9/30/08

वायफळ बडबड

मला या महिन्यात तीन लेख टाकयचे होते. निर्माल्य कथा पूर्ण करायची होती आणि शिवराज्यारोहणाचा पुढला भाग ही लिहायचा होता. पण मी एक अक्षर सुद्धा लिहिलेलं नाही. आळशीपणाची पण सीमा असते. आणि या सिमोलंघनाचा पराक्रम करण्याची मला लहानपणा पासुन आवड आहे. असो.

गेल्या शनिवारी एका प्रख्यात इतिहासकाराच्या सांनिध्यात वेळ घालविण्याची संधी मिळाली. बर्‍याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यांच्या सारख्या थोरा-मोठ्यांनी माझ्या सारख्या पोरा-टोरांना वेळ द्यावा ही थोडी नवलाईची गोष्ट वाटते. कोणाला भेटाव आणि कोणाला भेटू नये यातून थोरपणा सिध्द करणारे राजकीय नेत्यांच्या जमातीत मोडतात. याला मी भाड्याचा थोरपणा म्हणतो. खरे थोर हे त्यांच्या कार्यामुळे ठरतात. एका ध्येयासाठी आपले आयुष्य वेचण हि काही सोपी गोष्ट नाही. कुठला तरी लेख, भाषण किंवा चित्रपट बघुन भारावून सगळेच जातात पण दुसर्‍या दिवशी ये-रे माझ्या मागल्या सारख आपण आपल्या आयुष्यात परत गुरफटुन जातो. थोडक्यात आपण आपले सामान्यत्व दुसर्‍याच घटकेला सिध्द करतो. पण काही 'वेडगळ' लोक असतात जे नुसते भारावून न जाता त्या विचारसरणीत स्वत:ला झोकुन देतात. समाजाच्या प्रगतीसाठी झटत रहातात. या मार्गातील कठिण परिस्थितीतून ते असामान्य होउन बाहेर पडतात. राजकीय नेते ज्यांचे पुतळे सगळी कडे दिसतात, ते फक्त पुतळ्यांच्याच रूपात समाजाचा एक अर्थहिन भाग बनतात. तर हि असामान्य लोक समाजाला समृध्द करून अमर होतात. असली लोक फार अल्प संख्येत आढळतात. ती लोकं पटकन ओळखुही येत नाही. या लोकांना शोधाव लागत. सध्य-परिस्थितीत या लोकांची आपल्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

भारतात सध्या दिवाळीच्या आधीच धमाक्यांची माळ लागलीय. लोकांचे जीव जातायत आणि आपले शिवराज पाटील मात्र त्यांच्या खुर्चीत स्थिर आहे. एका परदेशी बाईचे पाय चाटण्यात भूषण मानणार्‍या या मराठी माणसाची कीव येते. आणि असल्या शंख माणसाला निवडूण दिल्याबद्दल भारतीय समाजाचा राग येतो. पण काही मार्ग दिसत नाही. समाज जातींच्या विभाजनाने पोखरलेला आहे. प्रत्येकाला आरक्षणात हिस्सा हवा. भारतीय समाजाचे विभाजन करण्याचे इंग्रजी सत्तेने चालू केलेले कार्य आजचे नेते धडाडीने पुढे करतायत. त्यातूनच विश्वनाथ प्रताप सिंह किंवा अर्जुन सिंह सारखे अत्यंत घृणास्पद आणि गलिच्छ व्यक्ति देशाचे भविष्य अंधारात ढकलतात. तरीही कुंभकर्ण रूपी समाजाची निद्रा चळत नाही हे आश्चर्यच आहे. घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजु शकत नाही. तस सगळ्या गोष्टी समजुनही समाज त्यावर काही कृती करण्यास नकार देत असेल तर खुदा बचाए!

बर्‍याच गप्पा झाल्यात. तिसरा लेख लिहिला गेला हे बरं झाल. त्यातून काही फारस निष्पन्न होणार आहे अश्यातला भाग नाही पण मनाला खोटा दिलासा मिळणार एवढच.

No comments: