5/5/07

मराठी माणुस कुठे हरवला?

मराठी माणुस कुठे आहे, अस जर का कुणी विचारल तर त्याच उत्तर तो (मराठी माणुस) कुठे गेलेलाच नाही अस दयाव लागेल. कारण महाराष्ट्र अजुनही प्रत्येक क्षेत्रात पुढेच आहे. आणी या यशाच श्रेय सर्वथीय मराठी माणसालाच जात. पण फक्त पुढे असण म्हणजे यश नव्हे. छत्रपती शिवाजींच्या काळा पासुन मराठी माणुस केवल पुढे नव्हता तर तो पुढारी होता. त्यानी समाजाच रक्षण केल,पोषण केल आणी केवळ मराठी माणसामुळेच धर्म जागरुती झाली. युध्ध-क्षेत्रात मुसलमानी सत्ते ला यशस्वी रीत्या सामना करुन सार्व-भौम हिन्दवी स्वराज्य स्थापन करणारा मराठीच माणुसच होता. मराठी माणसाच्या तलवारीच्य यशाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सन १७५० साली मराठी साम्राज्याची सीमा-रेष म्हणजे आजच्या भारताची सीमा-रेषा आहे. मुघली घोडे म्हणे संताजी-धनाजीच्या भीतीने पाणी प्यायची नाहीत. थोरले बाजीराव कधी कुठे प्रगट होतील याची शाश्वती नसायची. सन १७३६ ची थोरल्या बाजीरावांची भोपाळ प्रांतातली लढाई म्हणजे मराठी शौर्याचा मानबिन्दु आहे. अर्थात खुद्द छत्रपतींच्या शौर्याची इथे प्रशंसा करण म्हजे सुर्याला दिवा दाखवण्यासारख आहे. त्यांच चरित्र सगळ्यांन परिचीत आहेच।

पण मराठी माणुस फ़क्त शक्तीच प्रतीक नव्हता तर त्यानी भारतीय भक्ती संप्रदायाच्या मंदीरावर सोन्याच जणु कळस चढवला. हर हर महादेव च्या घोषानी त्यानी समाजाच रक्षण केल तर ग्यानबा-तुकारामाच्या नादानी त्यानी समाजाची जाग्रुती केली. सांप्रत काळात जातीय राजकारणाने जो उच्छाद मांडलाय त्यात महाराष्र्टीय संत परंपरेचे यश अजुन डोळ्यात भरण्यासारखे आहे. कारण प्रत्येक 'जातीने' जणु एक एक संत समाजाल दिलाय।

मधे मी प्रसिध्दी इतिहासकार श्री जादुनाथ सरकार यांनी मराठी इतिहासावर लिहिलेल एक पुस्तक वाचले. त्यांच्या मते भारताच्या गेल्य हजार वर्षाच्य ईतिहासात तलवार आणि लेखणी सारख्याच कौशल्यानी चालवणारा फक्त मराठी समाजच आहे. त्यांच्या मते मराठी पुदारयांनी (आपल्या संत मंडळीं पासुन ते धोंडो केशव कर्वे आणी बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत) समाज जाग्रुती कुठल्याही 'सरकारी' मदती शिवाय केली. या लोकांनी केलेल्या कार्याची सुरुवात, त्याचे स्वरुप आणी अंतीम यश यात कुठलीही सरकारी यंत्रणेचा समावेश नव्हता. म्हणजे या सगळ्या चळवळी समाजा साठी आणी समाजा कडुन होत्या।

या मराठी माणसात पुढे फूट पडली आणी देश परत परकीय सत्तेच्या अधीन झाला. अर्थात, या दुर्दैवाचा दोषी मराठी माणुसच होता. पण य अपयशानी न खचता, त्या मागची कारण शोधुन, त्या कारणान वर मात करण्याच्या उद्योगाला तो लागला. स्त्री-मुक्ती आणी दलीत-मुक्ती या आघाड्यान्वर मराठी समाजच पुढे होता. पण ईंग्रजी सत्ते विरुध्द पुळचट ठराव पास करण्या ऐवजी लोकमान्यानी "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे" ही गर्जना दिली आणी स्वातंत्र चळवळीचा अग्नी-कुंड पेटवला.

टिळक महाराजां नंतर मात्र मराठी माणुस पुढारी न रहाता फक्त पुढे राहु लागला. स्वातंत्र्य चळवळीतुन मराठी माणुस जणु नामशेषच झाला. आंबेडकरांनी दलीत समाजाला जाग्रुत तर केल पण स्वराज्य प्राप्ती नंतर दलीत चळवळ समाजिक न रहाता केवल राजकीय फायद्या साठी सिमीत झाले.
मराठी माणसाचा हा संक्षीप्त इतिहास सांगण्या मागचा हेतु असा की आपल्या या वैभवशाली भूतकाळावर नजर टाकली की सद्य मराठी माणसाची दयनीय परिस्थित लगेच डोळ्यात खुपते. आपण औदयोगीक, राजकीय आणी कलेच्या दृष्तीकोनातुन मराठी समाजाची पडताळणी करुया.

माणुस राष्ट्रीय पातळी वरच्या राजकारणात कुठेच दिसत नाही. परकीय सत्तेशी झुंझण्याचा जर का आपल्याला ४०० वर्षांचा अनुभव आहे तर अजुन पर्यंत मराठी माणुस एकदाही पंत-प्रधान कसा नाही झाला? मला कुणी पर-राष्ट्रमंत्री झालेला माहीती नाही. शरद पवार काही महीने संरक्षण मंत्री झाले होते. समाजिक जाग्रुती जर का आपल्या प्रांतात सर्व-प्रथम सुरु झाली तरी राजकीय पातळी वर जातीच्य मुद्द्यावर आपण बिहार-उत्तर प्रदेशच्या समाजा इतकेच विभाजीत आहोत. छत्रपतींनी ४०० वर्षापुर्वी हिंदु धर्माला जातीच्या जंजाळातुन सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पण त्यांच स्वप्न अजुनही आपण साकार करु शकलो नाहीया. खर तर जाती-पाती च्या राजकारणातुन बाहेर पडुन आपण भारत-वर्षा समोर उदाहरण ठेवायला हव. पुणेरी ब्राह्मण अजुनही स्वता:ला उच्चाभ्रु मानतात. मराठा समाज अजुनही वर्तमानात जगायला तयार नाही. दलीत समाज 'बदला' घेण्याच्या मनस्थितीतुन अजुनही बाहेर पडु ईच्छीत नाही. (येथे मी राजकीय आणी सामजीक प्रश्नांना एकत्र बांधल आहे)अर्थात या सगळ्या घोटाळ्यात नुकसान मराठी माणसाचच होतय।

औदयोगीक क्षेत्रात खर तर मराठी माणसा सारखा काम करणारा कोणी नसेल. गेली ६० वर्ष महाराष्ट्र औद्योगीकीकरणात सतत आघाडीवर आहे. पण मराठी माणुस कामगारच रहीला अस म्हणाव लागेल. खर तर या बाबतीत माझी मराठी माणसा बद्दल काही तक्रार नाही. स्वराज्य प्राप्तीच्या काळात महाराष्र्टात जो सरळ मार्गी आणी कष्टी मध्यम वर्गाचा उदय झाला त्यानेच भारतीय औद्योगिकीकरणाचा पाया घातला.
कलेच्या बाबतीत मात्र आपली दयनीय अवस्था आहे अस मला वाटत. मराठी चित्रपटाला तिरडीवर ठेवण्याची वेळ आली आहे. महाराष्र्ट सरकारवर मराठी चित्रपट काढायला योगदान द्यायची वेळ आलीय. खर तर हिंदी चित्रपट स्रुष्टीच्या आधी मराठी चित्रपटाचा आरंभ झाला. कोल्हापुरला विज न्हवती तरी चित्रपट तयार होत होते. दादासाहेब फाळके मराठीच होते ना! पण सध्या अशी परिस्थिती आहे की नागपुरला (महाराष्ट्राची उप-राजधानी) तर बरेच मराठी चित्रपट लागत सुध्धा नाहीत. खर तर मराठी चित्रपट आणी नाटक क्षेत्रात उत्तम कलाकारांची कमी नाहीया म्हणुनच मराठी चित्रपट आणी नाट्यकलेचा हा र्हास आश्चर्यजनक आणी खेदजनक आहे. उत्तम नाटके आणी चित्रपट जर क मुंबई आणी पुण्याच्या बाहेर पडत नसतील तर दोषी कोण?

आपल्या राज्यात सुबत्ता आहे. आपण आपल्या राज्यात सुरक्षित राहु शकतो. बरीचशी सरकारी कामे सुरळीत होतात. दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या प्रतीच्या आहेत. आणी याच श्रेय मराठी माणसालाच जात पण आपल्या वैभवशाली आणी उद्यनशील भूतकाळाकडे बघितल तर अजुन बरयाच गोष्टी साध्य करायला हव्या होत्या.

मराठी माणसाची तुलना कुठल्या अन्य प्रांताशी करत नाहीया. आपण आघाडीवर होतो आणी आहोत पण आपल्यात अजुन क्षमता आहे आणी त्या क्षमतेचा आपण आवश्यक उपयोग करु नाही शकलो तर ते आपल अपयशच मानव लागेल.

3 comments:

makarand joshi said...

I read marathi after a long long time. Refreshing.

Unknown said...

चित्रपट आणि औद्योगिक क्षेत्र हे अगदी बरोबर....आपण चित्रपट सृष्टीत खूपच मागे आहोत...मुंबई आणि पुण्याच्या बाहेर चित्रपट आणि नाटकं लागत नाहीत ही अगदी शरमेची बाब आहे.

Unknown said...

चित्रपट आणि औद्योगिक क्षेत्र हे अगदी बरोबर....आपण चित्रपट सृष्टीत खूपच मागे आहोत...मुंबई आणि पुण्याच्या बाहेर चित्रपट आणि नाटकं लागत नाहीत ही अगदी शरमेची बाब आहे.