11/2/09

आगामी लेख

बर्‍याच दिवसात काही लिहिल नाही याच निमित्त धरुन लिहितोय. आगामी लेख या शीर्षका खाली लिहितोय खर पण आगामी लेखात प्रकाशित झालेले लेख या सदरा अंतर्गतच बरेच दिवस तिठत उभे आहेत. पण सध्या काही इलाज नाही. खुप काम आहेत त्यातुन पर्यटन बरच झाल त्यामुळे अजुनच कमी वेळ मिळाला. मधे आमचे आई-वडिल इथे आले होते त्यात व्यस्त होतो. बर्‍याच घटनांवर लिहायचा मानस होता पण तो मानसच राहिला. यावरुन लक्षात आल की सध्य परिस्थितीवर मी गेल्या बरेच दिवसात एकही लेख लिहिलेला नाही. कोणाच काही अडल नाही पण माझ इंग्रजी ब्लॉग फक्त सध्य-परिस्थितीवरच असतो आणि मराठी ब्लॉग त्याच विषयांवर पण मराठीत अश्या विचारानी सुरु केला होता. सुरुवातीला बरेच लेख लिहिलेही पण जसा जसा वेळ कमी मिळतोय तस फक्त कथाच लिहिल्या जाता आहेत.

कथा कधी लिहिन अस वाटल नव्हत. अचानकच लिहायला सुरुवात केली आणि लिहितच गेलो पण नेहमी एक प्रश्नचिन्ह समोर असत, एक भिती मनात असते की जे लिहितो आहे ते वाचण्याजोग आहे का? जे मांडतो आहे, रंगवतो आहे किंवा निदान तसा प्रयत्न करतोय ते मनोरंजक आहे का? लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे कळण्याचे मार्ग ठळक नाही. मोजकी लोक प्रतिक्रिया टाकतात आणि ब्लॉगवर भेट दिलेल्यांची संख्या वाढतांना दिसते पण तेवढच. घरी आमचे वडिल बंधु आणि मातोश्री प्रत्येक लेखास प्रतिक्रिया नेमाने देतात. दोन मित्र नित्य-नेमाने लिहिलेल वाचतात. या त्यांनी दिलेलं प्रोत्साहनची शिदोरी खुप वेळ पुरते हे मात्र खर. बरेच लोक म्हणतील कि लोकांच्या प्रतिक्रियांच काय लोणच घालायच आहे. आपल्याला आवडेल ते आणि मनाला रुचेल तस लिहित रहा. काही नाहीतर स्वतःच्या आनंदासाठी लिहि. विचार वाईट नाही पण स्वानंदासाठीच लिहायच तर दररोज डायरी लिहीली तरी पुरे आहे त्यासाठी एवढा ब्लॉग लिहायचा खटाटोप करून निरर्थक शब्दांच ओझ लोकांवर टाकण्यात काय अर्थ? काहीच नाही. खरच काही नाही. त्यापेक्षा न लिहिलेल बर किंवा न बोललेल बर. आमचे आजोबा त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगत की त्यांच्या काकांना जेवणाच्या पानावर भ्र काढलेलाही चालत नसेल. बोलायचच झाल तर "श्रीहरी श्रीहरी" एवढच म्हणायच. अजुन हव असेल तर स्वत: घ्याव. नियम फार कडक पाळल्या जात असे. पण मला कढी आवडली हे श्रीहरीच्या नादात सांगण थोड गंमतीदारच असणार.

भिती अशी वाटते की ब्लॉग लिहिण्याच्या भानगडीत वायफळ बडबड होत असेल तर ते कळणारच नाही आणि त्या नादात देवाचही नाव घेतल्या जाणार नाही.