3/16/10

आगामी लेखांच्या निमित्ताने

सध्या दोन आघाड्यांवर लेखन चालू आहे. एका नविन दीर्घ कथेच्या बांधणीत बरीच कष्ट लागता आहेत. अर्थात, हे अपेक्षितच होत. पण मी आत्ता पर्यंत ज्या पध्दतीने लिहित असे त्या ऐवजी नविन मार्गाने लिहिण्याची खटपट चालली आहे. आत्तापर्यंत साधारणा गोष्टीची रुपरेखा मनात असली म्हणजे मी कथाभाग प्रकाशित करायला लागत असे. त्याचा फायदा असा की वाचकां समोर काहीतरी ठेवता येत असे आणि भागांमधे प्रकाशित करण्यात कथा उत्कंठा वर्धक करण्याची संधी मिळे. पण तोटा असा की कथा पूर्ण झाल्यावर मला मनात वाटे की हे अजुन लिहायला हवे होते किंवा या पात्राला असा रंग देता आला असता. खर सांगायच तर अस नेहमीच वाटणार. यावर उपाय नाही. त्यातुन कथा कशी लिहावी हे मला शिकायची संधी कधी मिळाली नाहीया. त्यामुळे अंधारात चाचपडाव तस मी नविन प्रयोग करत असतो. त्यातच अजुन एक म्हणुन यंदा ठरवल की पूर्ण कथा लिहिल्या शिवाय एकही भाग प्रकाशित करायचा नाही. बघु या काय होत ते. ही कथा आत्तपर्यंत लिहिलेल्या पैकी सगळ्यात कठीण आहे हे खर. पूर्ण होईलच असही नाही.

शिवराज्याभिषेक लिहितांना "भारताच्या शोधात" ही लेख-मालिका लिहिण्याचा विचार डोक्यात आला. शिवाजी महाराजांचा इथे राष्ट्रबांधणीचा खटाटोप चालू असतांना ज्ञात जगात काय काय घडत होत, त्याचे परिणाम आणि पडसाद भारतावर कसे उमटले या बद्दल ही लेख मालिका असणार आहे. अर्ध्या जगाचा शोध भारताच्या शोधात लागला आहे अस म्हणायला हरकत नाही. आणि सन ९०० ते १८०० पर्यंतच्या काळात जगात घडलेल्या युध्दांमागील कारणांमधे भारतावर सत्ता हे अग्रगण्य कारण होत अस म्हणायलाही हरकत नाही. शोकांतिका अशी की या उलाढालींमधे आपण आपले जवळपास अर्धे बांधवजन परधर्माला आणि अर्धी भुमी परधर्मी झालेल्या बांधवजनांनाच हरवुन बसलो. आणि या काळात भारतात घडलेल्या नरसंहाराची तुलना जगात इतरत्र घडलेल्या फार कमी घटनांशी होईल.

पण झालेल्या आक्रमणांचा मुद्दा थोडा वेगळा. या लेखमालिकेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारताचा शोध घेणे आहे. (भारत एक शोध नाही, भारताचा शोध!) त्या काळात जगाचा व्यापारात भारताचा हिस्सा २० ट्क्क्याहुन अधिक होता. धर्मप्रचारा व्यतिरिक्त सोन (आणि बायका) लुटायच्या उद्देशाने मुसलमानी आक्रमक भारतात ९ व्या शतका नंतर येउ लागलेत. १५ व्या शतकानंतर युरोपिय सत्ता भारतावर घिरट्या घालु लागल्यात. या उठाठेवीत जगाचा नकाशा नेहमीसाठी बदलुन गेला. दोन नविन खंडाचे शोध लागलेत. आणि अफ्रिके सारख्या महाकाय खंडाचे अंतरंग पहिल्यांदाच कळले. ज्या सत्तांनी भारताकडे लक्ष दिले नाही त्या लौकरच नाममात्र सत्ता राहिल्यात किंवा नाहीश्याच झाल्यात. त्यापैकी तूर्की साम्राज्य आणि लपांटोच्या युध्दाचे परीक्षण मी या लेख मालिकेच्या पहिल्या सदरात करण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे शैक्षणिक पेपर प्रसिध्द करण्याचा मानस नाही पण या ऐतिहासिक घटनांचे चित्र रंगविण्याचा प्रयास आहे.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक लहानसे बेट आहे. या बेटाला जिंकण्यासाठी तुर्कीच्या सुल्ताना ने प्रचंड मोठे नौदल पाठवले. त्याला टक्कर द्यायला युरोपातील प्रस्थापित सत्ता एक झाल्यात. यांच्यातील घनघोर युध्दात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी झाली पण शेवटी युरोपिय सत्ता वरचढ ठरल्यात.

हे थोडक्यात झाल.

प्रसंग बांधणी व भारताच या युध्दाशी नात पुढल्या भागात.

॥जय शिवाजी॥