडिओ वर ऐकलंय. मी पळतो आता. याचा बदला मी घेणार. कोणाला सोडणार नाहीं. फुकटातच अकॅडेमित पहिला आलो नाही मी."

"आता तरी जाऊ दे मनोहर." 

"माझी चूकच नाहीं या. मी का जाऊ देऊ? त्या हरामखोरांनी जाऊ द्यायला हवं! मला मारायचा ना हिम्मत असेल तर?"

"तुलाच मारायला आले होते. तू नव्हतास. यायचं होतस मग? कुठे होतास? दोन तास छळत होते आम्हाला. कुठे होतास तू? आणि तुझी पिस्तूल? आणि तुझी नेमबाजी?"

मनोहरला ते आवडल नाहीं. 

"आता बघ यांना दाखवतो मी काय आहे ते" मनोहर पुटपुटला

"आणि मग पुढे काय? कोणी उरणार आहे मागे?"    

दरवाज्याच्या अगदी जवळ आले असतांना एका अधिकाऱ्याच्या पायाखालची अर्धवट तुटलेली फरशी कडकडली. त्या शांत वातावरणात तो आवाज दूरपर्यंत गेला. 

मनोहर ने स्वयंपाक घरातून वळून बघितले. त्याला डावी कडच्या खिडकीतहि  हालचाल जाणवली. नाकेबंदी करण्याचा प्रयत्न होतो आहे हे त्याला कळले. त्याने हे पण हेरलं कि या नवीन लोकांना घराची माहिती नाहीं आणि घरात तीन प्रेत आहेत याची जाणीव नाहीं.

मनोहरला कल्पना नव्हती कि एकूण किती लोक आहेत. रेडिओ वर फक्त अजून एक जीप येते आहे एवढच बोलणं झालेलं होतं.

मनोहरच्या श्वास जोरात चालू होतं. त्याने ओट्या खालचा गॅस सिलेंडर हळूच उचलून बाहेर काढला आणि वहिनीला त्या खोबणीत बसायला सांगितलं. कितीही हळू केला तर गॅस सिलेंडर चा टण आवाज आलाच.  बाहेरच्या हालचाली एकदम स्तब्ध झाल्यात. आत काय चाललंय याची चाहूल बाहेरचे घेत होते आणि बाहेर काय होतंय याची चाहूल आत मनोहर घेत होता. सेकंदाचा काटा अडखळत पुढे जात होता. मनोहर ने हातातील रिव्हॉल्व्हर घट्ट धरले. त्याच्या भुवयांवर घाम आलेला होता. त्याने अकॅडेमीत शिकवल्या प्रमाणे मोठ्ठा श्वास घेऊन धडधडत हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला. हात पाय शिथिल केले. त्याचे डोळे बारीक झालेत. मनोहर ने पुढचा प्लॅन पक्का केला होता. 

समोरच्या दाराजवळ अधिकारी पोचले होते. एकाने कडी धरून हळूच दार इंच भर सरकावले. त्याला रक्ताची थारोळी दिसलीत. त्याने मोठ्ठा आवंढा गिळला. भिंतीमागे दाबून उभ्या असलेल्या अधिकार्याला दोन किंव्हा तीन अशी बोट दाखवलीत. तो अधिकारी पण विचार करू लागला कि आत जायचा कि नाहीं. त्याने खुणा करून विचारले कि उजवीकडून खिडकी कडे गेलेल्यांना परत बोलवायचा का ते. 

तेवढ्यात गोळीचा एक नेहमी आवाज येतो तसा आवाज आला आणि दुसऱ्या गोळीचा आवाज त्याहून कितीतरी पटीने मोठ्याने दुमदुमला. दोघे अधिकारी फटकन जमिनीवर आडवे झालेत. दोघांनीं एका-मेकांकडे बघितले. दोघे हि शाबूत होते. त्यातल्या एक रेडिओ काढून 'बॅक-अप' मागवायला लागला. पुन्हा तिसऱ्या गोळीचा आवाज दुमदुमला. दोघे हि अंगणात गवतावरून सरपटत जीप च्या दिशेने घाईघाईने जाऊ लागले. डावीकडे बघितला तर दोन हवालदार कुंपणावरून उड्या मारून पलीकडच्या घरच्या अंगणातून धावतांना दिसलीत. अधिकाऱ्यांना हुश्श झाला कि सगळे जिवंत आहेत.  

मनोहर ने तांदुळाची जाड लोखंडी कोठी उलटी करून रिकाम्या कोठीत गोळ्या चालवल्या होत्या. त्यामुळे आवाज असा दुमदुमला. खरंतर अधिकाऱ्यांना कळायला हवे होते कि हा रिव्हॉल्व्हर सारखाच आवाज आहे. शेवटी ते पण मनोहरच्या अकॅडेमीचे होते पण घरातील प्रेत आणि रक्ताची थारोळी बघून ते भांबावले असावेत. पण जीप जवळ येऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते जीप च्या मागे लपले होते. 

"या हवालदारांना जाऊ दे" एक अधिकारी म्हणाला. 

दुसरा अधिकारी तो पर्यंत आपल्या दोन्ही रिव्हॉल्वर लोड करीत होता. 

"आपल्यालाच निपटवावं  लागेल हे प्रकरण. मनोहर मला सिनिअर होता अकॅडमीत. आणि पहिला आला होता" पहिला म्हणाला. "आणि मी तेरावा" तो पुढे म्हणाला. 

"तेरा पर्यंत रँकिंग असत?" दुसर्याने थोडा खौटपणे विचारला. दोघेही याच्यावर फिदीफिदी हसलेत. 

परत एक गोळीचा आवाज आला. 

"हा हवेत मारतोय गोळ्या. आपल्याला घाबरावायला किंव्हा आपण गोळी चालवली तर त्याला आपली जागा कळेल. मुळीच हालचाल करू नको"

दुसऱ्याचा लक्ष नव्हता. तो गल्लीच्या टोकाशी सरकत्या गर्दीकडे बघत होता.

"इथे जवळपास मेळा लागलाय का? खूप गर्दी एकाच दिशेने जातेय." दुसऱ्याने विचारले. 

"हो, दसऱ्याचा मेळा आहे. बंगाली शाळेच्या मैदानात. का?"

"मनोहर बहुतेक त्या दिशेने पळेल. कारण तिथे मिसळून गायब होणे सोपे आहे." दुसरा अधिकारी असे म्हणून जीप च्या आडून डोकावून बघू लागला. 

पाहिल्याने रेडिओ घेतला आणि फ्रीकवेंसी शी खेळू लागला. तेवढ्यात त्याला लक्षात आला कि रेडिओ ची खरखर घरातून हि ऐकू येते आहे. तो एकदम सावध झाला. त्याने पहिल्या अधिकाऱ्याकडे बघितले. 

"मनोहर च्या हातात रेडिओ लागलेला दिसतोय." दुसरा म्हणाला. 

दुसर्याने खालच्या मातीवर चौकोन काढला. पटापट दिशा आखल्यात. एका बाजूला मेळा, मध्ये घर, दोन्ही बाजूच्या जोडणाऱ्या गल्ल्या आखल्यात. 

"आत जायचा एकाच बाजूंनी?" पाहिल्याने विचारले. 

"मी इकडून गोळ्या मारत जातो. म्हणजे त्याला इकडून हुसकावून लावता येईल. याला घरातून काढणं जरूरी आहे." पहिला म्हणाला. 

"आणि तो मेळ्याकडे पळाला तर?"

"घरात जाऊन त्याला पकडणे अशक्य आहे. आतल्या तीन लोकात आपणहि सामील होऊ. त्याच्या मागावर लागता येणं बेस्ट आहे. एकाद वेळेस मेळ्यात इतक्या गर्दीत तो गोळ्या चालवणार नाहीं." 

पहिला अधिकारी पुढे आणि पुढला मागे असे चिचुंद्री सारखे जीप च्या पुढल्या बाजूने एका पाठोपाठ खालती वाकून निघालेत. झाडाच्या बुंध्यावर त्यांनी एका पाठोपाठ अश्या तीन चार गोळ्या मारल्यात. आणि मग ते थांबलेत. दुसऱ्या अधिकाऱ्याने खिडकीच्या गजावर अजून एक गोळी मारली. त्याचा आवाज टणकन आला. 

त्यांना घराच्या मागल्या दारातून बुटांच्या पळण्याचा आवाज आला. तो आवाज मेळ्याच्या दिशेने जात होता. 

(क्रमशः) 

12/29/09

रेखांकित - अंतिम भाग

मेघनाने घाबरत फोन उचलला आणि तिला परत घाम फुटायला लागला. तिने घाबरून आईकडे बघितल.

"काय झाल?"

"अनिकेतचा अपघात झालाय"

"अग बाई, कुठे झाला? कुठे दाखल केलय?"

मेघनाने गाडीची किल्ली उचलली आणि ती धावत बाहेर पडली.

"मेघना, कुठे जातेयस? कुठल्या दवाखान्यात आहे तो? थांब, मी पण येते. अशी एकटी नको जाऊस. "

तो पर्यंत मेघना गाडी पर्यंत पोचली होती. तिने गाडी चालू केली आणि क्षणभर ती विचार करु लागली. तो पर्यंत आई मागुन अक्षरशः धावत येत होती.

"मी दवाखान्यात जात नाही या आई. काळजी करु नकोस "

"काळजी काय नको करूस. हे बघ शांत हो. मी चालवते गाडी"

मेघनाने ते न ऐकता भरकन गाडी वळवली आणि फाटका बाहेर पडली.

"मेघना...." आई मागुन हाका देत राहिली.

मेघना टेकडीच्या पायथ्याशी पोचली. बाबा एकटाच पुस्तक वाचत बसला होता. त्याने दुरुन मेघनाला येतांना बघितल. पुस्तक बाजुला ठेउन तो उठला.

"आओ बेटी।" त्याने न हसता मेघनाच स्वागत केल.

मेघना काहीच बोलली नाही. नुसतीच जमिनीकडे बघत उभी राहिली.

बाबालाही काय बोलाव सुचेना. मेघना इथे परत आलीय म्हणजे नको ते घडलय असा त्याने कयास लावला. पण मेघना परत इथे येइल हेच बहुधा त्याला अपेक्षित नसाव.

"बैठो"

"मी इथे कधी आलीच नसती तरी हे सगळ असच घडल असत का?" तिने बाबाच बोलण कापत एकदम विचारल.

"बेटी, तुम्हारा यहां आना या न आना कोई मायने नही रखता। मैने तो केवल संदेसा देने का काम किया था। लिखने वाला तो कोई और है।"


"पण इतक्या लौकर कस सगळ घडल? अजुन एक-दोन महिने मिलाले असते तर काही तरी करता आलं असत."

"बच्चे, होनी को तो स्वयं भगवान नही टाल सकते। तुम कुछ कर पाती थी ये तुम्हारा भ्रम है।"

"मी दुसर लग्न केल असत तर..?"

"तो?"

"मै किसी और की परिणिता हुई होती। और अनिकेत की जान खतरे मे ना होती।"

"तुमने शायद परिणीता का अर्थ गलत समझा। जिसकी मृत्यु होनी थी उसिकी मृत्यु हुई है। विधिलिखित उसे ही कहते है। तुम तन-मन से जिसकी हो चुकी थी उसकी मृत्यु अटल थी। शादी होना याने परिणिता होना आवश्यक नही है। किसी और मे विलिन हो जाना याने परिणीता होना है।"

मेघना ने आ वासला. तिला रडण आवरेना. ती रडत खाली बसली.

"रो मत ऐसा भी नही कहे सकता।" बाबाचाही चेहरा केविलवाणा झाला होता.

"म्हणजे माझंच नशिब नाट होत." ती रडत म्हणाली. "मी त्याला भेटली नसती तर तो जिवंत असता"

"पण मग त्याच्या ऐवजी अजुन कोणी मेलं असत." तिल अजुन भडभडुन आलं.

"बच्चे इसमे तुम्हार कोई दोष नही है। अब मै तुम्हे कैसे समझाऊ?"

"एक कहानी सुनो। एक चिडिया पंछीयों के राजा गरूड के पास आती है और कहती है - 'महाराज, मैने कल बहोत बुरा सपना देखा।"

'क्यों क्या हुआ?'

'मेरे सपने मे यमराज आऐ थे। और उन्होने कहा की आज मेरी मृत्यु अटल है। अब आप ही मुझे अभय दे सकतें है।'

इस पर पक्षीराज ने कहा ' तुम चिंता मत करो। तुम्हारा रक्षण करना मेरा कर्तव्य है।'

ऐसा कहे की वे उस चिडिया को पीठ पर डाले दुनिया के दुसरी और उड पडे। वहां एक आसमान को छुंती हुई सिधी चट्टान थी। उसके मध्य मे एक छोटी सी गुफां थी। वहां पर उन्होने वो चिडिया को रखा और कहां - 'इतनी दूर और इतने उंचे मेरे अतिरिक्त किसी की उडान नहीं है। यहां और कोई नही आ सकता। और गुंफा के द्वार पर मै पहेरा देता रहुंगा। तुम यहां निश्चिंत रहो।"

ऐसा कहे के वे दरवाजे की और मुडते न मुडते इतने मे पलक झपकते ही गुफां मे छिपे एक साप ने उस चिडिया को निगल लिया।

अब गरूड राज अचंबित हो गये। ये तो बडा अन्याय हुआं। वे सिधा यमराज के पास गये।

'क्या मै पक्षीराज होना कोई मायने नही रखता? उन्होने यमराज को क्रोधित स्वरों मे प्रश्न पुछां। 'वो चिडिया मेरे अभय मे थी और फिर भी उसका अंत ऐसा हुआ?'

'महाराज स्वयं आप के मृत्यु पे आप के हातों मे नही है तो उस चिडिया की मृत्यु कैसे रोक पाते?"

गरुड राज ने पुछां 'फिर ऐसा ही होना तो आप ने उस चिडिया के सपने मे आकर मेरे से खिलवाड क्यों किया?"


"उस चिडिया की मृत्यु दुनिया के दुसरी और एक आसमान को छुंती चट्टान पर लिखि थी। अब उस नन्ही जान मे इतनी शक्ति ना थी। समझ लो आप ने मेरा काम सरल कर दिया।"

गरुडराज संतुष्ट न हुए। उन्होने फिर पुंछा "जन्म का कारण पता नही और मृत्यु कब और क्यों होगी ये भी पता नहीं। और जीवन भी पूर्व संचित कर्मों की छाया बितता है। चिडिया की मृत्यु अटल थी और मै कर्ता होने का तो केवल भ्रम है। ऐसे जीवन का क्या अर्थ है?'

"राजन्, पूर्व संचित कर्म मानो घट है। पर घट भरना यही जीवन है। और प्रात्प परिस्थिती मे अच्छे कर्मोंसे घट भरना यही मुक्ति का मार्ग है।'

"ना आप का जन्म पे अधिकार है ना मृत्यु पर। तो उस सोच मे समय बिताना व्यर्थ है।' बाबा ने गोष्ट संपवली.

"बेटी पुंछ के जनम नही होता और मृत्यु अनुमती की राह नही देखती। उसकी मृत्यु अटल थी, तुम केवल कारण थी। इसमे तुम्हारा दोष नही है।"

मेघना काहीच बोलली नाही.

"पर जीवन तुम्हारे हातों मे है। उसे संभाल के रखो।"

मेघना ला रडण आवरत नव्हत. तिला बाबाचे शब्द नीटसे ऐकुही येत नव्हते. तिला अनिकेत सगळीकडे दिसायला लागला. तो गेलाय याची तिने नीट खात्री सुध्दा केली नव्हती. मोठ्ठा अपघात झालाय आणि त्याच्या मित्राचा आवाज ऐकुनच तिने काय नेमक झाल असेल हे ताडल होत आणि धावत बाबा कडे आली.

बिचारा एकटा पडला असेल तिथे, माझी वाट बघत असला वेडा विचार तिच्या मनाला रुतत होता.

"पण अनिकेतने काय केल होत की त्याचा अंत असा व्हावा. इतका चांगला होता तो. कधी कोणाचं वाईट केल नसेल त्याने. माझा जीव होता तो. आता कशी जगु मी. काय केल होत अस की माझ्या नशिबी हा भोग आहे"

बाबा काहीच बोलला नाही. त्याचेही डोळे पाणावलेले होते. तिची पाठ थोपटत तो दूर कुठे तरी शुन्यात बघत होता.

(समाप्त)

12/4/09

रेखांकित भाग ४

"कसली आयडिया आहे?" अनिकेत ने बाईक ला किक मारत थंडपणे विचारल.
"वर चल, सांगते?" त्याचा थंडपणा बघुन तिच्या कपाळावर आठ्यांनी घर मांडल.
"पिक्चर वाटतोय का तुला? कि आपण अस करु आणि तस करु. थोडी झाडा भोवती गाणी गाऊ या आणि मग विलन ची एंट्री" तो बारीक डोळे करुन शुन्यात बघु लागला.
"पण इथे विलन कोण आहे याचा विचार करावा लागेल. तुझ्या कपाळावरच्या रेषा कि माझ्या तळव्यात नाहिश्या होणार्‍या रेखा"
मेघनाच्या डोळ्यातुन परत गंगा-जमुना वहायला लागल्यात. दोघेही पावसात चिंब भिजले होते.
पहिल्या मजल्यावरच्या जोशी काकु खिडकी उघडुन भोचक पणे काय चाललय बघु लागल्यात.
"काय काकु, काय म्हणता ?" अनिकेतने कुचक्या आवाजात विचारल.
"काही नाही रे" त्या थोड्या वरमल्या मग चाचपडत म्हणाल्या "आत जा रे दोघे. सर्दी व्हायची. मेघना, नुकतीच तापातुन उठतेयस ना"
"हो खर सांगायच तर मलाही हिच्यासारख सर्दी -ताप हवाय. तुम्ही खिडकी बंद करुन घ्या, तुम्हालाही व्हायची सर्दी. नाहीतर इथे आमच्या जवळ येउन उभ्या रहा. काय बोलतोय ते ऐकु येईल नीट"
जोशी काकुंनी लगबगीने खिडकी लोटली.
"मेघना काय तमाशा लावलायस. जा बर आत. आधीच तब्येत बरी नाही या तुझी"
"लाज नाही वाटत का तमाशा म्हणायला?" मेघना फणकारली.
"तुला आत्ता जिथे जायचय तिथे जा पण मी तुझा पिच्छा असा सोडणार नाही या. मी तुला कधीच सोडणार नाहीया. जिथे जाशिल तिथे मी तुझ्या मागे-मागे येइन. मग तु कुठेही जा"
क्षणभर अनिकेत ला काय बोलाव सुचेना. त्याने गाडी बंद केली आणि स्टँड लाउन तो जिन्याच्या दिशेनी चालायला लागला. मेघना तशीच उभी होती.
"आत्ताच तर मारे सांगत होतीस की जिथे जाशिल तिथे मागे-मागे येइन म्हणुन, मग?"
वरची खिडकी पुन्हा किलकिली उघडली.
"काकु, आल घालुन चहा करा लौकर आणि सोबत भजी पण चालतील"
खिडकी घट्ट बंद झाली.
मेघनाला खुदकन हसु आल.

घरात आल्याबरोब्बर मेघनाने अनिकेतला घट्ट मिठी मारली. अनिकेतने काहीच हालचाल केली नाही.
"अस काय करतोस?"
तिला दूर सारत तो परत खिडकी जवळ गेला. "सांगतेस का काय ते?"
"फोटो काढायला हवा खिडकी जवळ. अनिकेत खिडकीवाले"
"सांग"
"मी दुसर्‍या कोणाशी लग्न करीन" अस म्हणुन ती क्षणभर अनिकेतची प्रतिक्रिया बघायला थांबली
त्याच्या चेहर्‍यावरची माशी सुध्दा हलली नाही.
"मला बोलवु नकोस म्हणजे झाल. अर्थात तो पर्यंत मी असलो तर"
"ऐक तर. बाबा ने सांगितल कि मी ज्याची परीणिता होणार त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि आपण धरुन बसलोय की मी तुझीच परीणिता होणार. मी जर का दुसर्‍याशी लग्न केल तर प्रश्नच मिटला"
अनिकेत मेघना कडे रोखुन बघत होता.
"अरे म्हणजे तात्पुरत...."
"कळल मला" तो तीक्ष्ण स्वरात तिला कापत म्हणाला. " म्हणजे माझ्या ऐवजी दुसरा कोणी तरी मरणार"
"काय करायच मग तुच सांग. मला काय हौस आहे कोणाला मारायची. माझ्या नशिबी कोणी मरणार तर त्याला मी काय करणार? पण तुला मी काही होउ देणार नाही एवढ नक्की" अस म्हणुन ती परत रडायला लागली.
"किती रडशील? काही झाल की नळ चालु" अनि त्रागाने म्हणाला. "शांत बस बर थोडी. मला विचार करु दे"
"हो, बोल मला अजुन. मीच ऐकुन घेते म्हणुन"
अनिच्या डोक्यात विचारांच अचानक वादळ उठल. त्याने सगळी आशाच सोडली होती पण मेघनाची युक्ती ऐकुन त्याला काही तरी होउ शकत या विचाराने हुरहुरी आली होती. पण अजुन कोणी मरणार या विचाराने त्याच मन कच खात होत.
तो नुसताच येर-झार्‍या मारु लागला.
"बोल ना, अस काय करतोस?"
"काय बोलु, काय अपेक्षा आहे तुझी?"
"हो म्हण फक्त म्हणजे झाल"
"अरे, गंमत वाटतेय का तुला? हो काय राख म्हणु" अनिकेत ओरडला.
"सॉरी, मला ओरडायच नव्हत.
थोडा वेळ अनिकेत काहीच बोलला नाही.
"अस कस अजुन कोणाला मरू देउ मी माझ्या ऐवजी?"
"अनि, तू कोणाला मारत नाहीयास. तू उगाचच मनाला घोर लाउन घेतोयस. आपण इथे कोणाच्या खुनाचा प्लॅन करत नाहीया. अस बघ की माझ्या नशिबी त्या दिवशी जसलीन सोबत त्या बाबा कडे जाण होत. मी नाही म्हणत असतांना त्या बाबा कडुन हे सगळ ऐकल, उगाचच का अस सगळ घडुन आल? यातुन मार्ग काढता यावा, यातुनही मार्ग निघु शकतो याची चिन्ह आहेत ही सगळी. काहीच माहिती नसत तर काय केल असत? आता सगळ माहिती असुन काहीच न करण हेच चुकीच ठरेल."
मेघनाचा युक्तीवाद वर्मी लागला.
"बरं ठीक आहे. तु म्हणतेयस तस करु"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.
"आई येतेय परत"
अनि ने मोठ्ठा उश्वास सोडला.
"आई येतेय तर मी काय करु?"
"नाही ग, तस काही म्हणत नाही या. निघतो मी. मगासचे ओले उभो आहोत. तु तर नुकतीच तापातुन उठलीयस. आराम कर आता. मला ही खुप थकल्या सारख वाटतय"
"हस ना एकदा"
"रात्री फोन कर."
"हो करीन पण तू हस ना एकदा.
"काय करतेयस लहान पोरी सारख"
"प्लीज..."
"मेघना..." अनिकेतला हसु आल. तो दारा बाहेर पडला.
"नाही सोडणार अशी. माझ्याशी गाठ आहे." डोळे बारीक करत तिने हसत दरवाजा लावला.

---
अनिकेतने गाडीला किक मारली. वर बघितल तर मेघना खिडकीतुन बघत होती. त्याने गाडी वळवली आणि अंगणातुन बाहेर पडला. पाऊस अजुनही पडत होता. त्याला घरी जावस वाटत नव्हत. हळु-हळु गाडी चालवत तो मुख्य रस्त्यावर आला. कुठल्या मित्राकडे चक्कर मारावी याचा विचार तो करत होता. पण त्याच मन सारख मेघनाने सुचवलेल्या गोष्टी भोवती वळसे घालत होत. खरच का मेघना ने दुसर्‍याशी लग्न केल तर आपला जीव वाचु शकतो? पण नशिब अश्यानी बदलत असत तर त्याला नशिब म्हणलच नसत. मेघना दुसर्‍या कोणाशी लग्न करणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात समोरुन कोणीतरी अनि अशी आरोळी देत वेगाने निघुन गेल. कोण होत ते अनिच्य लक्षात नाही आल. त्याने उगाचच पाठमोर्‍या आकृतीला हात दाखवला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन तो पुढे काय करायच याचा विचार करु लागला.

इकडे मेघनाला हलक वाटत होत. असल्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढला या वर तिचा अजुनही विश्वास होत नव्हता. नविन मार्ग कठीण होता खरा पण असल्या अभद्र खेळाला असलीच शहनिशा देण आवश्यक होत. तिने भिजलेले कपडे बदलले. आणि अंथरुणावर अंग टाकल. तिच्या डोक्यात गेले दोन तास घडलेल सगळ घिरट्या मारत होते. अनिकेतचे बाणासारखे टोचणारे शब्द, त्याच असहाय रडण, आपल्या डोक्यातली भन्नाट कल्पना सगळ सगळ चित्रपटासारख डोळ्यासमोर फिरत होत. जोशी काकुंचा भोचकपणा आठवुन तिला हसु आल. त्या आईला नक्कीच काहीतरी बोलणार मग आईला काय सांगायच याचा विचार ती करु लागली. आईने मागेच आडुन-आडुन अनिकेत बद्दल विचारल होत. आता अचानक माझ्यासाठी स्थळं बघा हे कस सांगायच. आणि अमेरिकेला जायच काय करायच? आणि लग्न करण म्हणजे काय गंमत थोडीच आहे. दुसरा पुरुष आपल्याला स्पर्श करणार या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. तिने पांघरुण घट्ट छातीशी घेतल. एका उत्तराने प्रश्नांच नविन जाळ विणल होत. तिला डुलकी लागली.

अनिकेतने गाडीला परत किक मारली. अक्षरशः वाट फुटेल तिथे तो जात होता. आत्ता खर तर मेघना सोबत पावसात भिजत फिरायला मजा आली असती. रस्त्यावरचे खड्डे चुकवत तो एक हात सोडुन संथपणे गाडी चालवत होता. पाऊस परत सपाट्याने पडायला लागला होता. पावसाचे थेंब छोट्या-छोट्या सुया टोचाव्यात तसे तोंडावर टोचत होते. 'च्यक्' असा आवाज काढत त्याने गाडी परत रस्त्याच्या कडे लावली आणि एका मोठ्ठ्या डेरेदार झाडाच्या आडोश्याला जाउन उभा राहिला. आजु-बाजुला बरीच लोक उभी होती. कोणीच कोणाशी फारस बोलत नव्हत. सगळे नुसताच पाऊस बघत होते. बाजुच्या ठेल्यावरचा चहावाल्याने नविन आधण चढवलेल होत. त्या वासाने सगळीच लोक चहा घेत होती. अनिही चहाचे भुरके मारायला लागला. त्याच्या डोक्यात विचार परत घोळका मांडायला लागलेत. 'लग्न करण म्हणजे गंमत थोडीच होती. मागेच मेघना सांगत होती की तिची आई विचारत होती आपल्या बद्दल ते. आता मेघना त्यांना काय सांगणार त्यांना? स्थळं बघा म्हणुन? च्यायला थोडं बर वाटत होत तर हे सगळे प्रश्न समोर बोहारल्या सारखे उभे. कसल्या जाळ्यात फसतोय, निघण्याचा जितका तडफडात करतोय तितकाच अजुन अडकतोय. तेवढ्यात झाडा समोर उभी असलेल्या लाल गाडीचा दरवाजा एका माणसाने उघडला. त्याला भरगच्च मिश्या होत्या आणि अंगाने तो चांगलाच बलदंड होता. हा माणुस इतक्या वेळ आपल्याच बाजुला उभा होता हे त्याच्या लक्षात आल. या माणसाला कुठे तरी आधी बघितल होत. गाडीत बसतांना तो अनिकेत कडे बघुन उगाच हसला. अनिकेतला कळेना तो माणुस का हसला ते कळेना. तो डोळे बारीक करुन त्या माणसाला बघायला लागला. ती लाल गाडी निघुन गेली. अनिकेतला परत तंद्री लागली. 'अमेरिकेला जायच काय करायच? मी पुढे जायच का, की पुढल्या वर्षी पर्यंत वाट बघायची. बरं, अमेरिकेला नाही गेलो तर आई-बाबा विचारणार, तर त्यांना काय उत्तर द्यायच? मेघनाच लग्न झाल्यावर तिला भेटण पूर्ण बंद होइल. किती दिवसां साठी? शी..आपणही निर्लज्जा सारख कोणाच्या तरी मरण्याची वाट बघत बसायच, गिधाडा सारख.
"साहेब, पैसे" पोर्‍याने अनिचा हात धरुन हलवल.
अनिने त्याला पैसे दिले. त्या पोर्‍याच्या कपाळावरच धगधगीत लाल गंध मजेशिर दिसत होत.
'आपण टेकडीवरच्या मंदिरात चक्कर मारायला हरकत नाही'
पाउसही कमी झाला होता पण अजुन थांबला नव्हता.
त्याने गाडीला किक मारली. पण गाडी रस्त्याच्या कडेवरुन अचानक घसरली आणि किक त्याच्या पोटरीवर सपकन बसली.
अनिकेतने शिवी हासडली.
"संभाल के भाऊ" झाडाखालुन कोणी तरी ओरडल. "रूक जाओ अभी. और एक चाय मार के जाओ"
अनि ने लक्ष दिल नाही. तो मंदिराच्या रस्त्याला लागला.
'बाबावर आपण एवढा विश्वास का टाकतोय याचा तो विचार करु लागला.
'त्याच चुकल असेल तर कोणी मरायच नाहीच आणि मेघना दुसर्‍याशी लग्न करुन बसायची. म्हणजे मी घर का ना घाट का असा अधांतरी लटकत राहीन.'
त्याला हे सगळे विचार नकोसे झाले होते. मंदिरात जाउन बर वाटेल अस त्याला वाटत होत.
समोरचा गाडीवाला इतकी हळु चालवत होता. ते बघुन अनिकेतला राग आला. त्याने दोन-तीनदा हॉर्न वाजवला पण ती गाडी ढिम्म हलेना. शेवटी त्याने गती वाढवली आणि उजवीकडुन गाडी घातली. ती गाडी कोण चालवतय बघितल तर झाडाखाली उभा असलेला मुच्छड गाडी मंदपणे गाडी चालवत होता. त्याला बघण्याच्या भानगडीत अनिच्या समोरच्या दिव्याच्या खांबाकडे गेल नाही. रस्ता रुंदीकरण्याच्या भानगडीत आधी रस्त्याच्या कडेला असलेले दिवे आता जवळपास रस्त्याच्या मधे आले होते. शेवटच्या क्षणाला अनिने त्या खांबाकडे बघितल पण तो पर्यंत उशीर झाला होता.
'म्हणजे एवढ सगळ करुनही तो मीच होतो' असा काहीसा विचार त्याच्या मनात वीजेसारखा चमकला आणि क्षणार्धात, पाखरु खिडकीच्या काचेवर आपटाव तसा तो खांबावर फाटकन आदळला.


"मेघना, उठ बाळा ५ वाजायला आलेत. कधीची झोपलीयस. "
मेघनाने डोळे खाडकन उघडलेत. तिच ह्र्दय धड-धड करत होत.
"आई, परिणिता म्हणजे नक्की काय?" तिने घाबरत आईला विचारल.
"म्हणजे?"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजायला लागला.

(क्रमशः)

हा भाग लिहायला बराच उशीर झाला त्या साठी क्षमा असावी. पुढल्या भाग या गोष्टीचा शेवटचा असणार आहे. श्री अंबरीश यांनी प्रत्येक भागाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

9/14/09

रेखांकित भाग ३

ताप उतरल्यावर लगेच मेघनाला घरी आणल. ताप सोडला तर बाकी सगळ ठीक होत पण तिने ताप चांगलाच अंगावर काढला होता. तिल घरी येऊन एक आठवडा व्हायला आला होता तरी तिचा थकवा काही जायच नाव घेत नव्हता. घरच्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तिला अचानक एवढा फणफणुन ताप यायला झाल काय? डॉक्टरांनाही काहीच कळेना. शहरात कुठली साथ वगैरे सुध्दा सुरु नव्हती. अजुन काही कमी असेल तर घरी आणल्यापासुन मेघना पहिल्यासारखी वागत नव्हती. नुसती शांत बसुन असायची. तशी ती फार बोलकी होती अस नाही पण तिने आता एकदम अबोला धरला. तिच तापातल असंबंध बोलण बघुन डॉक्टरांनी काही मानसिक तर दुखण नाही ना याची चौकशी केली होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांची काळजी अजुन वाढली
जसलीनच जाण-येण वाढल होत. एकदा मेघनाच्या आईने तिला विचारल की काय चाललय म्हणुन पण तिच्याकडुनही फारस काही बाहेर आल नाही.

"अनिकेत कुठे असतो आजकाल?" मेघनाने विचारल.

"माहिती नाही मला पण तुम्ही दोघेही अमेरिकेला जायची तयारी करताय ना? त्यातच गुंग असेल तो." जसलीन उत्तरली.

जणु काही घडलच नाहीया अस त्या दोघी बोलत होत्या.

"का ग तुझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही या का? कि मी देउ तो?" उगाच खौटपणे ती पुढे बोलली.

थोडा वेळ कोणीच काही बोलल नाही. मेघना नख खात होती आणि जसलीन पुस्तक चाळायला लागली. "खुप उकडतय. पाऊसही पडत नाहीया. पावसाची चाहुल लागताच वीज जाते. पंखे बंद" जसलीन गरमीने त्रस्त झाली होती. आकाशात ढगांनी गर्दी केंव्हाची केलेली होते. मुहुर्ताची वाट बघत त्यांनी वार्‍याचा व्यवहार थांबवला होता.

"फोनवरही तो इतका तुटक-तुटक बोलतो की काही न बोलल्यासारखच असत. जे विचारल तेवढ उत्तर देतो. 'कसा आहेस?' तर उत्तर येत. 'छान' आणि मग शांतता. 'मी कशी आहे विचारणार नाहीस का?' तर उत्तर येत की 'कशी आहेस?'

आता काय करू सांग" मेघना म्हणाली.

"त्याच्या डोक्यात काय चाललय मला नाही माहिती पण विचार कर तुला कोणी सांगितल की तुझा मृत्यु अटळ आहे वगैरे तर काय बितेल तुझ्यावर? मला तर कल्पना करणही अशक्य आहे" जसलीन म्हणाली.

" आणि माझ्यावर काय बितते आहे हे तुल दिसत नाही हे बरय. माझ्य नशिबि तो मरणार आहे. माझ नशिब फत्थर आहे. मी नाट आहे. मी नसती तर तो सुखात असता. मी नसती त्याच्या आयुष्यात तर त्याला..." मेघना एकदम शांत झाली.

"...तर त्याला आयुष्य होत" अस म्हणत ती रडायला लागली. "पण तो भेटत का नाहीया? मला आता राग येतोय त्याचा"

"किती वेळा सांगितल की तोच-तोच विचार मनात घोळवु नकोस. म्हणुनच तू बरी होत नाहीयास. तुझा थकवा जात नाहीया. आणि वा, तुला त्याचा राग येतोय! छान! " मग काही क्षण थांबुन जसलीन पुढे म्हणाली.

"मला माहिती नाही की मी हे तुला सांगायला हव की त्यानीच तुझ्याशी बोललेल बर पण तु हॉस्पिटल मधे असतांना मी त्याला बाबा बद्दल सांगितल. त्या नंतर तो बाबा ला स्वतः भेटायला गेला होता. बाबाने त्याला काय सांगितल मला नाही माहिती पण तो त्यांनंतर अजुन काही भविष्य सांगणार्‍यांकडेही गेला होता."

"मग?"

"मला त्याने फारस सांगितल नाही. पण तो एवढच म्हणाला.." जसलीन बोलायच थांबुन गेली

मेघना डोळे विस्फारुन करुन तिच्या बोलण्याची वाट बघत होती.

"तोच सांगेल तुल पुढच"

"आत्ता पर्यंत का लपवलस? सांग काय म्हणाला तो"

"मेघना" अस म्हणत जसलीननी मोठ्ठा श्वास सोडला.

"तो एवढच म्हणाला की कोणीच त्याला भविष्य सांगायला तयार नाही. सगळ्यांनी त्याला परतावुन लावल."

तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.

"अनि येतोय"

"बर, त्याला सांगु नकोस की मी तुला काही सांगितल म्हणुन"

"हो"

"मी निघते. काळजी घे. काकु विचारत होत्या सारख की मेघनाच काय चाललय म्हणुन"

"तु काय सांगितलस?"

"मी काय सांगणार. पण तू त्यांना अनिकेत बद्दल सांगुन टाक लौकर. अजुन उशीर करून काय होणार."

"काय सांगणार, दगड" मेघना पुटपुटली.

"बघ, झाली सुरुवात परत. इतक्या दिवसांनी भेटतोय तर थोडा प्रसन्न चेहर्‍याने स्वागत कर त्याच. तो चांगल्या मुड मधे नसणार॑"

"जसलीन, तू अजुन काही तरी लपवतेयस माझ्यापासुन" मेघना भुवया वर करत म्हणाली.

"काही गोष्टी मी न सांगितलेल्या बर. आणि काही गोष्टी त्यानेच तुला सांगितलेल्या बर्‍या, मी मधे पडण बरोबर नाही"

मेघना काहीच बोलली नाही. अनिकेत आल्यावर काय बोलाणर होणार या विचारात तिच मन धाव-पळ करत होत.

जसलीन गेल्यावर दहा मिनिटातच दाराची घंटी वाजली.

"घरी कोणी नाहीया का?" अनिकेतने घरात पाऊल ठेवताच विचारल.

"नाही"

तो खिडकीजवळ जाऊन बाहेर बघु लागला. त्याने नेहमीप्रमाणे खिशात हात घातले होते. "कुठे गेलेत सगळे?"

"घरातल्यांना भेटायच असेल तर नंतर ये. आत्ता फक्त मीच भेटु शकते" ती त्रस्तपणे उत्तरली.

अनिकेतने घरात जणु डाव्या पायाने आला होता. आल्यापासुन अनिकेतच तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हत हे बघुन मेघना आतल्या आत धुमसायला लागली होती.

"मी काही खाणार नाहीया तुला" ती फणकारली.

"किती गोड स्वागत करतेयस माझ. मला एकदम छान वाटतय बघुन" अनिकेत तुटक्या आवाजात मागे वळुन म्हणाला.

"इतक्या दिवसांनी भेटलास, विचारल तरी का की मी कशी आहे ते"

"किती वेळ झाला मला घरात पाऊल ठेवुन?" अनिकेत मनगटावरच घड्याळ तिच्या समोर नाचवत म्हणाला. तोही पेटला होता. " जेमतेम चार मिनट झाली असतील. आणि तुझा सुंदर मुखडा बघुन कुठुन इथे आलो अस झालय मला"

"मग आलाच कशाला? फोनवरच तुझ बोलण पुरत मला"

"मेघना, डोक चरायला गेलय तुझ" अनिकेत दात-ओठ खात म्हणाला.

"अस बोलायच असेल तर जा तू इथुन"

अनिकेत ने काहीच उत्तर दिल नाही. तो खिडकीतुन परत बाहेर बघायला लागला. काही क्षण असेच गेलेत.

"नको ना भांडुस असा" मेघना काकुळतेने म्हणाली.

दोघांनांही असली भेट अपेक्षित नसावी. कसल्यातरी विचारात दोघेही मग्न झालेत. कोणीच काहीच बोलेना. इतक्या दिवसांची भेट अस रूप घेइल अस तिला वाटल नव्हत. तिला अनिकेतला घट्ट मिठी माराविशी वाटत होती. त्यानी आपल्याला कुशीत घ्याव आणि लाड करावे अशी तिची अपेक्षा होती. पण तस काहीच घडल नाही. अवघडल्यासारखे दोघे भेटलेत आणि एकामेकांवर निखारे बरसवत होते.

मगापासुन मुहुर्ताला खोळंबलेला पाऊस शेवटी पडायला लागला. इतका वेळ दाटुन आल होत पण पाऊस जोरात पडत नव्हता. थेंबांची एकच रीघ संथपणे पडत होती.

मेघनाकडे न बघताच त्याने विचारले, "राणी तू कधी आरश्यात स्वतःला बघितल आहेस का?"

मेघनाला कळेना तो थट्टा करतोय कि खरच विचारतोय.

"म्हणजे?" तिने चाचपडत विचारल.

"वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि तुझ लग्न शुभ मंगल सावधान" तो हसत म्हणाला.

"काय बोलतोयस अनि?" मेघनाला तो काय बोलतोय अजुनही कळेना. त्याच ते हसण विक्षिप्त होत.

"तुला मातीचा वास येतोय का?" अनिकेत तंद्रि लागल्यासारखा बोलत होता. "पाऊस पडायला लागला की लोक वेगळेच वागयला लागतात. एकदम ताजे-तवाने दिसायला लागतात. त्यांच्या नकळत. आणि पावसा नंतर सगळीकडे चिखल आणि घाण होत असली तरी पाऊस निदान आधीची घाण वाहुन घेऊन जातो. नाहितर नविन घाणीला जागा कशी मिळणार? हे चक्र सदैव चालू असत. कधीही न संपणारा शिवा-शिविचा खेळ. निसर्गाच्या प्रत्येक चालीत हा खेळ दिसतो."

काही क्षण तसेच गेलेत. मेघनाच्या मनात शुन्य होत तर अनिकेतच्या मनात विचारांची धांदल उडाली होती.

"तुला मातीचा वास आवडतो का सांगितल नाहीस?" तो अजुनही मेघनाकडे बघायला तयार नव्हता.

"हो"

"मला खुप-खुप आवडतो. नव-निर्मितीचा वास असतो तो" त्याने पहिल्यांदा मेघनाकडे वळुन बघितल. "बाकी माझी बडबड सोड, पण मी हा वास खुप मिस करणार आहे"

मेघनाला त्याच्या अगम्य बोलण्याचे चटके जाणवायला लागले होते. अनिकेतला तत्त्वज्ञान वाचण्याची आवड होती आणि तो बर्‍याचदा आपल्याच धुंदित बोलत असे. पण असल आत्यंतिक आणि अधांतरी तो कधी बोलला नव्हता. तो हळु-ह्ळु निखारे शिलगवत होता.

"अस काय बघतेस?, भूत बघितल्या सारख."

"मला घाबरवु नकोस अनि"

त्याच्या बोलण ऐकुन आपण गेले आठवडाभर मी-मी चा घोष लावलाय आणि आपल्या नशिबिचा खरा भोग अनिकेतला आहे या जाणिवेचा साप तिला पहिल्यांचा डसला. परिस्थिती अजुन बिकट होत होती.

"तुला माझी भीती वाटायला लागली. मी अजुन भूत झालो नाहिया राणी!" अस म्हणुन तो जोरात हसायला लागला. "पण लौकरच"

तो परत उठुन खिडकी जवळ गेला. त्याच्या अंगात कसल तरी भूत संचारल होत.

"सुर्यास्त बघायला तुला आवडतो का? मी पण मगापासुन हे आवडत का ते आवडत का, अस बावळटासारख विचारतोय. सगळ्यांनाच सुर्यास्त बघायला आवडतो. पण का आवडतो माहितीय? कारण, सगळ्यांना माहिती असत की दुसर्‍या दिवशी सुर्योदय होणार आहे. अस समज की सुर्योदय होणारच नाहीया आणि आत्ताचा समोरचा सुर्यास्त शेवटला आहे, मग कस वाटेल? डोळे भरून सुर्यास्त बघशील की डोळे भरून रडशील?"

"अनि, अस विचित्र नको बोलुस. मला भीती वाटतेय. अस काहीही होणार नाहीया. आपण यातुन मार्ग काढणार आहोत ना? अस काय करतोस? तूच तर म्हणाला होतास ना हॉस्पिटल मधे की काही तरी करू म्हणुन मग आता अस का बोलतोयस?"

अनिकेत नी पहिल्यांदा तिच्या कडे वळुन बघितल. "तू जसलीनशी बोललीस ना मगाशी. परत सांगु का काय झाल ते?"

"नको. माहितीय मला. मला नाही इच्छा ऐकायची."

"तुझ्या लक्षात येतय का मेघना की तू अशी वागतेयस की त्रास फक्त तुलाच होतोय"

"नाही अनि, अस नको म्हणुस, प्लीज" ती रडवेल्या सूरात म्हणाली. "तुझ्यावर का बितते आहे याची मला कल्पना.."

"मेघना, मला मीच आरश्यात दिसत नाही." मेघनाच वाक्य कापत तो तिच्या जवळ आला. त्याचे डोळे भरून आले होते. ते बघुन मेघनाला भडभडुन आल. तिने केविलवाणा असह्य हुंदका दिला.

" मला माझ प्रतिबिंब दिसत पण त्यात बिंब नसत. जणु शरीराची प्रतिमा आहे पण त्यात जीव नाही. मी कितीही आरडा-ओरडा केला तरी ते तसच निश्चल आणि निर्जिव उभ रहात. माझ बिंब शेवटल मावळतांना बघण्याची अगतिकतका माझ्या नशिबी आलीय" अस म्हणुन तो उठला.

" नको जाऊस कुठे आत्ता" तिने त्याचा हात घट्ट धरला.

"मला खुप भीती वाटतेय मेघना. पण यातुन काही मार्ग नाही. मला एकट सोड आणि तू तूझ्या मार्गाने जा. तुझ्या समोर मार्ग आहेत. माझे संपलेत."

"अनि, तु हॉस्पिटल मधे खोट बोललास माझ्याशी"

"मेघना, काय खर आणि काय खोट? बोललो मी खोट, काय करणार आहेस? कोणी माझ काही बिघडवु शकत नाही"

"पण तू म्हणालास की काही तरी मार्ग काढु" मेघना खुळ्यासारखा तो पदर काही सोडत नव्हती.

"तुला परिस्थिती कळतेय का मेघना? काय मार्ग-मार्ग लाउन बसलीयस. तो शब्दसुध्दा थोडा कॉमेडीच वाटतोय. कुठल्या जगात वावरतेयस राणी? जागी हो. बघ माझ्याकडे एकदा. नंतर दिसणारसुध्दा नाही.

मार्ग, डोबंल मार्ग, त्याची तर..." अस म्हणत त्याने शिवी हासडली.

बघ, माझे हात? बघ..." अनिने हाताचे पंजे तिच्यासमोर नाचवले. "पांढरे फटक आहेत. काहीच रेखाटलेल नाहीया. रस्त कड्यावरून कोसळुन नाहीसा व्हावा तसा मी माझ्या हातावरच्या रेषांच्या गर्तात नाहीसा होणार."

त्याने मान टाकली. "मला मरायच नाहीया मेघना. अजुन काहीच केल नाही, काहीच बघितल नाही. असा कसा चालला जाउ. आई-बाबांना, मित्रांना, तुला टाकुन कसा जाऊ. हा कसला घाणेरडा खेळ चाललाय.." त्याच्या तोंडुन शब्द फुटेनासे झालेत.

विसर मला..." अस तो कस तरी म्हणत धावत निघुन गेला.

मेघना उशीत डोक घालुन एकटीच असह्य रडत बसुन राहिली. पण तिच्या डोक्यात अचानक काही तरी पेटल. ती दार उघडुन धावत खाली अनिकेत ला थांबवायला गेली.

"अनि"

"मेघना, काय करतेयस, लोक बघतायत" तिचा अवतार अणि आवेश बघुन अनिकेत म्हणाला.

"तु चल वर परत"

अनि काही बोलायच्या आधीच ती म्हणाली "माझ्याकडे एक आयडिया आहे"

(क्रमशः)
श्री अंबरीश यांनी हा भाग लिहिण्यास मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

7/22/09

रेखांकित भाग २

परतीच्या वाटेवर दोघीं पैकी कोणीच काहीच बोलत नव्हत. जसलीनला कळत नव्हत की स्वत:च्या लग्नाची चिंता करावी की मेघना बद्दल जे ऐकल त्या बद्दल तिच्याशी बोलाव. मेघना सुन्नपणे गाडी चालवत होती. तिला खर खुप रडावस वाटत होत, ओरडावस वाटात होत पण तिच मन दगडासारख निश्चल पडलेल होत. जे घडल, जे ऐकल ते सगळ एक अघोरी स्वप्न आहे आणि यातुन कधी जागं होउ अस तिला वाटत होत. बाबाने सांगितलेल सगळ खोट आहे अस ती सारख घोकत होती. पण बाबाला खोट बोलुन काय मिळणार होत?

मेघनाने जसलीनला घरी सोडल आणि ती आपल्या घरी आली तर कोणीतरी पाहुणे बसले होते.
"हि आमची मुलगी, मेघना" मेघनाच्या आईने ओळख करून दिली.

"माझ्या लहानपणी आम्ही शेजारी होतो. खुप खेळायचो. आज खुप वर्षांनी भेटतोय.

मेघनाने दोघांना नमस्कार केला आणि पटकन आत निघुन गेली.

"अग, चहा करतेस का?" आईने हाक दिली. मेघनाने काहीच उत्तर दिले नाही पण कपडे बदलुन चहाच आधण ठेवल. तिला खुप थकल्यासारख वाटत होत.

तेवढ्यात आई आत आली.

"अग, चहा कर म्हटलेल ऐकलस का?"

"हो"

"बर वाटत नाहीया का? ऊन लागल का?" तिचा पडलेला चेहरा बघुन आईने थोड काळजीने सुरात विचारल.

"नाही. बरं आहे" मेघना कसबस म्हणाली. तिला आता मळमळल्या सारख वाटत होत.

"चहा घेउन आलीस तर थोडी बस बाहेर थोडी. बोल त्यांच्याशी"

"मला कस तरी होतय" मेघना हळुच बोलली.

"बघ आत्ताच म्हणालीस बर वाटतय आणि आता म्हणतेस की बर नाही वाटत. चेहरा कोमेजुन गेला आहे. कशाला गेलीस उन्हात? थंडीतलही दुपारच ऊन बाधत बाळा"

आई बोलतच होती तर मेघनाला पाय जड झाल्यासारखे वाटायला लागल आणि अंगात थंडी भरली. तिने भिंतीचा आधार घेतला.

"मेघना" अस म्हणत आईने तिला सावरायचा प्रयत्न करू लागली. "अग काय होतय पोरी?"

मेघनाला सगळ भोवती गरगर फिरतय अस वाटु लागल. तिने थंडगार फरशीवर अंग टाकल. हात-पाय शिथिल पडले होते. शरीरापासुन दूर जातोय असा तिला भास व्हायला लागला. अंगात मुळीच म्हणजे मुळीच त्राण नव्हता. हळु-हळु कमी ऐकु येऊ लागला. कानात एकच असा कुं आवाज फिरु लागला. मेघनाला अचानक आठवल की कोणीतरी दूरच्या काकाला कमी ऐकु यायच आणि तो सगळ्यांना सांगायचा कि त्याला कानात ओमकारच ऐकु येतो. तिला मनात खुदकन हसु आल. आजु-बाजुच्या सगळ्या गोष्टी संथ झाल्या होत्या. आई सावरायचा प्रयत्न करत होती. बाहेरच्या पाहुण्यांना आईने हाक मारली असावी कारण त्या काकु वाटीतुन तोंडावर पाणी मारत होत्या. फारच थंड होत पाणी. तिला काय चाललय याची पूर्ण कल्पना होती पण शरीराने जणु साथ सोडायची झटापट लावली होती. तिने डोळे मिटले. तिला वाटल झोप लागेल पण झाल विपरीतच. दगडासारख निपचित पडलेल मन चुळबुळ करायला लागल. तिच्याशी भांडायची तयारी करायला लागल.

डोळ्यासमोर सारखा बाबा फिरु लागला. "जिसकी तुम परिणिता बनोगी उसकी मृत्यु अटल है।" याचा अर्थ काय? परिणिता म्हणजे नेमक काय? यातुन काहीच मार्ग निघु शकत नाही का? गोष्टींमधे तर नेहमी ऐकतो की व्रत-वैकल्य केलं की सगळ छान होत? मला वैकल्य म्हणजे काय हे सुद्धा नेमक माहिती नाही, मी कसली डोंबलाच व्रत-वैकल्य करतेय. पण त्याला काही तरी शब्द आहे. उ:शाप की अस काहीस म्हणतात. हो, बरोबर, उ:शापच. मला उ:शाप कोण देणार? गोष्टींमधे शाप देणाराच उ:शाप देतो. पण मला शाप कोणी दिला? काय चुकल माझ? कोणाच काय बिघडवल मी? मग कोणीच शाप न देता मी शापीत कशी?; तिला शापित शब्द नकोसा झाला. ज्वाळेसारखा तो शब्द तिला चटके देत होता.

ती डोळे उघडायचा प्रयत्न करू लागली. आपण नेमके कुठे आहोत ते तिला कळेना. आई अंधुकशी समोर दिसत होती आणि अंग भट्टीसारख तापल्याची तिला पहिल्यांदा जाणीव झाली. कपडे ओले-चिंब झालेले होते. घशाला कोरड पडली होती. तिने पाणी म्हणण्याचा बराच प्रयत्न केला पण तिला तोंडातुन भ्र काढण जमेना. आई काहीतरी बोलत होती पण ते तिला नीटस ऐकु येत नव्हत. अनिकेतच्या आठवणीने ती परत कासाविस झाली.

' अनिकेत कुठेय? जेंव्हा गरज असते तेंव्हाच तो नेहमी गायब होतो. किती आठवण येतेय त्याची. कुठेय तो? इथे मला जीव नकोसा झालाय आणि तो मस्त भटकत असेल. मित्रांसोबत चहा पित उभा असेल कुठल्य तरी चौकात. अस काय करतो तो? माझी काळजी नाहीया का त्याला?'


तेवढ्यात आईने चमच्याने पाणी पाजल. मेघना ने डोळे मिटले. अंगाचा ज्वर कमी झाल्यासारखा तिला वाटु लागल पण अनिकेतच्या आठवणीने मनातले निखारे आत्ता खरे शिलगु लागले होते.

'काय सांगायच त्याला? तो आधी थट्टेनी उडवुन लावेल मग त्याला सगळ पटवुन कस द्यायच? आणि समजावुन तरी काय सांगणार? त्याची झाले नाही तर मी जगु नाही शकणार आणि त्याची झाले तर तो नाही जगणार. कसला अभद्र खेळ मांडळाय दैवाने. दैवानेच शाप दिलाय मला, आता गार्‍हाण तरी कोणापुढे मांडणार?
'कालकूट विष को मन मे ही धारे रहो।" बाबा परत डोळ्यापुढे नाचु लागला.

'समुद्र मंथनातुन कालकूट विष निघाल म्हणतात आणि जगाला वाचवायच्या भानगडीत शंकर बळी चढला. पण त्यासाठी त्याला पार्वतीचा त्याग करावा लागला नाही. पार्वतीला सोड आणि कालकूट प्राशन कर अशी अट घातली असती तर त्याने काय केल असत?

कसले भन्नाट विचारांनी घोंगा घातलाय डोक्यात.'

तिला स्वतःपासुन कुठे तरी दूर पळुन जावस वाटत होत. 'तिला अनिकेत डोळ्यासमोर दिसु लागला.

'नेहमी खिशात हात घालुन फिरत असतो. स्मार्ट दिसतो अस त्याला वाटत, बावळट.'

"उसकी मृत्यु अटल है।" बाबाचे शब्द तिला परत आठवले. तिचा जीव कासाविस झाला. तिने डोळे उघडण्याचा परत प्रयत्न केला. समोर अंधार होता. ती अजुनच घाबरली. दिसण सुध्दा बंद झाल कि काय? मग तिच्या लक्षात आल की रात्र झाली असावी. समोर आई दिसत नव्हती. आता अंग तेवढ भाजत नव्हत पण घशाला कोरड पडली होती.

"आई" मेघनाने हाक दिली.

बाजुलाच बाकावर झोपलेली आई खडबडुन जागी झाली. तीने दिवा लावला.

"मेघना, कस वाटतय बाळा?"

दिव्याचा मंद प्रकाशही तिला असह्य होत होता. तिने त्रस्तपणे दिव्याकडे बघितल. आईने लगेच दिवा मालवला.

"पाणी हव का बाळा?"

मेघनाने डोळ्यानीच होकार दिला.

आई तिला चमच्याने पाणी पाजु लागली. तेवढ्यात नर्स खोलीत आली. तिने नाडी तपासली. खर्ड्यावर काहीतरी लिहिल.

"काळजी करु नका ताई. ताप उतरतो आहे. "

आपण हॉस्पिटल मधे आहोत हे मेघनाला आत्ता लक्षात आल.

'बराच घोटाळा केला म्हणजे आपण.' अस स्वत:शीच बोलत तिने परत डोळे मिटले.

"किती घोर लावलास मेघना" आई अस काहीस म्हणत होती पण मेघना मनाच्या गुहेत नाहीशी झालेली होती.

"जो होना है उसे होने दो, उससे खिलवाड मत करो" बाबा परत डोळ्यासमोर बाहुली सारखा नाचु लागला. 'अरे, अस कस होऊ देऊ? अस असत तर कधीच काहीच करायची गरज नको. सगळ विधिलिखित आहेच. अभ्यासही करायला नको कारण पास व्हायच तर पास होणारच आणि फेल व्हायच तर अभ्यास करुनही फेलच होणार. यातुन काहीतरी मार्ग काढावाच लागणार. वाट्टेल ते झाल तरी चालेल. दैव गेल खड्ड्यात! बघतेच काय करत दैव ते. त्याने त्याची चाल खेळली आता मी माझी खेळणार"

या विचाराने मेघनाला बर वाटल. तिल हळु-हळु शांत झोप लागली.

कोणीतरी हातावरून हात फिरवल्याचा तिला भास झाल. तिने डोळे उघडलेत समोर जसलीन बसली होती. दाराशी अनिकेत उभा होता. मेघनाने डोळे उघडलेले बघुन जिन्सच्या खिशात हात घालुन तो पलंगाजवळ आला. डोळे बारीक करत तो हसला.

"कस वाटतय?"

ते ऐकुन मेघनाला अजुनच छान वाटायला लागल. काहीतरी मार्ग नक्कीच निघणार याची तिला पक्की खात्री पटली.

"मला माहितीय सगळ. आपण काहीतरी विचार करु" तो शांतपणे म्हणाला. जणु तो तिच्या मनातलच बोलला. तिच्या मनात पेटलेल्या ज्वाळेत तो ही तितकाच होरपळला होता.

5/17/09

रेखांकित भाग १

ऊन विचित्र तापल होत. थंडीतल ते दुपारच ऊन नकोस वाटत होत. रविवारी आणि ते पण या उन्हात कॉलेजच तोंड बघायची मेघनाची मुळीच इच्छा नव्हती पण जसलीन बर्‍याच दिवसांची मागे लागली होती की बाबाच दर्शन घ्यायला म्हणुन ती पाय रेटत डोंगरीच्या पायथ्याशी आली होती. डोंगरीच्या माथ्यावर एक देऊळ होत आणि त्याच्या बाजुला कॉलेज. हा बाबा मात्र डोंगरीच्या पायथ्याशी, कॉलेजच्या मागल्या बाजुला बसत असे. तिथे एक औदुंबराच वृक्ष होत. डोंगरीच्या भोवताली मोहोंजोदाडोच्या अवशेषां सारखे भिंतीचे तुकडे पडलेले होते. बर्‍याच वर्षांपुर्वी डोंगरीच्या भोवताली भिंत बांधण्याचा उद्योग महानगरपालिकेनी केला होता. पण औदुंबराच्या झाडाला हात लावायची कोणातच हिंम्मत नव्हती. झाड तोडल तर तोडणारा निर्वंश होतो म्हणे. खरं काय आणि खोट काय ते औदुंबरच जाणे पण डोंगरीच्या वळखा घालणारी भिंत औदुंबराला वळसा घालुन बांधली होती. बाबा त्या वृक्षा खाली का बसायचा हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हत. खर सांगायच तर त्या बाबा बद्दलच कोणाला काही ठाऊक नव्हत. त्याला रामटेकच्या बसमधे चढतांना कोणी तरी बघितल होत पण तेवढच.

मेघना आणि जसलीन त्यांच्या डीओ वरून कुटकुट करत पायथ्याशी पोचलेत.

"या बाबा बद्दल तुला कोणी सांगितल?" मेघनानी विचारल

"चार वर्ष झाली कॉलेजची, तुला माहिती नव्हत?"

" माहिती होत मला पण मी कधी फारसा विचार केला नाही."

"तुझ बरय, तुला काय!" अस काहीस पुटपुटत जसलीन ने स्टँड लावला.

"माझा या भानगडीची थोडी भितिच वाटते" मेघना म्हणाली.

"भिती काय वाटायची त्यात आणि भानगड का म्हणतेस? तु कधी कुंडली किंवा हात दाखवला आहेस का?" जसलीनने विचारल. मेघना काहीच बोलली नाही.

"मग एकदा दाखव आणि बघ काय होत ते"

त्या दोघी बाबाच्या दिशेनी चालु लागल्यात.

"भविष्या जाणुन करायच काय? बदलता थोडीच येत ते. जे व्हायच तेच होणार. आगोदर माहिती करून घ्यायची आणि मग जिवाला घोर लावुन घ्यायचा. " मेघना म्हणाली.

"आणि तसही सध्या सगळ व्यवस्थित चालु आहे. विचारयला काहीच नाही. पण बाबानी सांगितलेलं सगळ खरं ठरत का? "

जसलीनच मेघनाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत. ती बाबा आपल्याला काय सांगणार याचा विचार करत असावी.

जसलीनच लग्न तिच्या घरचे गावातल्याच एका मुलाशी ठरावयला बघत होते. जसलीनला तो पोरगा मात्र मुळीच पसंद पडत नव्हत. तिच अजुन कोणावर प्रेम वगैरे नव्हत पण हा मुलगा तिला काहीतरी खोटा वाटत होता. तिची रहाणीमान साधी होती. पंजाबी असुन मराठी मैत्रिणींमधे राहुन ती मराठी जास्त वाढली होती तर हा पोरगा लहाण पासुन घरचा धंदा बघत असे आणि मस्तवाल हिंडत असे. त्याला एकदाच ती भेटली होती पण त्या एकाच भेटीत तिनी धास्ती खाल्ली. तिला पुढे शिकायच होत. लग्न झाल्यावर उच्च शिक्षण घेण अशक्य होत. घरचे आपल ऐकणार की नाही, लग्न याच मुलाशी कराव लागणार कि काय आणि करावच लागल तर पुढे काय या प्रश्नांशी ती झगडत होती. बाबा काहीतरी जादु करेल अशी काहीशी तिनी भाबडी समजुत करून घेतली होती.

बाबा औदुंबराच्या झाडाखाली सतरंजी घालुन बसला होता. त्याची वेशभूषा अनपेक्षित होती. वापरलेला पण स्वच्छ झब्बा-पायजमा, चष्मा लावलेला, त्याच्या कपाळावर धगधगीत लाल रंगाच गंध होत. बाबा म्हटल कि ज्या ठराविक गोष्टी डोक्यात येतात त्याच्या विपरीत हा बाबा होता. याला यशवंतराव हाक मारली असती तरी चालल असत. मेघना आणि जसलीन बाबापासुन काही अंतरावर उभ्या होत्या. बाबा कोणाशी तरी बोलण आवरत घेत होता. एक तरूण मुलगी घळाघळा अश्रु गाळत होती आणि तिच्या सोबत तिचे आई-वडिल असावेत, ते स्तब्ध होउन बाबाच बोलण ऐकत होते. ते बघुन या दोघी थोड्या चरकल्या. प्रकरण गंभीर दिसत होत पण बाबा शांत चेहर्‍यानी बोलत होता.

आधीचे आलेले लोक जायला लागलेत. मेघना त्या लोकांकडे वळुन वळुन त्या लोकांकडे बघत होती. इतकी कुठली वाईट परिस्थिती त्यांच्यावर गुदरली होती हे तिला माहिती करून घ्यायच होत. जसलीन च लक्ष मात्र आता बाबावर होत.

"आओ बेटी।" बाबा जसलीन ला बघुन बोलला.

"नमस्ते बाबाजी।" म्हणत जसलीन बाबाचे पाय शिवायला पुढे झाली.

"अरे बेटी मेरे पैर छुं क्या मिलना है? पैर तो उसके छुंओ जो पर्वत के माथे पे बैठा है।" बाबा हसत म्हणाला. तरी जसलीन ने नमस्कार केलाच. मेघना थोडी अवघडुनच उभी होती.

बाबा सूर्य प्रकाशा कडे पाठ करुन बसला होता. त्यामुळे समोर बसलेल्याच्या चेहर्‍यावर स्वच्छ प्रकाश पडत असे.

"मेरे पास मेरी जनम-कुंडली नही है।" जसलीन म्हणाली.

"कुंडली की कोई आवश्यकता नही है बेटी. तेरे माथे पर सब कुछ लिखा हुआ है।" अस म्हणत बाबाने जसलीनच्या कपाळावर नजर रोखली.

जसलीन काही बोलणार तर हातानी इशार करून बाबानी तिल थांबवले.

"अब पुछो जो पुछना है।"

"मेरी शादी तय हो रही....

"उसिसे तुम्हारी शादी होनी है।" बाबा निर्विकारपणे मधेच तिच वाक्य तोडुन म्हणाला.

जसलीन स्तब्ध झाली.

"पर मुझे और पढना है। और मुझे वो लडका पसंद भी नही है"। ती कसतरी बोलली. तिचा गळा भरून आला होता. पूर्ण गोष्ट न ऐकता बाबा एकदम फटक्यात निकाल लावेल अस तिला वाटल नाही.

"बाबाजी, आप कुछ तो कर सकते हो?"

"देखो बेटी, मैं कोई जादुगर नही हुं। जो लिखा है वो भगवान कि कृपा से मैं पढ सकता हुं। जो होना है वही होना है और जो ना होना है वो कभी ना होना है। पर तुम्हारे भाग मे अच्छा ही लिखा है। जैसा तुम समजती हो वैसा वो नादान नही है। हां पर शुरुवात मे परेशानी दोनो को होनी है। उसके पश्चात भगवान कि कृपा तुम दोनो पर होगी।"

अजुन काय बोलाव ते जसलीनला सुचेना.

"बेटी, तुम्हारे नसिब मे आगे पढना लिखा है।"

कोणी अजुन काहीच बोलेना.

"तुम्हे इतना सोचने की या चिंता करने की कोई आवश्यकता नही है।" बाबा पुढे म्हणाला.

"अब बेटी तुम सामने युं बैठो।" बाबा मेघना कडे बघुन म्हणाला.

"मला काही विचारयचा नाही या" मेघना पटकन म्हणाली. आपण मराठीत बोललो हे तिला लगेच कळल पण मग काहीतरी विचार करून ती बाबा समोर जाऊन बसली.

बाबाच्या कपाळावर आठ्या जमल्या. त्याने मोठ्ठा निश्वास टाकला. त्याचे डोळे गंभीर झालेत.

"पुछो अब क्या पुछना है।"

"मुझे नही पता मुझे क्या पुछना है।" मेघनाला हे म्हणतांना आपण खुपच बावळटा सारख बोलतोय अस वाटत होत.

"बेटी, बिना पुछे मैं कुछ बता नहीं सकता।"

मेघना काहीच बोलली नाही पण तिच्या डोक्यात विचार आला की पुढे काय घडणार हे विचारण्या ऐवजी मागे काय घडल हे विचाराव.

"बाबाजी, आप मुझे मेरा भूतकाल बता सकते हो" तिला वाटल की बघु तरी बाबात किती दम आहे ते.

"बेटी, भूतकाल बता कर क्या होना है। जो बित चूक है वो तो तुम्हे पता हि है। जिस प्रश्न का उत्तर पता हो, उसे प्रश्न नही कह्ते।"

मेघना परत विचार करु लागली.

"मेरी शादी कब होगी?" काहीतरी विचाराव म्हणुन तिने विचारल.

"इसी साल तुम्हारी शादी होनी है।" बाबा फारच गंभीर झाला.

मेघना चांगलीच चमकली. कॉलेज संपल्यावर ती अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची तयारी करत होती. अनिकेत सोबत. तिथे मास्टर्स संपल्यावर अनिकेतशी लग्न. पण अजुन दोन-तीन वर्ष तरी दोघांचा लग्नाचा विचार नव्हता. तिच्या डोक्यात विचारांची झुम्मड उडाली.

"और पुछो बेटी" बाबाला अजुन काहीतरी महत्त्वाच सांगायच होत पण विचारल्या शिवाय काही न सांगण्याचा त्याचा नियम दिसत होता. मेघना काहीच बोलत नव्हती म्हणुन तो सारखा तिला डिवचत होती.


"बेटी, कुछ बाते ऐसी होती है जो जानने पर जिना कठीन कर देती है। इसका अर्थ ये नही की वो बाते पता न हो तो बेहेतर है। क्योंकी सत्य कालकूट विष समान होता है। न जानो तो मुश्कील और जानो तो भी मुश्कील।"

बाबा हे अगम्य काय बोलत होत हे तिला कळेना. ती आता चांगलीच घाबरली होती. तिच्या मनात प्रश्नांच काहुर उठला होता. बाबा ज्या शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलत होता ते बघुन तो खोटं बोलतोय अस तर वाटत नव्हत. त्यातुन त्याची ख्याती तिला आधिपासुन माहिती होती. तो भविष्य सांगण्याचे पैसेही घेत नसे किंवा हे करा-ते करा असल काहीसुध्दा सांगत नसे. पण बाबाच्या बोलण्याचा संदर्भच लागत नव्हता.

"इसलिये उस विष को मन के भितर समा कर, आत्मसात करना यही एक उपाय है। होनी को कोई टाल नही सकता। स्वयं भगवान भी कुछ नही कर सकते। इसलिये जो होना है उसे स्विकार करे आगे बढो।" बाबा बोलतच होता.

"मेरी शादी अनिकेतसे ही होनी है ना?" मेघना नी चाचरत विचारल.

अनिकेत कोण हे बाबाला अर्थातच माहिती नव्हता.

"बेटी, ध्यान से सुनो। तुम जिसकी परिणीता होगी उसकी मृत्यु होनी है।"

मेघना थंड पडली. आपण कुठल्या भानगडीत पडलो अस तिला झाल. ती डोळे मोठ्ठे करून बाबा कडे बघत होती. खुप जोरात तिथुन पळुन जावस वाटत होत. पण बाबा पुढे काय बोलणार, काय सांगणार हे तिला ऐकायच होत.

"काही तर करू शकतो? यावर काहीच उपाय नाही हे कस शक्य आहे? तुम्ही खर बोलताय हे कशावरून?" मेघना कावुन बोलत होती.

"मैं सच बोल रहा हुं या झुठ ये तो समय हि बताएगा। वैसे भी मुझे झुठ बोल के क्या मिलना है।" बाबाने शांतपणे उत्त्तर दिलं मग तो पुढे म्हणाला " जो होना है उसे होने दो। उससे खिलवाड मत करो।"

काही क्षण असेच गेलेत.

"तुम्हारा घर-संसार बसेगा और तुम बहोत सुखी होगी। पर उसके लिए तुम्हे इस कालकूट विष को मन मे धरे रखना होगा।"

मागे कोणीतरी अजुन येउन उभ होत. आणि तसही बोलायला आणि ऐकायला काहीच उरल नव्हत.

मेघनाची नजर शुन्यात होती. काय झाल हे तिला अजुन झेपल नव्हत. जसलीन ला काय बोलाव सुचत नव्हत. तिनी मेघनाचा हात हात घट्ट धरला आणि त्या दोघी गाडी कडे चालू लागल्यात.

(क्रमशः)

1/28/09

निर्माल्य - भाग ५ (अंतिम भाग)

माई हॉस्पीटल मधे पोचल्यात तर त्यांना वातावरण तंग होत. सुनेचे वडिल, भाऊ आणि एक तीशीचा तरूण खोलीबाहेर उभे होते. तिघांपैकी कोणीही माईंशी काहीच बोलल नाही. आई आत सुनेपाशी बसली होती. माई घाई-घाईनी खोलीत गेल्या. विजय बाहेरच थांबला. सुन निपचिप पडली होती. तिला सलाईन लावलेली दिसत होती. पण कुठे दुखल्या-खुपल्याच दिसत नव्हत. माईंना थोड हुश्श झाल.
"काय झाल पोरी?" माईंनी प्रेमाने विचारल.
सुनेनी काहीच उत्तर दिल नाही. तिने डोळे मिटुन घेतलेत आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागलेत.
"रडु नकोस बाळा. मी आहे ना सोबतीला"
तरी सून काहीच बोले ना! सुनेची आई सुध्दा काही बोलायला तयार नव्हती.
"काय झाल पोरी? सांगशिल का?" माईंनी पुन्हा विचारल.
"श्रीकांतला विचारा" सूनेची आई रागाने म्हणाली.
"श्रीकांत?" माईंनी आश्चर्याने बघु लागल्या. "श्रीकांत आहे इथे" माईंनी पुढे विचारल.
"हे जे सगळं दिसतय ना ती सगळी श्रीकांतची करणी आहे" सुनेची आई गरजली.
माई थोड्या ताठरल्यात. त्या मनातल्या मनात काय झाल असेल याचे घाई-घाईने हिशोब करू लागल्यात.
पोलिस स्टेशनात पाहुणचार चालला असेल त्याचा. पहिली फेरी नक्कीच नसावी त्याची" सुनेची आई पुढे म्हणाली.
"अहो काय बोलताय? श्रीकांत पोलिस स्टेशनमधे? पोरी, बोल ग!." माईंनी काकुळतेनी सुनेकडे बघितल. सुनेच्या आईचे शब्द त्यांना नकोसे झाले होते.
"ती काही बोलणार नाही. मी सांगते तुम्हाला काय झाल ते. तुमचा श्रीकांत फार नावाजलेला आहे तुम्हाला माहितीच असेल. पण त्याची इतकी मजल जाइल अस कधी वाटल नव्हत. घरच्या बायका-पोरींवरच नजर टाकायला लागला? इतक पडाव माणसाने?"
"असं नका बोलु. श्रीकांत थोडा बिघडला असेल पण त्याची नजर वाईट नाही. आणि घरच्या पोरी-बाळी म्हणजे कोण? सुनेबद्दलच बोलताय ना तुम्ही? तो फार आदर करतो सुनेचा. अविनाश गेल्या पासुन तोच पाठीराखा आहे तिचा" माईंना बोलतांना श्वास लागत होता. हे सगळ अनपेक्षित होत. नेमकं काय घडलय हे माईंना अजुनही कळेना.
"पाठीराखा! पुत्र-प्रेम आंधळ असत हेच खर."
"अहो वहिनी, स्पष्ट पणे सांगा काय झाल ते. कुत्सित बोलण पुरे झालं"
आतापर्यंत सुनेचे वडिल आणि भाऊ खोलीत आले होते. तो तिशीचा पुरुष दाराशी ताटकळत उभा होता.
"श्रीकांतने पोरीशे छेडखानी केली" सुनेचे वडिल शांतपणे म्हणालेत. त्यांच इतक शांत वागण विपरीत होत.
माई वीज पडल्यासारख्या स्तब्ध झाल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांना काय बोलाव ते कळेना. श्रीकांतची इतकी हिंम्मत? दारू-काडी इतक तर आपल्याला माहिती होत. स्वतःच्या सख्ख्या वहिनीवरवाईट नजर टाकण्या इतका बिघडला असेल यावर माईंचा विश्वासच बसेना.

"त्याला दादरच्या पोलिस स्टेशन मधे दिलय"

"हे अशक्य आहे. श्रीकांत कधीही अस करणार नाही. मला माझा श्रीकांत पूर्ण माहिती आहे. आई आहे मी त्याची. तुम्हाला काही तरी गैरसमज झालाय. पोरी, सांग मला की खरच अस झालय का ते." त्या कश्या-बश्या बोलल्यात.
"माई, हे असलं बोलायला हा काही चित्रपट नाही. तो आत्तापर्यंत काय करत होता हे तरी तुम्हाला नेमक ठाऊक होत का? मग तो इतका पडु शकतो हे तुम्हाला कस कळणार?"

"पोरी, बघ माझ्याकडे. उत्तर दे मला. मी काय विचारतेय" माईंनी सुनेकडे रोखुन बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रु संथपणे वहात होते.

"आणि सुमा काही तुम्हाला उत्तर देणार नाही या. ती तुमची कोणीच नाही."

माईंनी असाह्यपणे खोलीत नजर फिरवली. पण त्यांना कुठुनही कसलीही मदत मिळणार नव्हती. सुनेचे वडिल हात पाठीमागे बांधुन माईंना बघत होते.

"निघा आता" सुनेची आई गरजली. "लग्न लावायला निघाल्या होत्या"

सुनेचे हुंदके आता वाढायला लागले होते पण तिच्या तोंडुन एक शब्द बाहेर पडायला तयार नव्हता.

माईंना आजु-बाजुच ऐकु येण बंद झाल. कानात सुं आवाज येऊ लागला. त्यांच्या तोंडुन रडण्याचा आवाज मुळीच येत नव्हता जणु हंबरडा फोडायला त्यांना भीती वाटत असावी.

माई भग्न अवस्थेत खोलीतून बाहेर पडल्यात. त्यांचा पदर पडल्याचाही त्यांना पत्ता नव्हता. माईंना अस बघुन विजय चांगलाच थिजला. त्याला आतला आरडा-ओरडा ऐकु येत होता पण त्याला संदर्भ लागला नव्हता. तो तरूण अस्वस्थपणे माईंकडे बघत होता.

विजय माईंच दंड पकडुन बाकाकडे नेण्याचा प्रयत्न करु लागला पण माईंनी विजयला झिडकारले. त्यांच्या अंगात अचानक अवसान आल.

"दादरच्या पोलिस चौकीत चल" त्या विजयला त्वेषाने म्हणाल्यात आणि तरातरा इस्पितळातून बाहेर पडु लागल्यात.


विजय माईंमागे धावला. "माई, तुम्हाला माहितीय का कुठेय चौकी?"

माईंनी मान हरवली.

"जवळपासच असेल. मी पटकन कोणालातरी विचारून येतो. तुम्ही आत बसा तो पर्यंत"

"नको, मी इथेच उभी ठिक आहे"

विजय पत्ता विचारून येईपर्यंत माईंनी स्वतःला सावरल होत.

"मला वाटलच जवळपास असेल. इथेच गोखले रोडवर आहे" विजय बोलला. मग थोडा चाचरत तो पुढे म्हणाला " श्रीकांत दादा.."

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्यांनी विजयकडे शांतपणे बघुन नुस्ता चलायचा नुसता इशारा केला. त्यांचे डोळे लाल झाले होते.



दादरच्या पोलिस चौकीवर बरीच गर्दी होती. विजय किंवा माईंपैकी कोणी कधीच असल्या वाटेला गेल नव्हत त्यामुळे चौकीत नेमक कोणाला आणि काय विचारायच ते कळेना. पण तेवढ्यात चौकीतून एक तीशीचा इंस्पॅक्टर धावत बाहेर आला.

"माई, या"

"ओळखल नाहीत का तुम्ही मला"

" श्रीराम?"

"नाही मी त्याचा लहान भाऊ अशोक"

" मी आत्ता तुमच्याकडेच येणार होतो श्रीकांतल घेऊन. तुम्ही इथे याव अशी माझी मुळीच इच्छा नव्हती"

"आत या तुम्ही"

"ए, पाणी आण रे लौकर"

"काळजी करू नका. श्रीकांतला इथे आणल्या बरोबरच मी त्याला ओळखल. त्याला आत केलच नाही"

माईंना काय बोलाव ते कळेना. "आत करण" म्हणजे मारहाण करण तर नव्हे या विचाराने त्यांच्या अंगावर काटा आला.

"फार लहान असतांना बघितल होत पण अविनाश सारखाच दिसत"

"अविनाशच ऐकुन फार वाईट वाटल"

माई आत आल्या तर श्रींकांत खोलीच्या टोकाशी बाकावर मांडी घालुन बसला होता. तोंडात रंगलेला खर्रा आणि वरच्या गुंड्या उघड्या टाकलेला तो शर्ट बघुन माईंचा पारा सणसण तापला. त्या तरातरा त्याच्याकडे चालत गेल्या.

माईंना बघुन श्रीकांतने मान खाली टाकली. माईंनी त्याच्या जवळ जाऊन त्याला सणसणीत झापड मारली. श्रीकांत बाकवरून कोलमडुन खाली पडला. तो आश्चर्याने माईंकडे बघु लागला.

"आई, तु मला मारतेयस?" तो कसातरी बोलला.

"नालायका, अविनाशच्या ऐवजी तू त्या बसमधे का नव्हतास" त्या श्रीकांतला अजुन मारण्याचा प्रयत्न करू लागल्यात पण पहिली झापड मारण्यात त्यांचा सगळा त्राण निघुन गेला होता. श्रीकांतला मारण्यात त्यांच्याच हाताल लागत होत पण अंगातल्या त्वेषाला तर आत्त कुठे ऊत येत होता.

"नुस्ता बसुन तुकडे तोडतोस आणि बाहेर उनाडक्या. हे असल काही करण्या आधी मीच मारून टाकायला हव होत"

श्रीकांतही रडत होता पण तो माईंना अडविण्याचा मुळीच प्रयत्न करत नव्हता. तो निमूटपणे मार खात होता. माईंचा आवेश बघुन इतर कोणी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत नव्हत.

माईंच्या बांगड्या फुटत होत्या आणि त्यांची मनगट रक्ताळली होती. त्यांनी शेवटी थकुन जमिनीवर फतकर मारल.

पोलिस चौकीत असल प्रकरण नविन नसाव कारण पोलिस अधिकारी, विजय आणि एक महिला अधिकारी माई पडल्या वगैरे तर सावरायच्या तयारीत असलेली सोडली तर बाकी कारभार संथपणे चालू होता.

श्रीकांतने शेवटी माईंचे दोन्ही हात घट्ट धरले आणि केविलवाण्या सुरात त्याने विचारले "आई, काय चुकल माझ?

"तुला काय वाटत मी काय केलय ते?"

"वहिनीकडे असं बघण्याची तू हिम्मतच कशी केलीस? कोणी शिकवल तुला हे सगळ? तू असल काही करणार आहेस माहिती असत तर तू पोटात असतांनाच विहिरीत जीव दिला असता. किती छळशील. मोठ्याने जाऊन छळल आणि लहाना राहुन छळतो" अस म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.

श्रीकांत माईंकडे रोखुन बघु लागला. त्याच्या डोळ्यातुन अश्रु वहाण थांबल.

"आई, असा वाटलो का मी तुला?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्या रडतच होत्या.

"आई, वहिनीला दुसर्‍या पुरुषासोबत बघुन मी काय कराव अस वाटत तुला" श्रीकांतनी कडक शब्दात विचारला.

श्रीकांतने माईंचे दंड पकडुन गदागदा हलवल. "आई, मी एकदा नाही तीनदा त्या माणसा सोबत तीला वेगवेगळ्या जागी बघितल"

"लक्षात येतय मी काय म्हणतोय?"

"शेवटी आज मला सगळ असह्य झाल आणि मी पुरुषाला मारायला धावलो. त्या भानगडीत वहिनीला लागल असाव पण पोलिसांनी मलाच धरल"

माईंना कळेचना की श्रीकांत बोलतोय ते खर मानायच कि सुनेच! पण सुन तर काहीच बोलली नाही. त्या विस्मित होऊन श्रीकांतकडे बघु लागल्यात.

"नंतर सुमा वहिनीचे वडिल आले होते चौकीत. तक्रार नोंदवायला पण अशोक दादानी त्यांना परतावुन लावल. पण जाता-जाता त्यांनी मला धमकावल की ते त्यांच्या मुलीच लग्न माझ्याशी कधीच होऊ देणार नाहीत"

"आई, ऐकतेयस का? तु वहिनीच लग्न माझ्याशी लावणार होतीस अस त्या लोकांना वाटलच कस? इतके नालायक लोक आहेत ते. तिच्या माहेरचे वहिनीच लग्न लावायला निघालेयत. आपल्याला न विचारता! वहिनी आपल्या घरची सुन ना?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही.
"पण सुमा च्या आई-वडिलांशी लग्ना बद्दल कधी बोललेच नाही" अस काहीस पुटपुटत माईं स्तब्ध झाल्यात. प्लॅस्टिक च्या बाहुली सारख्या त्या शुन्यात दृष्टी लाउन तश्याच बसुन राहिल्यात.

(समाप्त)

हि माझी पहिली दिर्घकथा वाचकांना आवडेल अशी मी आशा करतो. आपले अभिप्राय अवश्य कळवावेत हि नम्र विनंती.

शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत पण वाचकांनी त्या पदरी घ्यावात. आणि चुका दुरुस्त करण्याची सोपी पध्दत माया-जाळावर उपलब्ध असेल तर कृपया मला कळवावे.




1/21/09

निर्माल्य - भाग ४

काळ कधी सरकतो कळत नाही. झाडांवरची गळलेली पान आणि चेहर्‍यावरच्या वाढत असलेल्या सुरकुत्या जणु फक्त साक्षीला असतात. अविनाश ला जाऊन पहाता-पहाता दीड वर्ष झाल. डोळ्यातून अश्रुंची रहदारी थांबली असली तरी डोळे कोरडे झाले नव्हते. जाणारा नेहमीच सुखात असतो कारण मृत्यु जे मागे राहिले त्यांनाच छळतो. माईंना शाळेची बरीच कामं असत. त्या व्यापात त्या मग्न असल्या तरी विषण्णता त्यांच्या हृदयात माहेरी आलेली होती. रंग उडालेल्या सुनेला बघुन त्यांचा जीव थोडा-थोडा होत असे. सुनेच्या आयुष्याची पहाट होता-होताच काळरात्र झाली हा विचार त्यांची दुसरी सावली बनला होता.


त्यांचा स्वतःचा संसार तर सावळा गोंधळच होता पण नावाला का होईना नवरा तर होता. शिवाय दोन सोन्यासारखी पोर होती. माईंच्या मनात नेहमी द्वंद्व चालू असे. अण्णांच जे काही झाल ते काहे व्हायला नको होत. नियतीचा खेळ वगैरे तत्त्वज्ञान ठिक आहे पण अण्णांनी आणि माईंनी कोणाचही कधीही वाईट केल नव्हत तर दोघांची आयुष्य अशी भेसूर का व्हावीत या प्रश्नांशी माई भांडत असत. त्यांच्या थंडगार संसारात अंतरीच्या घालमेलीची त्यांना उब मिळत असे. पण स्वतःच्या पोराचा असला करूण अंत आणि समोर जिवंत शरीरात निर्जिवतेनी वावराणारी सून बघुन त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या दु:खाच्या भाराखाली त्यांच स्वतःशीच बोलण बंद झाल होत. तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की जीवनातल्या दु:खांची उत्तरे तत्त्वज्ञान्यांकडे मुळीच नसतात. म्हणुन जग मिथ्या आहे आणि हे दु:ख दु:खच नाही किंवा ही सगळी देवाचीच करणी आहे असली बाष्कळ बडबड करत असतात. मी मी म्हणणार्‍या तत्त्वज्ञानी माणसाला तरूण मुलाच्या देह बघावा लागणार्‍या आई समोर उभ कराव आणि विचाराव की मृत्युनंतरच्या अनंत सुखासाठी जगण्याचे दु:ख देणारी ही कसली माया? आणि हा खेळ दाखवणारा असा कसला हा देव? कढत अश्रुंचा खारटपणा काढायची 'माया' जो करून दाखविल तो खरा देव! पण त्या भानगडीत देव पडायचा नाही. आणि या प्रश्नाची उत्तर देण्याच्या वाटेला तत्त्वज्ञानी मंडळी मुळीच भटकायची नाही. या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कारण हे प्रश्नच प्रश्न नाहीत. हे तर केवळ दु:ख आहे. अनंत आणि अथांग. समुद्रासारख. कुठल्या काठा पासुन आरंभ झाला ते माहिती नाही आणि कुठे अंत होणार याचीही कल्पना नाही. सतत येणारी वादळ गिळंकृतही करत नाहीत. प्रत्येक वादळ मनाचा एक-एक टवका फाडुन घेउन जात. वादळ गेल की हे मन परत स्वप्न बघायला लागत आणि सत्र पुन्हा सुरु.


माईंना मरायचीही भीती वाटु लागली होती. मेल्यानंतर भूत होऊन इथेच अडकुन राहिलो तर? त्यामुळे त्या सगळ्यांची काळजी घ्यायची पराकाष्ठा करीत असत. त्यांना सारखा वाटे वाफेने धुसर झालेल्या आरश्यावर काही लिहाव तस त्यांच आयुष्य गेलं. क्षणभंगुर, एकाकी, उदास, श्रांत. वाफ उडुन गेल्यावर आरश्यावर लिहिल्या पैकी काहीच उरत नाही. उरतो फक्त प्रतिबिंब बघवत पण नाही आणि त्या प्रतिबिंबाला टाकुन कुठे दूर जाताही येत नाही.


अविनाश गेल्यानंतर दोन महिन्यातच माईंनी सूनेला जोरा करून शाळेत परत नोकरीला धाडल. माई स्वतः शाळेत असतांना सून घरी वठत चाललेल्या लाकडासारखी पडली आहे याची माईंना फार काळजी लागलेली असे. शाळेत परत नोकरी सुरु झाल्यानंतर सुनेत थोडा-थोडा बदल होऊ लागला. आजकाल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाक्यांमधे यायला लागली. आधी तर फक्त हो किंवा नाही यातच संवादाची घडी होत असे. अण्णांनी "अविनाश आताशा दिसत नाही" अस परवा विचारल. त्यामूळे अविनाश गुडुप झालाय याची नोंद त्यांनी दिड वर्षांनी का होईना घेतली.


श्रीकांतच गाड अजुनही चालूच होत नव्हत. बाहेरुन माईंना बर्‍याच गोष्टी ऐकु येत असत. उनाडक्या करण्यातच त्याचा वेळ जात असे. मग त्याच तोंड पानाने रंगलेल दिसु लागल. सिगारेटचा वास मधे मधे येत असे. त्यासाठी तो पैसे कुठुन आणत होता ते मात्र कळत नसे. हा जुगार वगैरे खेळतो का अशी शंका माईंना येऊ लागली. वडिल भाऊ गेल्यावर त्यात फारसा बदल झालेला नव्हता. घराबाहेर तो काय काय करत होता तोच जाणे पण त्याचं वागण बेदरकार किंवा मुजोर कधीच नव्हत. तो घरी सुता सारखा सरळ वागत असे. विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देत असे. अविनाश असे पर्यंत तो अविनाशचही ऐकत असे. नुकतच कॉलेज पूर्ण केल्याच त्याने माईंना सांगितल. सर्टिफिकिटही दाखवल. तो त्या दिवशी बराच वेळ देवघरात बसुन माईंशी बोलत होता. आता तो नोकरी शोधतोय आणि लौकरच नोकरी लागेल त्याला. तो आपणहुन अविनाश च्या कामावर जाऊन आला होता. काय खर काय खोट माईंना कळत नव्हत.माईंचा त्या सर्टिफिकिटवरच मुळी विश्वास नव्हता. पण त्यांनी श्रीकांतला काही उलट प्रश्न विचारले नाहीत. अंतरी त्यांना भीती होती की त्यांच्या श्रीकांतबद्दलच्या शंका खर्‍या निघाल्यात तर? त्यांच हे वागण श्रीकांतच गाड रुळावर नसण्याच कारण होत की त्यांचा स्वतःला जपण्याचा प्रयत्न होता कोण जाणे.

श्रीकांतच जे व्हायच ते होईल. त्यांना सध्या सुनेची काळजी होती. त्यांच्या डोक्यात एक नविन विचार पिंगा घालत होता. सुन एवढी तरणी आहे तर तिच पुन्हा लग्न लाउन द्यायच. आताशा समाजहि पुढारला होता. आणि पहिला नवरा मेला म्हणुन तिने का उरलेल आयुष्य कुढत काढाव? म्हणुन त्यांनी एकदा ठरवुन सुनेजवळ तो विषय काढला. पण काहीही न उत्तर देता ती खोलीत चालली गेली. जखम झाली असली तरी मलम लाउन पुढे जाणच भाग असत. तिला ते समजावुन सांगण कठिण होत. सुनेच्या लग्नाच्या विचाराने त्यांच्या मनाला हुरहुर लागली. तीचा संसार परत चालू होणार याचा त्यांना आनंद होत असला तरी घरची पोरगी परघरी जाणार याची त्यांना काळजी वाटत होती. कुठली मुलं विधवेशी विवाह करायला तयार होतील किंवा विधुर मुलंच बघायला लागतील का इत्यादी बरेच गोष्टींवर त्या विचार करू लागल्यात. त्यांच्या ओळखीत विधवा विवाह झाला नव्हता. मग त्यांनी विचार केला की सुनेच्या आई-वडिलांशी या बद्दल बोलाव. त्यांना काही आक्षेप नसणार याची माईंना खात्री होती तर होतीच पण एकाहुन तीन डोकी बरी!


माई नुकत्याच शाळेतून आल्या होत्या. शनिवारी म्हणुन दुपारची शाळा भरत असे. सून आज संध्याकाळी दिवेलागणीला येणार होती. ती सकाळीच माहेरी गेली होती. पुढे मुंबईत कोणा नातेवाईका कडे त्या सगळ्यांना जायचे होते. आल्यावर माईंनी अण्णांसाठी चहा केला व त्या वर्‍हांड्यात विश्रांती घेत बसल्या होत्या. स्वयंपाक काय करायचा असला काही त्या विचार करत होत्या.


"अहो, आज कसली भाजी करू?" माईंनी अण्णांना विचारल.

पुढुन काहीच उत्तर आल नाही. माईं मोठ्ठा उसासा सोडत उठल्या. असला एकला संवाद काही नविन नव्हता मग उसासा सोडायला काय झाल या विचाराने माईंना थोडं हसु आल. तेवढ्यात शेजारचा विजय "माई, माई" ओरडत धावत आला.

"काय झाल रे बाळा?"

"माई, चला लौकर तुम्ही?"

"हॉस्पिटल मधे"

"अग बाई, काय झाल रे?" माईंनी चकित होऊन विचारले. त्यांच्या पोटात खड्डा पडला. श्रीकांतचा दोन दिवस झाले पत्ता नव्हता पण त्याच अस गुडुप होण काही नविन नव्हत.

"चला तर तुम्ही"

"माई, वहिनीला दाखल केलय?" विजय घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला.

"कोण वहिनी?" माईंना कळेचना.

"सुमा वहिनी"

माईंनी डोळे विस्फारले. ते बघुन विजय अजुन घाबरला.

"बर तुम्ही आधी इथे बसा"

"अरे, चला काय, बसा काय? काय झाल नीट सांग विजय. इथे कोणी लहान नाही या" माईंनी स्पष्ट शब्दात विचारल.

"मला काय झाल नेमक माहिती नाही. मी शाळेतून परत येतांना वहिनींचा भाऊ दिसला. त्यानी तुम्हाला निरोप द्यायला सांगितल की वहिनींना दादरच्या हॉस्पिटलात दाखल केलय. तो म्हणाला काळजीच कारण नाहीया पण तुम्हाला तातडीने बोलावल आहे"

"काळजीच कारण काय नाही डोंबल. हॉस्पिटलात काय गंमत म्हणुन जातात का लोक?"

विजयला काय उत्तर द्याव कळेना.

माईंनी घाई-घाईने वहाणा चढवल्यात व त्या स्टेशन कडे चालू लागल्यात. विजय त्यांच्या पाठी मागे येत होता.
(क्रमशः)

9/5/08

निर्माल्य - भाग ३

माईंच्या डोळ्यातील अश्रुंचीच जणु पाऊस वाट बघत होता. एकसंथ पावसाची रीघ लागली. इतका वेळ गद्द झालेली हवा लगेच मोकळी झाली. बघता बघता हवेत गारवा आला. माई उठल्या, त्यांनी डोळे पुसले आणि माजघरात आल्या. सून रडून रडून झोपून गेली होती. दिवे लागणीची वेळ व्हायला आली होती. माजघरातल्या बायकांना माईंना बघुन नेमक काय बोलायच किंवा काय करायच कळत नव्हत. खर सांगायच तर माई इतक्या कमी रडल्या होत्या त्याचीच सगळ्यांना काळजी वाटत होती.

"माई या बसा" म्हणत कोणीतरी खुर्ची आणुन दिली.

माईंच लक्ष नव्हत.

"काय करताय अक्का?" माईंनी स्वयंपाकघरात गॅसपाशी उभ्या असलेल्या बाईला विचारल. एका शेगडीवर दूध ऊतू जात होत. अक्का गॅसशी झटापटी करत होत्या. गावात दोन-तीन घरांमधेच गॅस होता. अविनाश ने नुकताच घरी सिलेंडर लावला होता.

"चहा करत होते सगळ्यांसाठी पण या शेगडीची मेली भानगड कळत नाही." अक्का उत्तरल्या. माईंनी दुसर्‍या शेगडीकडे नजर टाकली. दुसर्‍या शेगडीवर काहीतरी खदखदत होत.

"पिठल करत होते. लोक येतीलच, जेवायच तर लागेलच ना" अक्कांच्या चेहर्‍यावर अपराधी भाव उगाच होते.

"बरं सुचल तुम्हाला" अस म्हणत माई वर्‍हाड्यांत पुन्हा आल्या आणि अण्णांच्या आरामखुर्चीवर अंगाची घडी करून बसल्या. घरात पिठल शिजतय या विचाराने त्यांना हसु आल. जो जायचा तो जातोच पण मागे राहिलेले भूकेच्या पछाड्यातून थोडीच सुटतात. भूकेला काही भावना नसतात. त्यांनी पदरात स्वतःल गुरफुटुन घेतल आणि चुकलेल्या गणितांचे हिशोब त्या करू लागल्या. पण कुठे हातचा चुकला त्यांना परत कळेनास झाला. ती संध्याकाळ त्यांच्या घशाशी आली होती. त्या परत आठवणींच्या गुहेत नाहीश्या झाल्या.

कोणाचही कोणावाचुन आणि कशावाचुन अडत नाही. रहाटगाड चालूच रहात. बघता बघता पोरं मोठी झाली. श्रीकांत लहाना आणि अविनाश मोठा. दोघांमधे चार वर्षाच अंतर होत. दोघांमधे पण त्यांच्या स्वभावात जमिन-आस्मान चा फरक होता. परिस्थिती छन्नी प्रत्येक मनुष्यावर निर्-निराळ्या तर्‍हेनी आकार देते. आईची होणारी सततची तक-तक आणि वडिलांची होत असलेली दुर्दशा बघुन अविनाश स्वभावाने विचारी आणि शांत झाला. घरची जवाबदारी लौकरात लौकर खांद्यावर घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असे. त्यांने आपले शिक्षण नीट पूर्ण केले. त्या काळात उठ-सुट सगळे इंजिनिअर होत नसत तेंव्हा त्याने मुंबई महाविद्यालयातून मेकानिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मुंबईलाच टाटा कंपनीत तो नोकरीला लागला होता. तो वडिलांवर गेला होता. अत्यंता हुशार आणि परिस्थितीमुळे कष्टीक. आईची काळजी त्याला सतत लागलेली असे. त्यामुळेच माईंची मदार अविनाश वर असे. श्रीकांतची काही फारशी शाश्वती नव्हती. तो लौकीक दृष्ट्या वाया गेला होता अस म्हणता येणार नाही पण निकम्मा जरूर होता. त्याने शिक्षण पूर्ण केल तरी पावलं अशी परिस्थिती होती. बुध्दु होता अश्यातला भाग नाही पण उनाडक्या करण्यातचा त्याचा बहुतांश वेळ जात असे. घरी बापाचा धाक नाही आणि आईला तो जुमानित नसे. त्याचाही आईवर जीव होता पण त्या पलिकडे आपली काही जबाबदारी आहे असे त्याला वाटत नसे एवढच. अविनाश ला नोकरी लागल्याच्या दोन वर्षाच्या आत माईंनी त्याला बोहल्यावर चढवला. गावातलीच मुलगी होती. तीनेही बी.ए. पूर्ण केल होत आणि माईंच्या शाळेत नुकतीच शिक्षिका म्हणुन लागली होती.

अण्णाच्या आजारपणाला सुरुवात झाल्यापासुन पुढल्या वीस वर्षाचा काळ इतक्या झपाट्याने गेला की माईंना फारसा विचार करायला फुरसत मिळाली नाही. सुरुवातीची देव-देवके थंडावली होती. अण्णा असेच रहाणार हे माईंनी मान्य केले होते. नवर्‍याचे सुख त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्ष सोडलीत तर कधीच लागले नाही. अण्णांचे व्यक्तीमत्व गेल्या वीस वर्षात सप्तरंग दाखवुन आता पांढरे फटक पडले होते. कुठल्याही भावनांचा लवलेश त्यांच्यात उरला नाही. फिटस मधुन मधुन येत असत. घरच्यांना नेमकं काय करायच हे पक्क माहिती होते. फिटस येउन गेल्यावर थोडं बहुत बोलणारे अण्णा अजुन गडद होत असत. परत पूर्ववत यायला दोन आठवडे लागत. पूर्ववत येण म्हणजे खायला दे किंवा चहा कर एवढ्या पूर्तीच त्यांची बौध्दीक क्षमता सिमित झाली होती. सुख-दु:खाच्या पलिकडे ते जणु गेले होते. आल्या -गेल्यांची विचारपूस नाही किंवा घरात होत असलेल्या गोष्टी मधे रस नाही. लाकडाची मूर्ती जणु घरात फिरत असे. पेपर मात्र दररोज वाचत असत. सकाळचा पेपर संध्याकाळ पर्यंत ते रात्रीपर्यंत पेपर त्यांच्या हातात असे. काय कळायच त्यात त्यांना देवच जाणे. थोडक्यात ते आहेत काय आणि नाही काय एकच होत.

दोन पोरांपैकी एक तर मार्गी लागला होता. संसारी पुरुष झाला होता. लहान्याची चिंता होती. पण अविनाश ओळखीनेच टाटाच्याच कुठल्या कारखान्यात श्रीकांतला लावण्याच म्हणत होता. रावसाहेबा शिक्षण पूर्ण कधी करतात त्यावर सगळ अवलंबुन होत. एकुण माईंच्या जीवनातील वादळ शांत होण्याच्या मार्गावर होतं. त्यांच्या शुष्क मनावर कर्तव्य पार पाडल्याचा भावनांची सावली पडत होती. खुप वर्षांनी त्यांना समाधान वाटत होत. शाळेतून घरी आल्या की त्यांना शांत वाटत असे. खुप वर्षांनी त्यांना स्वस्थता मिळत होती. अविनाशच नुकतच झालेल लग्न आणि घरात खुप वर्षांनी अजुन एका स्त्रीचा वावराने माईंच मन हुळहुळत होत. लौकरच नातू येणार घरात आणि घर परत खेळत होणार. नातवाला धडधाकट आई-वडिल असणार या विचाराने माईंना आनंद होत असे.

मुंबईहुन बसने अविनाश जा-ये करत असे. आणि एके दिवशी परत येतांना बस मोकळी होती म्हणुन तो पाय लांब करून झोपला. रात्रीची वेळ होती. अविनाश घरी उशीरा येत होता. बस वेगाने जात होती. मधेच कोणी तरी आल म्हणुन चालकाने करकचून ब्रेकस दाबले. अविनाश गाढ झोपला होता तो सीटवरून घसरला आणि त्यांच डोक दाणकन विरूध्द दिशेच्या सीटच्या लोखंडी भागाला आपटले. निमिषार्धात सगळ घडल आणि झोपेतच काही कळायच्या आत अविनाश मृत झाला. बस-चालकाला सुध्दा काही कळल नाही. बस जेंव्हा डेपोत गेली तेंव्हा हा कोण वेडा-वाकडा माणुस पसरलाय म्हणुन बस चालक बघायला गेला तेंव्हा सगळ त्याच्या लक्षात आला. सकाळी नेहमी सारखा कामावर गेलेला अविनाश फक्त देहरुपीच परतला.


काळ कुणासाठी थांबत नाही अस म्हणतात. न थांबायला काळाला जायच तरी कुठेय? काळ पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. तो तसाच असतो. स्थिर, चिरंतन चिराकाल. पुढे रेटत जात ते माणसाच घोंगड. दुसरा पर्यायही नसतो. दैव फासे खेळायला बसवतो पण फासे फक्त दैवच टाकत. फक्त भोगण आपल्या हातात असत. माईंच्या मनात असल्या काहीश्या विचारांचा फडफडाट होत होता. पण मग त्या निश्चयाने उठल्या. आधी डाव उलटला तेंव्हा त्यांनी हार मानली नव्हती आणि आत्ताही त्या धडाडीनेच पुढे जाणार होत्या. सुनेला सावली देणार होत्या. त्यांनी मनात पुढचे आराखडे बांधायला सुरुवात केली. तीचं शिक्षण कस पुढे चालू करायच. तिचा जीव कसा रमवायचा. कधीही न भरणार्‍या जखमेवर हात ठेउन त्या पुढे जाणार होत्या. त्यांच्याकडे अजुन कुठला पर्यायही नव्हता.

8/17/08

निर्माल्य - भाग २

श्रीकांतनी सायकल भरधाव वेगानी अंगणात घातली. वर्‍हांड्यात फतकर मारून बसलेल्या माईंना बघुन त्यांनी सायकल चालतीच सोडुन उडी मारली. सायकल विहिरीच्या कडेला दाणकन जाऊन आदळली.

"आई, आई काय झाल?"

माईंनी काही उत्तर दिलं नाही. वरची दोन बटनं सोडलेला शर्ट, खर्रा खाऊन रंगलेल तोंड आणि चोपून मागे केलेले केस अश्या श्रीकांतकडे त्या नुसत्या बघत होत्या. श्रीकांतला सायकल दामटुन श्वास लागला होता. त्याला काहीतरी अर्धवट बातमी कळली होती. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते. माई काहीच बोलत नाही बघुन तो "वहिनी, वहिनी" हाका मारत धावत घरात गेला. आतुन परत रडण्याचे आवाज येऊ लागलेत. श्रीकांत परत धावतच बाहेर आला. सारं घर स्तब्ध होत. आकाशात ढग दाटलेले होते. आणि पान ही हलत नव्हत. अश्यात फक्त श्रीकांतच धावपळ करत होता. त्याने माईंना मिठी मारायचा प्रयत्न केला. पण माईंनी काहीच हालचाल केली नाही.

"आई, तू रडू नकोस. मी आहे" असं काहीस म्हणत तो सायकल कडे धावला. सायकलचे पाईडल जोराने मारण्याच्या प्रयत्नात पाईडल त्याच्या पोटरीला खस्सकन लागले पण त्या कडे त्यांच लक्ष नव्हत. त्याने घाटाकडे सायकल हाणली.

घरात परत सुन्न झाले. पाऊस पडत नव्हता आणि गरमीने श्वास गुदमरायची वेळ आली होती.

"माई, आत या" कोणी मध्यमवयीन बाई उंबरठ्यावर उभी राहुन माईंशी बोलत होती.

"राहु दे इथेच मला. पोरीची काळजी घ्या" माई उत्तरल्या. श्रीकांत झंझावातात त्यांचे रडणे थांबले होते. त्यांच्या शुन्य डोळ्यातून गरम टपोरे अश्रु परत वाहु लागले.

त्यांचं लग्न नुकतच झाल होत तेंव्हाची घटना त्यांना आठवत होती. त्यांच्या सासुबाई त्यांना कोणा बाबा कडे कोंकणात घेउन गेल्या होत्या. बाबा एका झोपडी वजा खोलीत रहात असे. त्याची खोली विचित्रश्या कुबट वासानी भरली होती आणि अंगार्‍यांचा धूरात काहीच दिसत नव्हते. त्या बाबाच्या पायावर पडुन सासुबाईंनी हंबरडा फोडला. माई जेमतेम विशिच्या असतील तेंव्हा. ती घुसमटलेली खोलीने त्यांचा जीव दडपुन गेला होता आणि सासुबाईंच अभद्र रडण त्यांना असह्य झाल होत. "असं नका करू हो. दया करा. सूनेला सुख लाभु द्या" असं काहीस सासूबाई हुमसुन-हुमसून म्हणत होत्या. पण बाबाने हूं का चूं केलं नाही. थोड्या वेळानी सासूबाईंनी आणलेला प्रसाद बाबाच्या पायावर ठेवला आणि माईंना घेऊन त्या घरी परत आल्या. घडलेला प्रकार इतका भेसूर आणि विक्षिप्त होता की माईंना त्या बद्दल सासूबाईंना काही विचारण्याची हिम्मत झाली नाही. सासूबाईंनीही काही कधी सांगितल नाही. पण जायच्या वेळी मात्र "पोरी, पोरी" म्हणत सासूबाई आपले खरखरीत हात माईंच्या गोल चेहर्‍यावर सारख्या फिरवत असत. सासूबाई त्या बाबाच्या पाया पडुन का रडत होत्या हे जरी माईंनी कधी विचारल नसलं तरी त्याची प्रचिती त्यांना जन्मभर जणू यायची होती.

माई कणखर व्यक्तीमत्वाच्या होत्या. जन्मभर संसार त्यांनीच रेटला होता. जवळच्या शाळेतच त्या नोकरी करत असत. सध्या त्या मुख्याध्यापिका होत्या. शिस्तबध्द आणि करारीपणासाठी त्या प्रसिध्द होत्या. त्या काळात बायका फारश्या नोकरी करत नसतं. पण नोकरी करावीच लागली तर शिक्षण क्षेत्राकडे जास्त कल असे. माईंची नोकरी करण्यामागची कारणे थोडी निराळी होती. माई लग्न होऊन घरात आल्यात तर घर खाऊन-पिऊन सुखी होतं. त्यांचे यजमान, आपले अण्णा, मोठ्या सरकारी हुद्द्यावर नोकरीस होते. इतक्या लहान वयात एवढा पगार आणि एवढा हुद्दा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचं भविष्य उज्वल होत. लग्नानंतर यथावकाश माईंना दोन सोन्यासारखी पोरं झाली. सगळं कस चित्रपटातल्या सारख चालू होत. पण वाईट काळ दार खटखटवुन येत नाही आणि बाहेर हाकलून बाहेरही जात नाही. खुपदा तो घरचाच होऊन बसतो. घुशीसारखा घरातल्यांची आयुष्य कुरतडत बसतो.

अण्णा स्वभावाने थोडे विक्षिप्त होते पण त्यांना वेड लागणार आहे अस कोणाच्या डोक्यात आलं नसत. पण वयाच्या तीशीत त्यांना फिटस् चा त्रास सुरू झाला. सुरुवातीला औषध देऊन आराम पडत असे पण या रोगाला निदान नेमके असे निदान नाही. हळु-हळु औषधांचा परिणाम कमी होऊ लागला. त्रास अजुन वाढत जाणार याची ती लक्षण होती. घरातील एकट्या कमविणार्‍या व्यक्तीची होत असलेल्या दुर्दशेचे सावट सगळ्यांवर पडत होते. फिटस च्या त्रासाने अण्णांची मानसिक संतुलन बिघडत होते. लहान असली तरी पोरे वडिलांसमोर दबुन असत. कधी काही चूक नसतांना बेदम मार पडत असे तर कधी कप-बशी फोडली तरी मुके मिळत असत. पण अश्या परिस्थितीतही अण्णांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी माईंचे शिक्षण पुन्हा चालू केले. खरं सांगायच तर अजुन काही मार्ग नव्हताही. माई मुळात हुशार होत्या पण लग्न व्हायच्या वेळेस त्या बी. ए. च्या प्रथम वर्गात होत्या. पण लग्ना नंतर सहाजिकच त्यांच शिक्षण थांबल. सध्य परिस्थितीत मात्र बी.ए. ची पदवी मिळाल्यावर शिक्षिकेची नोकरी पक्की होती. घराजवळच सरस्वती महाविद्यालय होत. माईंनी मुंबईच्या महाविद्यालयात स्वतःचे शिक्षण सुरु केले.

मुंबईला दररोचच जाण-येण आणि घर बघण यात त्यांची फार धाव-पळ होतं असे. अण्णा आजकाल घरीच असत. पण त्यांची फारशी मदत नसे. पण त्यांची होत असलेली दशा माईंना बघवत नसे. त्यांनी खुप उपास-तापास चालू केले. अभ्यास आणि घरा-दारातून वेळ काढुन त्यांनी आजु-बाजुची सगळी मंदिर झाडुन काढलीत. जेजुरी-तुळजा भवानी झालं मंगेश आणि त्र्यंबकेश्वरही आटपला पण त्या हार मानायला तयार नव्हत्या. जे काही घडलय किंवा घडलय त्या मागे काही तरी कारणं असतात. कुठल्या कारणाशिवाय कसं काही घडणार? आपल्या सोन्यासारख्या नवर्‍यावर अशी परिस्थिती का यावी याचे उत्तर माई शोधत होत्या. स्वत:च्या आयुष्याशी दैव असला अघोरी झिम्मा का खेळत होता हे त्यांना आकलनी पडत नव्हते. त्यांना खरं सांगायच तर शिकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना फक्त छान संसार करायचा होता. आपल्या नवर्‍याची सुखी ठेवायचे होते. पोरांना छान मोठं करायच होत. एवढ्या साध्या मागण्या त्या, काय चूक आहे त्यात? पण एवढ्या साध्या अपेक्षांचे मागणे देवाजवळ करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजु-बाजुच्या सगळ्यांचे संसार असेच चालू होते. सामान्य. पण ते सुध्दा माईंच्या नशिबी नव्हते. त्यांच्या तळहातावरच्या रेषा सामान्य नव्हत्या. अगम्य, अज्ञात अश्या त्या रेषांना जणु ऐका-मेकांचाही ठावठिकाणा नव्हता.

8/10/08

निर्माल्य- भाग १

मुंबईच्या इतक्या जवळ असुनही हे गाव थोडं विचित्र होत. ते अजुनही गावच होतं. मुंबईत माणसांचा क्षणाक्षणाला वाढणारा पूर आणि इथेय अजुनही जमिनीने हिरवा शालू नेसलेला होता. मुंबईकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याहुन दोन मैल आत, आडवळणाला एक जुना वाडा होता. आजु-बाजुला सगळेच वाडे होते. स्वतःला कबुतरांसारख खुर्‍हाडात बंद करुन घेण्याची हौस इथे कोणांस नव्हती. वाड्याची बांधणी जुन्या पध्दतीची होती. कौलांच उतरतं छप्पर होतं. समोर वर्‍हांडा त्यापुढे आंगण. आणि मोठ्ठ परसदार अशी टुमदार बांधणी होती. दोन घरांमधे कुंपण नसल्यामुळे आवार मोठं भासत असाव. अंगणात विहिर होती. तीतं काही कासवं पोहत होती. आजुबाजुला गर्द झाडी होती पण परसदारी कोणीतरी लक्ष देउन झाड लावली होती. केळी, पेरु, फणसाची झाडं होती. आंबा पण होता. परसदार मातीचं होत आणि फरश्यांची पाउलवाट होती. घरातही काळ्या-भोर थंडगार फरश्या होत्या. परसात पाण्यांच भलं-मोठं टाक होत. एकतर कोकणात वर्षातून सहा महिने पाऊस आणि वरुन समोर अंगणात विहिर असतांना, हे टाकं थोडं मजेशीरच वाटत होत.


घरात शांतता होती. मुसमुसण्याचे आवाज ऐकु येत होते. नुकताच पाऊस पडुन गेला होता. वातावरण ओलं होत. वर्‍हांड्याच्या पायर्‍यांसमोर, अंगणाच्या मध्यभागी एक तरूण देह ठेवला होता. वर्‍हांड्याच्या एका टोकाला, लाकडी खांबाला टेकुन माई देहाकडे बघत बसली होती. त्यांचे डोळे शून्य होते. वर्‍हांड्याच्या दुसर्‍या टोकाला अण्णा शांतपणे पेपर वाचत आरामखुर्चीवर बसले होते. समोर देह ठेवला असतांना त्यांच पेपर वाचण अंगावर शहारे आणणारं दृश्य होतं. माईंनी गर्दीतील एकाला खुणेनी जवळ बोलावल.



"कोणाची वाटं बघणं चाललय?"
"वहिनी अजुन खोलीतून बाहेर आल्या नाहीयात. शेवटचा नमस्कार करायला हवा तीने"
"बरं. बघते मी काय करायच ते" असं म्हणत माई गुढघ्यांचा आधार घेत उठल्या आणि आत जाऊ लागल्या.
"माई"
माईंनी मागे वळुन बघीतल.
"श्रीकांत कुठेय?"
माईंनी मोठ्ठा नि:श्वास टाकला. काही उत्तर न देताच त्या माजघरात गेल्या.
"पोरी, शेवटचा नमस्कार करुन घे"
एक तरूण पोरगी लोखंडी पलंगावर पडलेली होती. आजु-बाजुला बायका रडत उभ्या होत्या.
"नाही आई मी त्यांना अस जाऊ देणार नाही"
"असं नकोस ग करु. चल, उठ. मी आहे तुझ्या सोबत." माईंनी सूनेला बळे-बळे उठवण्याचा प्रयत्न केला आणि हात धरुन अंगणात आणल. पण मृतदेह बघुन सूनेनी धाडकन आंग जमिनीवर टाकल.
पेपर टाकुन अण्णा धावत आलेत. कोणीतरी पाणी आणले.
"असं करुन कसं चालेल. नमस्कार करून टाक."
"मग तुम्ही सगळे लगेच त्याला घेउन जाल आणि मी ईथे एकटीच मागे राहीन." लहान मुलीसारखे हुंदके देत सून बोलत होती. माईंचा गळा भरून आला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना.
सूनेनी कसातरी नमस्कार केला आणि ती परत बेशूध्द पडली. तीला उचलुन आत घेउन जावं लागल.
अंत्य-संस्काराची तयारी सुरु झाली.
"माई, अग्नी कोण देणार? श्रीकांतचा नेहमीच्या ठिकाणांवरही पत्ता नाहीया"
"कधीच परत नाही आला तरी चालेल" असं काहीस पुटपुटत "हे देतील" असं त्या म्हणाल्यात.
"अहो, ऐकता का? ऊठा, या लोकांसोबत जा आणि ते सांगतील तस करा"
हो म्हणत अण्णा लगेच उठलेत. "अगं पण माझा चहा व्हायचाय. ते मग तू करतेस का ते लौकर"
"अहो काय बोलताय तुम्ही? कळतय का चाललय ते? आपला अविनाश आहे हा." देहाकडे बोट दाखवत माई बोलल्या. बाईचा जीव अगदी कावुन गेला होता.
"आणि तुम्हाला चहाची पडलीय?"
अण्णांच्या आकलनी फारस काही पडलेलं दिसत नव्हत पण चहा मिळणार नाही एवढ मात्र त्यांच्या लक्षात आल.
"बरं, लगेच जायचं असेल तर मी ते आपलं म्हणजे बाहेरचे कपडे घालु की ते आपले घरातलेच चालतील"
माई मट्टकन जमिनीवर फतकर मारुन बसल्या व भकास डोळ्यांनी जमिनीकडे बघु लागल्यात.
पुरुष मंडळींपैकी कोणी तरी आत गेलं. नात्यातलंच असाव कारण त्याला घरातल काय कुठे आहेय माहिती होत. आत जाउन त्यांने झब्बा आणला.
"अण्णा झब्बा घाला आणि चला"
"अरे पण ते म्हणजे हा झब्बा घरातला आहे" अण्णा तक्रारीच्या स्वरात म्हणालेत.
त्या पुरुषाने जबरदस्ती अण्णांना झब्बा घालायला लावला आणि दंड पकडुन फाटकापाशी घेउन गेला.
माईंना रडू आवरत नव्हतं.
श्रीराम जय राम जय जय राम चा गजर झाला. लोकांनी तिरडी खांद्यावर टाकली.
अंगणात फक्त माईच उरल्या होत्या.
दूरून एक सायकल भरधाव घराच्या दिशेनी येतं होती.
(क्रमश:)