गेल्या महिन्यातील भारत-पाक युद्धात बऱ्याच गोष्टी लक्षात आल्यात. जसे अमेरिका भारताचा खरा मित्र नाहीं. पण चीन मात्र पाकिस्तानचा खरा मित्र आहे. चीन आणि अमेरिकेत जरी तेढी असली तरी दोघांना पाकिस्तान जिवंत राहणे फायद्याचे आहे. भारताची युद्ध यंत्रणा आणि शस्त्रात्रे आधुनिक तर आहेच पण भारतीय सेनेकडे युद्ध कौशल्य पण आहे. अजून एक भानगड नव्याने पुढे आली म्हणजे तुर्कीची ढवळा-ढवळ. तुर्की पाकिस्तान पासून तब्बल चार हजार किमी दूर आहे. तुर्की जागतिक पातळीवर राजकीय, आर्थिक किंव्हा लष्करी सत्ता नाहीं. आणि तुर्कीने जी अस्त्रे पाकिस्तान ला पुरविली, त्याचा दिवाळीतल्या फटाक्यांएवढाच प्रभाव युद्धात दिसला. थोडक्यात, तुर्कीच्या भारतावर फारसा प्रभाव नाहीं. पण जर तर भारताने तुर्की ला जाणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली तर तुर्की चे नुकसान जास्त होईल. आजगयत युनाइटेड नेशन मध्ये तुर्कीने पाकिस्तानलाच पाठिंबा दिला आहे आणि तुर्की काश्मीर हे पाकिस्तानचा अविभाज्य अंग मानते. पण युद्धात सार्वजनिकपणे आणि उघड-उघड तुर्कीने भारत-पाक युद्धात लुडबुड करण्याचा प्रयत्न केला हे जरी नवीन असले तरी यात आश्चर्य वाटायला नको. कारण जगातील सगळ्या मुसलमानांचे नेतृत्व करण्याची मनीषा त्यांच्यात अजूनही आहे. पण अशी मनीषा ठेवण्या मागचे नेमके कारण काय? याचा भारताशी संबंध कसा? आणि प्राप्त परिस्थितीत भारत सरकार आणि भारतीय जनता टुरिकच्या या वाभरतपणाला कसे उत्तर देऊ शकते याचा आपण संक्षिप्तात आढावा घेऊया.
ओस्मानी किंव्हा ऑट्टोमन साम्राज्य - तेराव्या-चौदाव्या शतकात सध्याच्या मध्य आशिया / तुर्कमेनिस्तान भागातून तुर्की टोळीचे लोक सध्याच्या तुर्की भागात स्थायिक होऊन, त्यातील उस्मान पहिला, याने तुर्की साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या वंशातील पुढल्या ९-१० पिढ्यांनी तुर्की साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. युरोप, आशिया आणि आफ्रिका (इजिप्त) या खंडात पसरलेले हे साम्राज्य, एका जमान्यात जगातील सगळ्यात मोठे साम्राज्य मानल्या जात होते. केवळ विस्तृत भूखंडीय साम्राज्यच नव्हे तर या साम्राज्याची प्रशासकीय घडी अतिशय उत्तम मानल्या जात असे. अरब नसलेले या मुसलमान सुलतानांनी पुढे (सन १५१७ चा सलीम पहिला) स्वतःला खलिफा म्हणून घोषित केले. खलिफा (किंव्हा इंग्रजीत कालीप) हा संपूर्ण जगातील मुसलमानांचा अग्रगण्य नेता मानल्या जातो. अबू बक्र हा पहिला खलिफा होता. पण त्या नंतर हि पदवी स्वयंघोषित झाली. म्हणजे, कोणीही स्वतःला खलिफा घोषित करू शकत असे. अर्थात, स्वयंघोषित खलिफाला इतरांनी तशी मान्यता द्यायला हवी. तुर्की साम्राज्याच्या या स्वयंघोषित खलिफाला मात्र बहुतांश मुसलमानी सत्तांनी खलिफा मान्यता दिली होती. जवळपास चारशे वर्ष या घराण्यातील सुलतान, खलिफा म्हणविल्या गेला. सन १९२२ चा अब्दुल माजिद हा या घराण्याचा शेवटचा सुलतान आणि शेवटला खलिफा होता. इंग्रजांनी या घराण्याला १९२२ ला नामशेष केले. शेवटल्या २०० वर्षात या साम्राज्याचा भूभाग झपाट्याने कमी झाला होता. आणि सुलतान नाममात्र होत गेले होते. 'पाशा' किंव्हा पंत-प्रधान बहुतांश राज्य चालवीत होते आणि सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार होता. थोडक्यात, सुलतान गेला तर तुर्कीत फारसे लोक दुःखी झाले नाहीत.
पण तब्बल ७०० वर्ष टिकलेल्या तुर्की साम्राज्याचा सांस्कृतिक प्रभाव जगातील मुसलमान समाजावर फार मोठा होता. हैदराबाद चा निझाम जी टोपी घालत असे ती तुर्की सुलतान घालीत तशीच टोपी असे. अजून एक छोटीशी गोष्ट- तुर्की टोपी हि आत्ता-आत्तापर्यंतच्या हिंदी चित्रपटातील मुसलमान भूमिका करणाऱ्याना घातल्या जात असे. सुप्रसिद्ध चित्रपट 'अमर अकबर ऍन्थोनी' मधील ऋषी कपूर हि टोपी घालून असतो. थोडक्यात तुर्की साम्राज्य, तेथील पेहेराव, तिथल्या मान्यता, चालीरीती याचा भारतातील मुसलमानांवर पण प्रभाव होता. आणि या सोबत फुकटात आलेली ' Pan - Islamism ' ची विचार-सरणी आणि मानसिकता. भारतातल्या यातीलच काही मुसलमानांनी पुढे जाऊन पाकिस्तानची स्थापना केली. इस्लामी राज्य स्थापन करण्यासाठी अनन्वित हिंदूंना मारून पाकिस्तानची स्थापना झाली. कारण सन १९२२ ला सध्याच्या तुर्की ची स्थापना पण अर्मेनिया च्या ख्रिश्चन लोकांच्या नर-संहार करूनच झाली. इस्लामी आणि मुसलमानी देश स्थापन केल्यावर साहजिकच आहे कि पाकिस्तानी नेत्यांना तुर्की जवळचा देश वाटेल. पण गांधीजींना तुर्की 'खलिफा' ला पाठिंबा द्यायची का गरज भासली? कुठले विरोधाभासी आणि विभित्स राजकारण होते हे? ते थोडक्यात बघूया.
खिलाफत चळवळ - सुमारे ३०० वर्षे तुर्की साम्राज्याचा सुलतान स्वतःला खलिफा म्हणावीत असेल. तसेच मक्का-महिन्याची देखभाल आणि रखवाली हे सुलतान करीत असत. खलिफा म्हणजे जगातल्या सगळ्या मुसलमानांचा रक्षक आणि इस्लाम धर्माचा पण रक्षक. (हैद्राबादच्या निझामने सन १९३९ ला महिन्याच्या दोन महत्वाच्या मशिदींना विजेचे दिवे मिळावे म्हणून स्वखर्चाने एक छोटा विद्युत प्रकल्प बांधला. तसेच तुर्कीच्या बादशाही घराण्याशी हैदराबाद च्या निझामाचे रोटी-भेटीचे संबंध होते). पहिल्या महायुद्धात या तुर्की साम्राज्याने जर्मनीची बाजू घेऊन इंग्रज-फ्रांस इत्यादी 'मित्र' राष्ट्रांशी युद्ध केले. त्यामुळे महायुद्धानंतरच्या जागतिक राजकीय घडामोडींमध्ये इंग्रजांनी तुर्की साम्राज्य बरखास्त केले हे आपण मागल्या मुद्द्यात बघितलेच. यात बरेच नवीन देश, जसे ग्रीस, उदयास आले आणि मुख्य म्हणजे इंग्रजांनी खलिफा पदवी सुद्धा रद्द केली. सन १९२० पर्यंत या खलिफा पदवीला फारसे महत्व उरले नव्हते पण भारतातली मुसलमान समाजाला याचे वाईट वाटले असणार आणि त्यांच्या भावना दुखावल्या असतील म्हणून गांधीजींनी खिलाफत चळवळ चालू केली. या कारणाने मुसलमान समाज भारताच्या स्वतंत्र लढ्यात इंग्रजांविरुद्ध उभे होतीलअशी समजून गांधीजींची असावी. पण भारतीय मुसलमान इंग्रजांविरुद्ध उभे झालेत तरी त्या समाजाची इच्छा एक वेगळा इस्लामी देश स्थापन करण्याची असू शकते? इस्लामी खलिफाची पुनर्स्थापना करण्यासाठी उभे ठाकलेले मुसलमान, हिंदू बहुसंख्य भारतात कसे गुण्या-गोविंदाने राहतील? त्यांना वेगळ्या इस्लामी देशाचे वेध नाहीं का लागणार?
अर्थातच तुर्कीसोबत उगाच सख्य करण्यासारखा मूर्खपणा नव्हता. कारण तुर्की साम्राज्य अ-मुसलमान घटकांना दुय्यम दर्जा देत असे. सन १९१५-१९१८ च्या दरम्यान तुर्कीने १० ते १५ लाख अर्मेनियन ख्रिश्चन लोकांना मारले होते. आणि जणू याच धोरणाचा पत्ता गिरवीत सन १९२२ ला केरळ मध्ये मोपला ला मुसलमानांनी असंख्य हिंदूंची कत्तल केलीच आणि असंख्य हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. (विहिरीत लोकांनी उद्या मारून बायकांनी आत्महत्या केल्यात. आणि पोरांना घेऊन उद्या मारल्यात. काही पोर त्याच्या वाईट नशिबाने मेली नाहीत. त्यांचा आकांत पुढले ३-४ दिवस ऐकू येत होता पण मुसलमानानी त्यांना बाहेर काढले नाहीं. तहान-भुकेनी हि मुले अत्यंत करून अवस्थेत मेली.) अश्या परिस्थितीत तुर्की किंव्हा तुर्की साम्राज्याशी तिळमात्र संबंध नसतांना भारतीय मुसलमानांच्या मनात उगाच ते जागतिक 'उम्माह' चे घटक असल्याची जाणीव गांधीजींच्या खिलाफत चळवळीने निर्माण केली.
इस्लामी चळवळ - दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक नवीन देश स्थापन झालेत. त्यात मध्य आशिया आणि मध्य-पूर्व आशियात निर्माण झालेली सगळी राष्ट्रे इस्लामी होती. पश्चिमी आफ्रिकेतील मोरोक्को पासून तर पूर्व आशियात इंडोनेशिया पर्यंत एकूण ५६-५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. (यांची 'OIC ' - Organization of Islamic Coordination ' नावाची एक संस्था पण आहे). यातील सौदी अरेबिया, इराण, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान आणि तुर्की यासारखी राष्ट्रे स्वतःला कट्टर इस्लामी दाखवण्यात चढाओढ असते आणि तसेच संपूर्ण इस्लामी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी कसरत करीत असतात. मुसलमानी समाज रंग, राज्ये, देश, भाषा, वेष-भुषा, वर्ण इत्यादी अनेक स्तरांमध्ये विभागलेला आहे. पण या सगळ्यांना कट्टर इस्लामी चादरीत घट्ट बांधून एक करण्याचे स्वप्न या इस्लामी राष्ट्रांमधील हुकूमशाह गेले कित्येक दशके बघीत आहेत. या मानसिकतेत सध्या तुर्की मश्गुल आहे. तिथला सध्याचा हुकूमशाह रिसेप इरगोडेन तुर्कीला इस्लामी साम्राज्याच्या शिरस्थानी बनविण्याची खटपट करीत आहे. इस्राएल-पॅलेस्टिन मध्ये लुडबुड कर, इराक - कुर्दिस्तान मध्ये लुडबुड कर. आणि तसेच, नव्याने भारत-पाकिस्तान मध्ये पण लुडबुड कर. तुर्कीने पाकिस्तान ला ड्रोन्स पुरविले, युद्धनौका पुरविण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे उघडपणे. बाकी अंधारात अजून काय काय पुरविले कोण जाणे?
तुर्की साम्राज्याच्या शिखरावर - म्हणजे सुलेमान - दि मॅग्निफिसंट, याच्या कारगीर्दीत (सन १५३० ते १५६६), युरोपियन देशांशी जलयुद्धात (लपांटो चे युद्ध) तुर्की चा सपशेल पराभव झाला. तेव्हा साम्राज्याचा पाशा म्हणाला होता कि युरोप जिंकण्याच्या भानगडीत 'हिंद' जिंकायचा राहिला आणि साम्राज्याचे नुकसान झाले. आजचा भारत म्हणजे इस्लामी मोघली भारत नव्हे. त्यामुळे भारताकडे नजर फिरवण्याची ताकत तुर्कीत नाहीं आणि येणारही नाहीं. सुलेमान -दि मॅग्निफिसंट च्या कारगीर्दीला चारशे वर्षे होऊन गेली आहेत तरी हि इस्लामी जगावर सत्ता करण्याची आणि अ-इस्लामी जगाला गुलाम करण्याची मानसिकता टिकून आहे. आज कमी प्रमाणात आहे पण ती फोफावण्याची शक्यता आहे. आपण याची दखल घेऊन वेळेतच पावले उचलायला हवी एवढे नक्की.