6/10/09

श्री गणेश वंदना भाग ४

एका हाती भग्नदंत। तेच जाणावे बौद्धमत।
जे वर्तिकांनी खण्डित। स्वभावता॥

- भारतीय तत्त्वज्ञान मालिकेत बौध्द तत्त्वज्ञानाला नास्तिक तत्वज्ञान मानल्या जाते. केवळ बौध्द तत्त्वज्ञानाचा विचार केला तर आपल्याला सनातन तत्त्वज्ञानाशी बरेच साम्य दिसते. पण बौध्द तत्त्वज्ञानात कर्म-कांडाला मुळीच स्थान नाही. तसेच शुन्यवाद आणि विज्ञानवादाचा विचार करता सनातन तत्त्वज्ञानापुढे तोकडे पडतात. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भारत भ्रमणात उपस्थित सर्व विचार प्रणालींच्या उपासकांशी वाद-विवाद करून पराजित केले. यातील सर्वात प्रसिध्द म्हणजे मंडन मिश्रा हे मिमांसक होते. त्यांनी आद्य शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्कारले आणि सुरेश्वर नाव धारण केले. पुढे त्यांच्या ग्रंथ निर्मिती पैकी बृहदारण्यकोपनिषतवर्तिका, तैत्रेयिकोपनिषतवर्तिका आणि पंचकर्णवर्तिका हे तीन ग्रंथ प्रसिध्द आहेत. या पैकी बृहदारण्यकोपनिषतवर्तिकेत ११,१५१ श्लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना बहुतेक या वर्तिकांनी बौध्दांनी प्रस्तुत केलेल्या प्रश्नांचे समाधान केले असे म्हणायचे असेल. मिमांसक विचार प्रणाली कर्म-काडांला प्रचंड महत्त्व देते. पण हि कर्म-कांडे स्वयंभु नसुन त्याच्या मागे वेद-उपनिषदांचे जे तत्त्वज्ञान अभिप्रेत आहे ते आद्य शंकराचार्यांनी सुरेश्वरांना समजावुन दिले. यावरच पुढे सुरेश्वराचार्यांनी हे ग्रंथ लिहिलेत.

मग जो सत्कारवाद। तोच पद्मकर वरप्रद।
जो धर्मस्थापक स्वभावसिध्द। तो अभयहस्त॥

- गणपतीच्या ज्या हातात कमळ आहे त्या वरदहस्तास ज्ञानेश्वर महाराज सत्कार्यवादाची उपमा दिली आहे. सत्कार्यवादाचे तत्त्वज्ञान कारण आणि कारक या संबंधीची चर्चा आहे. यानुसार परिणाम हे कारणामात्रात आधिपासुनच अभिप्रेत असतात. त्या कारणामात्रा मुळे जे घडत किंवा उदयास येत ते त्या परिणामाचे साक्ष रुप. सांख्य व अद्वैत या दोन्ही विचार प्रनाली सत्कार्यवाद मान्य करतात. सांख्या अनुसार पुरुष आणि प्रकृती या दोन भागात ज्ञात आणि अज्ञात विश्व विभाजित होते. प्रकृती ही स्वभावता अनादी, अनंत आणि अकार असुन ती पुरुषाच्या अनुभवांद्वारे प्रगट होते.पण सांख्यचा कल द्वैता कडे आहे. तर अद्वैतानुसार जे परिणाम दिसतात ती सगळी माया आहे. ब्रह्मच सत्य असुन कर्ता आणि कारक केवळ मिथ्या आहे. या सत्कार्यवादाला महाराजांनी कमळाची उपमा दिली आहेय.

- गणपतीच्या दुसरा हात जो आशीर्वाद देतो त्यास धर्मस्थापक म्हटले आहे. थोडक्यात, हा वरदहस्त केवळ आशीर्वाद देतो एवढच नाही तर तो संरक्षक आहे. पाठीराखा आहे आणि दुर्बळांना शक्ति देतो हे अभिप्रेत आहे.

जो विवेक अति निर्मळ। तोच शुण्डादण्ड सरळ।
जेथे परमानंद केवळ। महासुखाचा॥

- शुण्डादण्ड म्हणजे सोंड. गणेशाची सोंड म्हणजे केवल निर्मळ विवेक असे महाराज का म्हणतात याचा मला मुळीच बोध होत नाही.

1 comment:

TEJAS THATTE said...

Ajun ek gosta note keli ka ..Maharajanni Ganeshachi Sond(Shudadand) hi 'Saral' ahe ase namud kele ahe.

btw 'lekh' chhan ahe,
..'Sankhya' mhanje exactly kay kalla nahi ?