1/22/08

संक्रातीचे पलायन

संक्रातीचं वार वाहु लागल होतं व शाळेत अभ्यासाचं वार वाहु लागल होत. १०वी च्य परिक्षा जवळ येत होत्या त्यामुळे 'ब' वर्गात फारश्या घडामोडी होत नव्हत्या. बहुतांश मुले आता अभ्यासाला लागली होती. अभ्यासा साठी बरेच विद्यार्थी गैर हजर रहात असत. शाळेत मुलांनी गैर-हजर राहु नये म्हणुन शाळेने कडक नियम लागू केलेत. यातुन मार्ग काढण्यसाठी मुले पहिल्या तासिकेत हजेरी लाउन, मधल्या सुट्टीत घरी पळुन जायचे. पळुन जाणार्‍या विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी शिक्षक मधल्या सुट्टीत शाळेच्या उंटाच्या शेपटी एवढ्या पटांगणात फेर्‍या मारत असत.

शाळेचे आवार फारच लहान होत. त्यामुळे शाळेच्या पुढल्या बाजुला मुली आपल्या सायकली लावत असत तर मागल्या बाजुला मुलं त्यांच्या सायकली लावयचे. या सायकलींची देखभाल करायल एक माणुस असे. तो शाळेचा नोकर वर्गात मोडल्या जात नसावा कारण तो प्रत्येक विद्यार्थ्याकडुन तो वर्षाचे ४० रुपये घेत असे. (पैसे वेळेवर भरले नाहीत की तो चाकाची हवा सोडायचा. फारच उशीर केला तर सायकल लपवुन ठेवायचा!) पन्नाशीच्या घरातील या इसमाला अख्खी शाळा बावाजी म्हणत असे. त्याच खर नाव कोणालाच माहिती नव्हत. अर्थात सायकली कुठे पळुन जात नसत. पण पळुन जाणार्‍या मुलांना पकडण्यसाठी बाजीप्रभुंच्या आवेशात बावाजी व त्याचे असिस्टंट मंडळी शाळेच्या दोन्ही फाटकांबाहेर गस्त घालत असत. शाळेच्या आवारातुन बाहेर पडतांना त्याच्याशी गुफ्तगु कराविच लागे. गेले आठवडाभर चिन्मय आणि त्याच्या 'गँग' चे सदस्य आळी-पाळीने पळत होते. शाळेत येतांना दप्तरच घेउन यायच नाही. चार वह्या पुस्तक घेउन आल कि पळायल सोप होत. पण शिक्षकही काही कच्चे लिंबु नव्हते. त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांनी दप्तर आणली आहेत की नाही हे तपासायला सुरुवात केली. मग ज्या मुलांची पळुन जाण्याची पाळी असे त्यांची द्प्तरे त्यांचे मैतर लोक घरी घेउन जात असत. मग शिक्षकांनी शाळा सुटल्यावर प्रत्येक विद्यार्थी किती दप्तरे आहेत या कडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पण विद्यार्थी पण 'जमे़ हुए खिलाडी़ थे। शाळा सुटल्यावर आपल्या पळुन गेलेल्या मित्राच दप्तर भिंतीवरुन फेकुन द्यायचं किंवा खिडकीतुन बाजुच्या जंगलात फेकुन द्यायच इत्यादी उद्योग मुलांनी चालु केले. या बाणावर शिक्षकांकडे मात्रा नव्हती. अहो, काय बाजुच्या मोकळ्या पडलेल्या प्लॉटवर, तिथल्या वाढलेल्या झाडींमधे उभर रहायचं की काय। शिवाय इतकी अक्कल अभ्यास करण्यात लावली असती तर सगळेच मेरिट आले असते खर तर. पण हे खुद्द ब्रह्मदेवही याबाबतीत मुलांच्या डोक्यात प्रकाश पाडु शकत नाही.

एकुण शिक्षक व विद्यार्थ्यांचा हा लपंडाव दिवसभर चालू असे. आज तेजसची पळुन जायची पाळी होती.

"अबे तुझे ये बस्ता लेके आनेको किसने कहां था?" नागपुरी हिंदीत परागने तेजसला विचारले.

"यार काय करु, आईनी जबरदस्ती दिल द्प्तर. तू घेउन जाशील का आज घरी?" तेजसने विचारल.

"मी आज बहारच घेउन जाणार आहे. तीन-तीन दप्तर घेउन जायला घरी काय दुकान लावायच आहे का?"

" ए चिन्मय, तु घेउन जाशील का बे माझं द्प्तर?"

"नाही"

"घेउन जा ना बे. ऐसा काय को करता?"

"नाही. तु सायकल कुठे लावली आहे आज? बावजी कडे ना"? चिन्मय ने विचारलं.

" यार, अजुन कुठे जागाच नव्हती"

"मरने वाला है बेटा तु आज" सौरभनी आपलं मत स्पष्ट केल.

" बघ यार, तु आज नाही पळाला तर तुला पुढल्या आठवड्यातच पळता येइल. उद्या चिन्मयची पाळी आहे आणि परवा सौरभची" कौस्तुभनी माहिती पुरवली.

तेजस विचार करु लागला. पहिली तासिका झाली. हजेरी लागली होती. शाळेत एकुणच शांतता होती.

"पळुन जाउ नका एवढच मी सांगेन. घरी जाउन तुम्ही मुळीच अभ्यास करत नाही याची मला खात्री आहे. त्यापेक्षा इथेच वर्गात अभ्यास का नाही करत तुम्ही मुलं? रिविजन करा शिक्षकां सोबत. काही प्रश्न असतील तर ताबोडतोब विचारता येतील. आजकालच्या मुलांच काहीच कळत नाही." बाई म्हणाल्या.

इथे तेजसची चुळबुळ चालु होती. त्यानी बर्‍याच मुलांना त्याच दप्तर घेउन जाण्याबद्दल विचारल पण कोणी फारशी उत्सुकता दाखविली नाही. काही मुलांनी दप्तर घेउन जाण्याबद्दल तयारी दाखविली पण त्यांनी स्पष्ट केल की ते दप्तर परत आणणारच नाही! चौथ्या तासिकेनंतर मधल्या सुट्टीची घंटा झाली. जी मुले पळुन जाणार होती ती पळुन जायच्या उद्योगाला लागली. शिक्षक व बावाजी सोबत त्यांचा शिवा-शिवीचा खेळ सुरु झाला. तेजसला कळेना काय कराव ते. त्याने बावजीला मस्का लावण्याचा प्रयत्न केला.

"बावाजी, आज जाने दो ना। घर मे मां की तब्येत खराब है।"

"का बे काल पैदा झालो वाटल का बे तुला?" आता या पुढे काय बोलणार!

तरी तेजस तिथेच घुटमळत होता.

"तेजस लेका कसा फाट्या आहे बे तू? हिंमत है तो भाग के दिखा । मान जाउंगा तुझे।" कौस्तुभनी तेजसला उगाच डिवचल.

शाळेतील मुलं शाळेच्या मागल्या फाटकापाशी उगाच घोळका करुन उभी होती. कोणी पळुन जात नसेल तरी एकदम "हो हो" चा गजर लावित होती. मधली सुट्टी संपायची वेळ आली होती. दहाच मिनिटे उरली होती. तेजस अस्वस्थ होत होता. तेजस वर्गात परतला. " अभी तक तू इधर ही है। मला वाटल की तू पळाला." चिन्मयने कुत्सितपणे विचारले.

"फाट्या आहे ना बे तो. तेजस फाट्या, तेजस फाट्या...हो हो हो हो" कौस्तुभनी गजर लावला.

आता मात्र हद्द झाली होती. तेजसची सहनशक्तीचा तो अंत होता. त्याने आपले दप्तर उचलले व धावत फाटकापाशी गेला. कोणी मुलगा पळुन गेला होता तर बावाजी त्याच्या मागे धावत गल्लीच्या टोकापाशी गेला होता. तेजसनी ती संधी साधली किंवा निदान तसा प्रयत्न केला. त्याने आपली सायकल उचलली व शाळेच्या ५ फुटी भिंतीवरुन ती सायकल पलिकडे टाकायचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात दुरुन बावजी परत येतांना त्याला दिसला. घाई-घाईत त्याचे एकाच खांद्यावर लावलेल दप्तर पडल. भिंतीपलिकडे अर्धवट गेलेली सायकल. तेजस स्वत: भिंतीवर व अलिकडे पडलेल द्प्तर अशी त्याची त्रिशंकु स्थिती झाली. बावाजी अर्थातच, आंधळा नव्हता. त्याने दुरुन हे 'मनोरम' दृश्य बघितलं व तो परत शाळेच्या दिशेनी धाउ लागला. आतापर्यंत भिंतीपाशी बरीच विद्यार्थी जमा झाले होते. कोणी तेजसला मदत करायला तयार नव्हत. त्याचे 'ब' वर्गातील बंधुंना तेजसच्या या 'मर्दुमुकीची' कल्पना नव्हती. इथे मात्र तेजस चांगलाच फसला होता. पण अजुन कयामत नीटशी कोसळली नव्हती. कुठल्या तरी उद्योगी विद्यार्थ्याने हे नाटक बघायला शिक्षकांना आमत्रंण दिल.

"तेजस नालायक खाली उतर" बाई ओरडल्या

"ए सन्नाट्या, कोठे पळुन राहिला बे तू" बावाजीने आरोळी ठोकली व तो तेजसला भिंतीवरुन खाली खेचू लागला.

"अरे बावजी, मेरी सायकल इधर अटक गयी है। वो तो निकालने दो।"

"सायकल गेली भाड्यात. तू आधी खाली उतर. "

"कानाखाली आवाज काढयला हवा या मुलांच्या" बाई म्हणाल्या.

हे ऐकुन आत्ता पर्यंत हो हो चा गजर 'प्रेक्षकांनी' लावला होता त्याचे रुपांतर आता "तेजस को मारो, तेजस को मारो" यात झाला. तेजसचे वर्गबंधु घटनास्थळावर दाखल झाले होते. शेवटी तेजसनी सायकल सोडली व तो भिंतीवरुन खाली उतरला. त्याने आपले दप्तर हातात घेतले. बावाजीने त्याचा दंड घट्ट पकडुन खेचायला सुरुवात केली.

"अरे बावाजी धक्का काय को मार रहे हो"

"तू चाल ना बे. खुप शायना बनुन राहिला होता मगापासुन"

"अबे, काय आयटम आहे बे. सांगायच तर होत आधी, कॅमेरा घेउन आलो असतो." कौस्तुभनी टोमणा मारला.

बाई पुढे, मागो माग बावजी व तेजस व क्षणा-क्षणाला वाढत जाणार जन-समुदाय अशी वरात शाळेच्या पटांगणातुन मुख्याध्यापिकेंच्या कार्यलयाकडे निघाली. तेवढ्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. शाळेच्या चपराश्यानी सगळ्या मुलांना हाकलले. मुख्याध्यापिका कार्यालयात नव्हत्या. ज्या बाईंनी तेजसला पकडल होत त्यांही त्यांच्या तासिकेला निघुन गेल्या. बावाजी दमुन गेला होता. विहिरीच्या बाजुच्या भिंतींला लागुन त्याचा झोपण्याचा बाक असे तो तिकडे निघुन गेला. मुख्याध्यापिकेंच्या कार्यालया बाहेर चपराशी व तेजस दोघेच उरले होते.

1/1/08

श्री गणेश वंदना

हे अशेष शब्दब्रह्म। तीच तुझी मूर्ती उत्तम।
वर्ण हीच कान्ति मनोरम । तुझ्या मूर्तीची॥

स्मृती हे तुझे अवयव। ज्यांचा अवर्णनीय आंगीकभाव।
अर्थशोभा ही ठेव। लावण्याची॥

अष्टादश पुराणे। तीच मणिभूषणे।
पदरचना घाट, प्रमेये कोंदणे। त्यामध्ये रत्नांची॥

पदरचना सुंदर। तेच रंगविलेले वस्त्र।
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥

कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥

पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्‍यातील रत्ने। करगोट्याच्या॥

व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥

ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥

तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥

एका हाती भग्नदंत। तेज जाणावे बौद्दमत।
जे वर्तिकांनी खंडित। स्वभावता।

मग जो सत्कारवाद। तोच पद्मकर वरप्रद।
जो धर्मस्थापक स्वभावसिध्द। तो अभयहस्त॥

जो विवेक अति निर्मळ। तोच शुण्डदण्ड सरळ।
जेथे परमानंद केवळ। महासुखाचा॥

जो उत्कृष्ट संवाद। तोच सरळ शुभ्र दात।
ज्ञान हेच सूक्ष्म प्रदीप्त। डोळे विघ्नराजाचे॥

पूर्व उत्तर मीमांसा दोन। तेच ह्याचे कान।
बोधमदामृताचे सेवन। करिती मुनिभृंग॥

प्रमेय तेच तेजस्वी मवाळ। द्वैत-अद्वैत गंडस्थळ।
समान त्यांची शोभा तेजाळ। भासतसे॥

वरी जी दश उपनिषदे। ती सुंगधी मुले मुकुटामध्ये।
ज्ञानाचा मकरंद ज्यामध्ये। ती शोभती भाळी॥

अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल।
मकार मस्तकस्थल। सर्वश्रेष्ठ॥

हें तीन्ही एकवटले। तेव्हा शब्दब्रह्म झाले।
ते आदिबीज मी वंदिले। सदगुरु कृपेने॥

- श्री ज्ञानदेव कुळकर्णी

मूळ रचना ज्ञानेश्वर महारांजाच्या ज्ञानेश्वरीतील आहे. प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकरांनी त्याचे 'भाषांतर' सध्याच्या मराठीत केले.