11/29/08

आपण सारे अर्जुन! *

पोलिस आणि राजकारण्यांना शिव्या मारण आपल्या समाजाचा आवडता छंद आहे. शिव्या मारायला नको अश्यातला भाग नाही. पोलिस भ्रष्ट आहेत आणि राजकीय नेते भ्रष्ट, अप्पलपोटी आणि देशद्रोही आहेत. पण कठिण समय येता पोलिस लोक हेल्मेट घालुन जुन्या-पुराण्या बंदुका घेउन मुसलमानी अतिरेक्यांशी सामाना करायला सज्ज होतात. आपल्या कर्तव्याला उराशी बांधुन मृत्युला आलिंगन देणार्‍या पोलिसांना भ्रष्ट कस म्हणायच आणि देशाला विकुन स्वतःची पोळी भाजणार्‍या राजकारण्यांना जिवंत का सोडायच? मुंबईत घडलेल्यल्या (मी हा लेख लिहतांना हत्या-सत्र चालूच होत) घटनांवर काय लिहायच यावर मी बराच वेळ विचार करत होतो पण शब्दांची लपा-छुपी थांबत नव्हती. या दारूण परिस्थितीवर विचार प्रकट करण्यासाठी शब्द बहुधा बध्द व्हायला तयार नसावेत.

आपला समाज शंढा सारखा हा नर-संहार कसा सहन करतोय? आपल्या समाजाच कौतुक कराव तितक थोडं आहे. बहुतेक सवय झाल्यावर कशाचीही तीव्रता कमी होते. हि भयानक स्थिती काही पहिल्यांदा आपल्यावर लोटली नाहीया. मूर्ख पत्रकार जगत या घटनेला भारताच ९/११ घोषित करू बघत आहे. अमेरिकेच्या भूमीवर ९/११ च्या आधी कधीच हल्ला झाला नव्हता. जेंव्हा की भारतावर अनेक ९/११ च्या भीषणतेचे हल्ले झाले आहेत. १९९३ चे स्फोट कस कोणी विसरू शकत? गेल्या पाच वर्षात (मूर्ख आणि नालायक शिवराज पाटील यांच्या गृह मंत्रालया अंतर्गत) भारताच्या प्रत्येक मुख्य शहरात स्फोट झाले आहेत. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, बंगालुरु, हैद्राबाद, अहमदाबाद. आता फारशी शहरच उरली नाहीयात.

या सगळ्या नर-संहारात अलिप्तपणे मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील वावरतायत. जणु काही झालच नाही. अफझल गुरु ला फाशी का द्यायची? अतिरेक्यांनी गोळीबार केलेला चालेल पण पोलिस अतिरेक्यांना कसे काय मारू शकतात? दिल्लीला एका शूरवीर पोलिसाने आपले प्राण दिलेत तर त्यावर वादंग उठविण्यात (अत्यंत घृणास्पद मुलायम सिंह आणि अमर सिंहा सोबत) मनमोहन सिंहच आघाडीवर होते. स्वदेशाच्या पोलिस अधिकार्‍यांचे मनोबल खच्ची कसं कराव हे या लोकांकडून शिकाव. गेल्या महिन्यात कुठे तरी भाषण देतांना (या अकलेच्या कांद्याला भाषण देण्या पलिकडे काही येत का?) माननीय मनमोहन सिंह म्हणालेत की "सामान्य जनता पोलिस दलावर इतका अविश्वास का दाखवते याचा पोलिस दलाने विचार कराव" अरे नालायका, आपल्या माजघरात-देवघरात येऊन हि मुसलमानी अतिरेकी संहार मांडतायत आणि तू निष्क्रियतेची साक्षात मूर्ती कसा बनलेला आहेस हा विचार करून आम्हा सामान्यांची डोकी पिकली आहेत त्याच काय? आपल्या प्रेमळ शिवराज पाटीलांना मुसलमानी अतिरेकी आणि माओवादी अतिरेकी 'हरवलेले तरूण' वाटतात. त्या दैत्यांवर गोळ्या चालविण्या ऐवजी गुलाब पाण्याचा छिडकावा करायला हवा या मनोवृत्तीचे शिवराज पाटील आहेत. अफझल गुरुला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यावरही "त्याला फाशीची शिक्षा का द्यायची?" हा प्रश्न पाटील साहेबांना पडला. सध्याच्या मुंबई नर-संहाराच्या सुरुवातीसच " दोनशे अति-प्रशिक्षित जवान पहाटेच मुंबईला पोचणार आहेत" ही माहिती पाटील साहेबांनी पत्रकारांच्या द्वारे जणु अतिरेक्यांना पोचविली. किती मूर्ख असाव माणसाने! हा इसम मराठी मातीत जन्मला आहे याची मला खरोखरच लाज वाटते. पण या माणसाची लाळ सोनिया बाईंच्या पद-कमलांशी गळते त्यामुळे बाकी भारत चूलीत गेला तरी जो पर्यंत १० जनपथच्या मालकीण बाईंच ताईत गळ्यात आहे तो पर्यंत पाटील साहेबांचा बाल कोणी बाका करु शकत नाही. सोनिया तारी त्याला कोण मारी?

भारतीयांच्या नामुष्कीची ही परिसीमा आहे.

जुनी शस्त्रास्त्र आणि जुनी चिलखत घालुन चढाईस निघालेल्या पोलिसांना बघितल कि जीव भरून येतो. खरच वाईट वाटत. भ्रष्ट असलेत तरी शेवटी समाज रक्षणासाठी प्राण हीच लोक वेचतात. एकतर राजकारण्यांनी पोलिस खात्याचा तमाशा बनवुन ठेवला आहे. एकी कडुन जनतेचा दबाव आणि दुसरीकडुन राजकारण्यांनी हात बांधुन ठेवलेले पोलिस खाते म्हणजे एक दारूण दृश्य आहे. या लोकांना पगार कमी असतात आणि दिवसाला १४ तास काम करावी लागतात. उच्च अधिकारी खालच्या अधिकार्‍यांशी अत्यंत वाईट वागतात. केवळ नोकरी म्हणुन नाईलाजास्तव काम करणार्‍या हवालदारांची कीव येते. त्यातून या लोकांच्या हातात नुसता दंडुका! हे डोंबल संरक्षण करतायत समाजाच. मुंबईत घडलेल्या घटनांमधे अतिरेक्यांकडील शस्त्रास्त्र बघितलीत तर दंडुके घेउन हिंडणारे हवालदार हे दृश्य हास्यास्पदच आहे. अर्थात यात चूक पैसे खाण्यात मग्न असलेल्या नेत्यांची आहे. विकासाची काम करतांना कोणी पैसा खाल्ला तर तेवढ वाईट वाटत नाही पण आजकालची नेते मंडळी म्हणजे काम न होऊ देण्यासाठी मुख्यत्वे पैसा खातात. गंमत म्हणजे हीच लोक खुप काळ जगतात.

मुंबईवर हल्ला होणार आहे हे सांगायला कोणा वराह-मिहिराची आवश्यकता नव्हती. तीन (दोन?) वर्षापूर्वी लोकल मधे बाँब स्फोट झालेला होता. तसंच सर्व मुख्य शहरांमधे मनात येइल तेंव्हा अतिरेक्यांनी हल्ले केले होते त्यामुळे मुंबई अगला निशाना आहे हे अपेक्षितच होते. पण हा हल्ला थांबवायचा कसा? मुंबईतील करोडाहुन जास्त लोकसंख्येवर लक्ष ठेवायच कस? तसच प्रत्येक दिवशी मुंबईत ये-जा होत असलेल्या लाखो लोकांचा हिशोब ठेवायचा कसा? इतक्या विस्तृत प्रदेशावर लक्ष द्यायला अदृश्य व्हायला हव. गुप्तचर विभाग कार्यरत हवा तसंच त्यांचा पोलिस खात्याशी सतत संपर्क हवा. अतिरेकी सापडला तर त्याला फार वेळ जिवंत ठेवण्याची गरज नको. न्यायलय सजग हव. कायद्यांची अंमल बजावणी कडक व्हायला हवी. अफझल गुरु सारखे सैतान इतकी वर्ष तुकडे तोडत जिंवत ठेवायला नको. कायदा चोख असला तर दुष्कृत्य करायचे ध्राष्ट्य होत नाही. समाज संरक्षणाची हि शस्त्र नीट वापरली तर मुंबई सारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि असं होण फार कठीण आहे अश्यातलाही भाग नाही. के.पी एस. गिल यांनी अश्याच तर्‍हेनी पंजाब शांत केल. पण हे चक्र इथे थांबायला नको.

हे धर्म-युध्द आहे. आणि याची जाणीव जो पर्यंत आपल्या समाजाला होत नाही तो पर्यंत परिस्थिती कठिण आहे. येथे धर्म म्हणजे हिंदु-मुसलमान युध्द अपेक्षित आहे. मुंबईत या क्षणी बरीच मुसलमान पोलिस प्राणाची बाजी लावायला मागे-पुढे बघणार नाही. पण ही सर्व अतिरेकी मंडळी केवळ एकाच धर्मातून येतात हे सुध्दा मान्य करण आवश्यक आहे. या लोकांना प्रगती बघवत नाही. धर्मांध आणि धर्म-पंगु असलेल्या या लोकां विरुध्द लढायला सर्व समाजात एकजूट हवी. शेवटी पोलिस अधिकारी काय, स्पेशल कमांडो काय किंवा न्यायाधीश काय, हे सगळे समाजाचे अंग आहेत. थोडक्यात समाजाने स्वरक्षण स्वतःच करायला हव. श्वान जातीची राजकारणी मंडळी झी-प्लस सिक्युरीटीत रहातात. यांच्या घरच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत. यांच्या वर गोळ्यांचे किंवा बाँबचे हल्ले होत नाहीत म्हणुन ही सगळी गांधीगिरी यांना सुचते. जनतेचे सेवक म्हणवणार्‍या या सैतानांपासुनच आपल्या सामान्यांना स्व-रक्षण करणे आवश्यक आहे. मुसलमानी अतिरेकी तर बोलुन चालून शत्रूच आहेत. पण नेत्यांच्या जातीने उपस्थित घरभेद्यांची खबर आपल्याला आधी घ्यायला हवी. आणि त्या साठी मताधिकारासारखे शस्त्र नाही. या सत्ता-पिपासु कुत्र्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायला मताधिकारासारखा पट्टा नाही. आवश्यक प्रश्न विचारणे हे सुशिक्षित समाजाच कर्तव्य आहे. आणि बरोबर उत्तर न मिळाल्यास निवडणुका जिंकु न देण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.

या युध्दात मार्गदर्शन करण्यासाठी श्री कृष्ण मिळण्याचे आपले भाग्य नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण सर्वांनी अर्जुन बनुन दिढमुढ व्हाव. मुंबई हत्या-सत्र काय किंव्हा दिल्ली, जयपूर आणि गुवाहाटीतील बाँब-स्फोट काय, या सगळ्या अघोरी भविष्याकडे जाणार्‍या पाऊलवाटा आहेत. परिस्थिती बिकट आहे आणि एकजुट होऊन सक्रियतेने बदल घडवुन आणण्यासाठी परिश्रम तातडीने घेतले नाहीत तर भविष्यात अत्यंत भीषण काळोख आहे.
----*----
*आपण सारे अर्जुन हे व. पु. काळे यांच्या शेवटल्या पुस्तकांपैकी एक आहे. ललित शैलीत आपल्या समाजाचे संभ्रमित स्वरूप त्यांनी मांडले आहे. वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे ही विनंती. त्या पुस्तकाचे शिर्षक प्राप्त परिस्थितीस तंतोतंत लागू होते म्हणुन मी माझ्या या लेखालाही तेच शिर्षक कायम ठेवले आहे.

2 comments:

Anonymous said...

सुरेख लेख. अमेरिका ने हे चुकीचा भूत ऊठवले आहे...ही टेररिज़म नहीं...हे धर्मा युद्धा आहे. जो पर्यंत आपण हे स्मजणार नाहीं तो पर्यंत हे असेच सुरू राहणार ... तलवारीच जबाब तलवारीनेच दिला पाहिजे ...बंदुकीला उत्तर बंदुकीनेच द्यायला हवे.

TEJAS THATTE said...

Now only the nation wide public revolt can save our India !

Wake up Indians!!!..Wake up!!!!!!!..
or be ready to get vanished !!!!!!

-Indian