5/2/09

शिव-राज्यारोहण भाग २

छत्रपतींच्या राज्याभिषेकाला भारतीय ईतिहासात अनन्यसाधारण महत्त्व का आहे याचा संक्षिप्तात आढावा आपण मागच्या लेखात घेतला. या लेखात त्यांच्या राज्याभिषेकाला सध्य काळात फारस महत्त्व का दिल्या जात नाही याबद्दल चर्चा करणार होतो. पण त्या आधी मला राज्याभिषेकाचे महत्त्व सिध्द करणारे अजुन काही मुद्दे सुचले. ते मी इथे प्रथम प्रस्तुत करतो.

मागल्या लेखात शिव-राज्यारोहणाच्या वेळीस भारतीय उपखंडात मुसलमानी सत्तांची स्थितीची चर्चा मागल्या लेखात केली पण या मुसलमानी सत्तां व्यतिरिक्त पोर्तुगित, इंग्रज आणि फ्रेंच या तीन युरोपियन सत्ता भारतात जम बसविण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील ब्रिटिश पुढे राज्यकर्ते झालेच. पण शिवा-जी राजांच्या वेळी सगळ्यात अधिक धोका पोर्तुगिज लोकांकडुन होता. १४व्या शतकाच्या अंतिम भागात नविन जग पादाक्रांत करण्यास युरोपियन देशांनी आरंभ केला. यात स्पॅनिश आणि पोर्तुगिज लोक आघाडीवर होते. अर्थात, जग पादाक्रांत करायला ही लोक निघाली नाहीत. भारताला जाण्याचा समुद्री मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचा या युरोपिय देशांनी पुरेपुरे फायदा उठवला. मुसलमानी अंमल अरबी आणि पर्शिया प्रांतावर स्थापित झाल्यापासुन भारताशी आणि चीनशी व्यापार करण्याचे सर्व मार्ग मुसलमानी प्रांतातुन जात असत. मुसलमान आणि ख्रिश्चनांमधील धार्मिक युध्दांना १४ व्या शतकात ऊत आला होत त्यामुळे भारतात जाण्यासाठी समुद्री मार्ग शोधणे आवश्यक झाले होते. भारत शोधण्याच्या मार्गातच दोन्ही अमेरिका खंडांचा शोध लागला. साम्राज्यवादाचा पायंडा इथे पडला. पृथ्वी गोल आहे या वर विश्वास ठेउन कोलंबस पश्चिमेला निघाला. पश्चिमेला जात गेलो तरआपण जगाच्या पूर्वेला पोचु आणि त्या अन्वये भारताच्या पूर्व किनार्‍याला पोचु असे त्याला वाटले. पण तो मधे अमेरिका खंड लागलेत. पण तो वेगळा ईतिहास आहे.

त्या काळात वास्को-द-गामा अफ्रिका खंडाला वळसा घालुन सन १४९८ ला कालिकतला पोचला. तेथुन तो पुढे गोव्याला पोचला. तेंव्हा पासुन पोर्गुगिज लोकांच प्रस्थ वाढत गेल आणि सन १५४३ लात्यांनी गोव्यात सत्ता प्रस्थापित केली. याच दरम्यान पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतही सत्ता प्रस्थापित केली. या भागाला आपण आज ब्राझिल म्हणुन ओळखतो. त्यांच्या स्पर्धेत स्पॅनिशही होते. त्यांनी मध्य व दक्षिण अमेरिकेत हैदोस मांडला आणि संपूर्ण खंडच गिळंकृत केला. या दोन्ही सत्त क्रूर पणात मुसलमानी सत्तांच्या एक पाऊल पुढेच होत्या. यातील स्पॅनिश भारताच्या दिशेनी कधीच आले नाहीत. पण शिवशाहीच्या उदयाच्या वेळेस पोर्तुगिज मात्र भारतावर राज्य करण्याची स्वप्न रंगवित होते. माझ्या मते त्यांच्या मनसुब्यांना खरा सुरंग मराठ्यांनीच लावला. हे खर की मराठ्यांना गोवा कधीच जिंकता आल नाही. (पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी गोवा जिंकलच होत. त्या चढाईच्या शेवटी पोर्तुगिज सत्ताधिशांनी पळुन जाण्यासाठी अक्षरशः बोटी तयार ठेवल्या होत्या. पण काही तरी भानगड झाली आणि हाता-तोंडाचा घास गेला.) पण मराठ्यांमुळे पोर्तुगिजांना गोव्याबाहेर पाऊलच ठेवता आल नाही. जंजिरा, मराठा आणि सिद्दी यांच्यामधे अक्षरशः तळ्यात-मळ्यात करत होता. पण हे सिद्दी पोर्तुगिजांपेक्षा वेगळे.

ब्रिटिश हे साम्राज्यवादाच्या आणि भारत शोधण्याच्या खेळात खुप उशीरा उतरलेत. त्यांनी हात पाय पसरायला सुरुवात केली तेंव्हा पोर्तुगिज आणि स्पॅनिश सत्तांनी जग अक्षरशः आपापसात वाटुन घेतल होत. पोपने पूर्व भाग पोर्तुगिजांना तर जगाचा पश्चिम भाग स्पॅनिश लोकांना दिला होता. त्यामुळे प्रस्थापित परिस्थितीत लुडबुड करून आपली जागा करण्यात इंग्रजांना बरीच वर्ष लागलीत. पण १६व्या शतकात त्यांने उत्तर अमेरिकेत पाय रोवले होते. या भागाला आपण कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिका म्हणतो. तसच वेस्ट इंडिज या बेटेही इंग्रजांनी लौकरच स्पॅनिशांकडुन जिंकली. बोस्टन (या भागाला अजुनही न्यु इंग्लंड असेच संबोधिल्या जात.) भागात तर इंग्रजी लोकांनी महाविद्यालये ही स्थापन केली होती. जगप्रसिध्द हार्वड महाविद्यालयाची स्थापना सन १६३६ची आहे. तेंव्हा शिवाजी राजे सहा वर्षाचे होते! राजांनी भारताच्या राजकीय पटलावर पदार्पणाच करणाच्या वेळी इंग्रजांच्या सुरत आणि मुंबई येथे वखारी कार्यरत होत्या. त्या काळात मुघली सत्ता इतकी शक्तिशाली होती की त्यांच्याशी टक्कर देण्याची हिंम्मत कोणातच नव्हती. त्यामुळे सुरतेतले आणि मुंबईतील इंग्रज फक्त व्यापारा निमित्ताने तिथे बसले होते अस मानणे सुद्धा चुकीचे ठरेल. कारण व्यापारा अतिरिक्त त्यांनी इतर जे उद्योग मांडले होते त्याकडे बघता आज ना उद्या मोघलांची शक्ति कमी होईल आणि तेंव्हा आपण आपली सत्ता प्रस्थापित करू अशी इंग्रजांची धारणा अरण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिकेत ही लोक तेच करत होते.

मधे मला सन १६३० चा डच लोकांनी तयार केलेला जगाचा नकाशा मिळाला. त्यात भारतीय उपखंड सोडला तर उर्वरीत जगात युरोपिय सत्ता झपाट्याने पाय पसरित होत्या. त्यामुळे लौकरच या सत्ता भारतावर नजर रोखणार होत्या हे सांगायला ब्रह्मदेवाची आवश्यकता नाही. भारताबाहेर बलाढ्य असल्यात तरी भारतात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कुठल्याही युरोपिय सत्तेकडे पुरेसे मनुष्यबळ किंवा आवश्यक माहिती नव्हती. माझ्याकडे असलेल्या या नकाशात भारताच्या भागात बर्‍याच चुका दिसतात. थोडक्यात युरोपिय सत्तांना भारतीय भूगोलाचीही पुरेशी माहिती नव्हती. पण त्यांच्याकडे अनोळखी भूभागवर जाऊन अपरिचित जनसमुदायावर राज्य करण्याचा चांगलाच अनुभव होता. यासाठी अमेरिका खंडाचा रक्ताने माखलेला ईतिहास सगळ्यांनी अवश्य वाचायला हवा.

राजांना जगाच्या दुसर्‍या टोकाला युरोपिय सत्तांनी थैमानाची कल्पना असण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त वरून ताक-भात. त्याप्रमाणे ते गोव्याच्या पोर्तुगिजांच्या मागे हात धुवुन लागले होते. या समुद्री चाच्यांना कायमच नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतलेत. चोला राजां नंतर नौदल स्थापन करणारे ते पहिलेच दूरदृष्टे होते. ही या युरोपिय लोक समुद्रावर राज्य करतात हे त्यांनी हेरले होते. समुद्री विज्ञानात आणि जहाज बांधणी तंत्रज्ञानात युरोपिय सत्ता फार अधिक प्रगत होत्या. जादुनाथ सरकार यांच्या नुसार युरोपिय जहाजांपुढे मराठ्यांच्या अक्षरशा नाव्हाड्या होत्या. पण राजांनी एक मुत्सद्दी चाल खेळली. एका हातानी त्यांनी युरोपिय लोकांकडुन तंत्रज्ञान शिकुन घेण्याची खटपट चालु केली (महाराजांची इंग्रजी व्यापार्‍यांशी चाललेली बोलणी अवश्य वाचावी) तसच कमी तंत्रज्ञानाच्या असल्या तरी संख्येनी अधिक होड्या आणि जहाजे बांधण्याचा राजांनी सपाटा लावला. राजांना हे माहिती होते कि युरोपिय लोकांनी कितीही मोठी जहाजे बांधलीत तरी त्यांना समुद्रपट्टीवर तर लागावेच लागेल. त्यामुळे समुद्रपट्टीच जर का सशक्त केली तर ही युरोपिय लोकांशी टक्कर देणे शक्य आहे हे त्यांनी अचूक ताडले.त्यामुळे त्यांनी कोकण किनारपट्टीवर किल्ले बांधायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे राजांचा मुकुटमणी होता.

सन १६व्या व १७व्या शतकाच्या पूर्वाधात शतकात भारतीय उपखंडात तसेच नव्याने शोध लागलेल्या जगाच्या काना-कोपर्‍यात काय चालले हे ध्यानात घेता महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला एक वेगळे तेज प्राप्त होते. १७ व्या शतकात हिंदु समाज या नविन आक्रमकांच्या तुलनेत अशक्त होता. अत्यंत वेगाने बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत स्वतःचे स्थान स्थापन करणे तर अशक्यप्राय होते. तसेच मुसलमानी आणि ख्रिश्चन धर्मांधांनी जो भारतीय उपखंडावर पिंगा घातला होता त्याचा सामना करण्यासही असमर्थ होता. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यावर महाराजांच्या मुत्सद्दीपणा आणि शौर्य अधिक झळाळु लागत. राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक केला त्यामुळे युरोपिय सत्तांचे पसरणे खुंटले. पोर्तुगिज तर गोव्यातच जणु बंदिस्त झालेत आणि राजां नंतर जवळपास दिडशे वर्षां नंतर ब्रिटिश सत्ता जी प्रस्थापित झाली ती बंगाल प्रांतात, महाराष्ट्रातुन नव्हे.

या सगळ्या प्रसंग बांधणीत कुठल्या राजकीय मुद्द्यामुळे राजांच्या छ्त्रचामर अभिषेकाला कमी लेखल्या जाते याची चर्चा राहुन गेली. त्यासाठी मुख्यत्वे १९ व्या शतकातील आणि थोड्याफार प्रमाणात स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय परिस्थिती वर विचार करायला हवा. तो आपण पुढील लेखात करू या.

2 comments:

Chinmay 'भारद्वाज' said...

http://en.wikipedia.org/wiki/Inter_caetera

TEJAS THATTE said...

तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज हैं !

Maharaj hote mhanun Maharashtra chach nave tar Deshacha, parkiya wa swakiya akramakan pasun honara nuksaan hazaro patine kami jhala !